
खटाव तालुक्यातील अंभेरी येथे शक्तीचे प्रतीक असलेले दैवत कार्तिक स्वामी यांचे मंदिर प्रसिद्ध असून तेथे स्वामींची १२व्या शतकातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. रहिमतपूर–वडूज रस्त्यावर ज्या ठिकाणी हे मंदिर आहे, तेथील घाटाचे नामकरण या मंदिरावरून कार्तिकेय घाट असे झाले आहे, तर ज्या दोन डोंगरांमध्ये हे स्थान आहे, त्या परिसराला देवदरी असे सुंदर नाव पडले आहे. शिवलीलामृत आणि पद्मपुराणात या मंदिराचा उल्लेख आहे. त्यामुळे हे मंदिर यादव वा चालुक्य काळातील किंवा त्याच्या आधीचे असावे, असे सांगितले जाते.
रहिमतपूर–वडूज रस्त्यावरून कार्तिक स्वामी मंदिराकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक मार्ग कार्तिकेय घाटाच्या अलीकडून सुरू होऊन तेथून पायवाटेने मंदिरापर्यंत जाता येते. दुसरा मार्ग हा नव्याने बांधला असून घाट संपल्यावर तेथून डांबरी रस्त्याने मंदिरापर्यंत जाता येते. दोन्ही बाजूने उंचच उंच डोंगर व निसर्गरम्य वातावरणाने समृद्ध अशा या मार्गाने थेट मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत पोचता येते. मंदिराच्या अलीकडे कमंडलू नदीवर एक लहानसा लोखंडी पूल आहे. त्या पुलावरून पलीकडच्या बाजूला असलेल्या कुंडातील पाण्याने हात–पाय धुऊन मंदिरात जाण्याची पद्धत आहे. पावसाळ्यात या पुलाच्या समोरून कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी येथे दररोज शेकडो पर्यटक येत असतात.
मंदिराची आख्यायिका अशी की एकदा पार्वती मातेवर रुसून कार्तिक स्वामी कैलास पर्वतावरून अंभेरी या गावात आले.
या ठिकाणी त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी बाजूला ओतून दिले. त्यामुळे तिथे एक नदीचा प्रवाह तयार झाला. हीच नदी कमंडलू नदी म्हणून अखंड वाहत असते. या नदीचे उगमस्थान कार्तिक स्वामी मंदिराच्या परिसरात आहे.
मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे असून त्यांना जोडणारा एक सभामंडप आहे. जुन्या गर्भगृहात काही पायऱ्या उतरून जावे लागते. तेथे एक शिवपिंडी असून त्याच्या मागे साधारण साडेतीन मीटर उंचीची कार्तिक स्वामींची काळ्या पाषाणातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. ही मूर्ती अंदाजे १२व्या शतकातील असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जाते. मूर्ती एकमुखी असून तिला १२ हात आहेत. उजवीकडील एक हात अभय मुद्रेत, तर डावीकडील एका हातात कोंबडा धरलेला दिसतो. डोक्यावर मुकुट, त्यातून डोकावणारे नागशिल्प, कानात कुंडले, गळ्यात आणि पायात अलंकार आहेत. मूर्तीच्या उजवीकडे खालच्या बाजूला मोर कोरलेला असून त्याचा पिसारा डाव्या पायाच्या पुढे आला आहे. पायापासून उजव्या खांद्यापर्यंत भाला कोरलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.
मुख्य मूर्तीशेजारी सहा मुखे असलेली व अंदाजे दीड फूट उंचीची कार्तिक स्वामींची आणखी एक मूर्ती आहे. १२ हात असलेल्या या मूर्तीच्या हातांत विविध आयुधे दिसतात. कमरेला धोतर नेसलेली अशी ही मूर्ती आहे. या मूर्तीसंदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी की अंभेरी गावातील घाटातून एकदा इनामदार नावाचे गृहस्थ बैलगाडीने प्रवास करीत होते. रस्ता नागमोडी असल्याने एका वळणावर त्यांची गाडी दरीत कोसळली. काही कालावधीनंतर ते शुद्धीवर आले व त्यांनी पाहिले तर ते कार्तिक स्वामी मंदिराजवळ होते. या मोठ्या अपघातातून कार्तिक स्वामींनीच आपल्याला तारले, अशी त्यांची खात्री झाली व काही दिवसांनंतर त्यांनी येथील मंदिरात मूळ मूर्तीच्या शेजारी सहामुखी कार्तिक स्वामींची मूर्ती घडवून तिची स्थापना केली. त्यामुळे या मंदिरात कार्तिक स्वामींच्या दोन मूर्ती आहेत.
या गर्भगृहासमोरील दुसऱ्या गर्भगृहात नव्याने बसविण्यात आलेली एकमुखी कार्तिक स्वामींची संगमरवरी मूर्ती आहे. गर्भगृहात असलेल्या पायरी मार्गाने खाली उतरल्यावर आत काशिनाथ भारती महाराजांची समाधी पाहायला मिळते. या भारती महाराजांनी या परिसरात अनेक वर्षे तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या आवारात चाफ्याच्या झाडाखाली दोन वीरगळी आहेत. पुढे काही अंतरावर दोन तपस्वींची समाधी स्थळे आहेत. हा संपूर्ण परिसर वटवृक्षांनी व गर्द झाडींनी वेढलेला आहे.
श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि कार्तिक पौर्णिमेला इथे यात्रा भरते. या मंदिरात महिलांना प्रवेश मिळत नाही. धनवृद्धी व प्रापंचिक अडचणींसाठी येथे नवस करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे जागृत स्थान असून हा देव नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ज्या व्यक्तींना मंगळ असेल त्यांनी कृतिका नक्षत्रावर कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास मंगळाची पिडा कमी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावर येथे हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते.

खटाव तहसील के अंभेरी गाँव में शक्ति के प्रतीक कार्तिकेय (कार्तिक स्वामी) का प्रसिद्ध मंदिर स्थित है। यहाँ कार्तिक स्वामी की 12वीं शताब्दी की एक विशिष्ट मूर्ति प्रतिष्ठित है। रहिमतपुर–वडूज मार्ग पर स्थित इस मंदिर के कारण यहाँ के घाट को ‘कार्तिकेय घाट’ कहा जाता है। जिन दो पर्वतों के बीच यह स्थान स्थित है, उस क्षेत्र को ‘देवदरी’ नाम प्राप्त हुआ है। शिवलीलामृत और पद्मपुराण में इस मंदिर का उल्लेख मिलता है। इसलिए यह मंदिर यादव या चालुक्य काल अथवा उससे भी पूर्वकालीन माना जाता है।
रहिमतपुर–वडूज मार्ग से कार्तिक स्वामी मंदिर तक पहुँचने के दो मार्ग हैं। प्रथम मार्ग कार्तिकेय घाट से आरंभ होकर पगडंडी द्वारा सीधे मंदिर तक जाता है। दूसरा मार्ग नवीन रूप से निर्मित है। यह मार्ग घाट समाप्त होने के बाद पक्की सड़क द्वारा मंदिर तक पहुँचाता है। दोनों ओर ऊँचे-उनचे पर्वतों और प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण यह मार्ग सीधे मंदिर के समीप स्थित वाहनतल तक जाता है। मंदिर के पास कमंडलू नदी पर एक छोटा-सा लोहे का पुल है। इस पुल से दूसरी ओर स्थित कुंड के जल से हाथ–पाँव धोकर मंदिर में प्रवेश करने की प्रथा है। वर्षा ऋतु में पुल के समीप गिरने वाले झरने के दर्शन हेतु यहाँ प्रतिदिन सैकड़ों पर्यटक आते हैं।
मंदिर से संबंधित पौराणिक कथा यह है कि एक बार माता पार्वती से रुष्ट होकर कार्तिक स्वामी कैलाश पर्वत से अंभेरी आए थे। यहाँ उन्होंने अनेक वर्षों तक तपस्या की। तप के समय उन्होंने अपने कमंडलू का जल निकट ही फेंक दिया।
इससे यहाँ एक जलप्रवाह उत्पन्न हुआ। यही प्रवाह आज कमंडलू नदी के रूप में निरंतर बहता है। इस नदी का उद्गम कार्तिक स्वामी मंदिर परिसर में ही है।
मंदिर में आमने-सामने दो गर्भगृह हैं और उन्हें जोड़ने वाला एक सभामंडप है। प्राचीन गर्भगृह में कुछ सीढ़ियाँ नीचे उतरना पड़ता है। वहाँ एक शिवलिंग है। उसके पीछे काले पाषाण की लगभग साढ़े तीन फुट ऊँची कार्तिक स्वामी की विशिष्ट मूर्ति प्रतिष्ठित है। यह मूर्ति लगभग 12वीं शताब्दी की मानी जाती है। यह मूर्ति एकमुखी और 12 भुजाओं वाली है। इसके दाएँ हाथों में से एक अभय मुद्रा में है। बाएँ हाथों में से एक में मुर्गा (कुक्कुट) धारण किया हुआ है। सिर पर मुकुट, मुकुट के पीछे नागशिल्प, कानों में कुंडल तथा गले और पैरों में अलंकार हैं। मूर्ति के निचले दाहिने भाग में मोर उकेरा गया है। उसका पंख बाएँ पाँव के आगे दिखाई देता है। पैरों से दाएँ कंधे तक एक भाला (शक्ति अस्त्र) उत्कीर्ण है। सिर पर जटामुकुट होने के कारण यह मूर्ति अत्यंत विशिष्ट दिखाई देती है।
मुख्य मूर्ति के समीप लगभग डेढ़ फुट ऊँची, छह मुखों और 12 हाथों वाली कार्तिक स्वामी की एक और मूर्ति स्थापित है। इसमें स्वामी ने विभिन्न आयुध धारण किए हैं और कमर में धोती पहनी है। इसके संबंध में यह विवरण मिलता है कि अंभेरी घाट से एक बार ‘इनामदार’ नामक एक गृहस्थ बैलगाड़ी से जा रहे थे। मार्ग कठिन और घुमावदार होने के कारण उनकी गाड़ी खाई में गिर गई। कुछ समय बाद जब उन्हें चेतना आई, तो उन्होंने स्वयं को कार्तिक स्वामी मंदिर के समीप पाया। उन्होंने इसे कार्तिक स्वामी की कृपा माना। कुछ समय पश्चात उन्होंने मूल मूर्ति के समीप यह छहमुखी मूर्ति बनवाकर प्रतिष्ठित करवाई। अतः इस मंदिर में कार्तिक स्वामी की दो मूर्तियाँ हैं।
दूसरे गर्भगृह में नवीन रूप से स्थापित संगमरमर की एकमुखी कार्तिक स्वामी की मूर्ति है। गर्भगृह में स्थित सीढ़ीनुमा मार्ग से नीचे उतरने पर काशीनाथ भारती महाराज की समाधि देखी जा सकती है। उन्होंने इस क्षेत्र में अनेक वर्षों तक तपस्या की थी। मंदिर के प्रांगण में चंपा के वृक्ष के नीचे दो वीर-शिला हैं। आगे थोड़ी दूरी पर दो तपस्वियों की समाधियाँ हैं। संपूर्ण परिसर वटवृक्षों और घने पेड़ों से आच्छादित है।
श्रावण मास के प्रथम सोमवार तथा कार्तिक पूर्णिमा को यहाँ मेला भरता है। इस मंदिर में महिलाओं का प्रवेश वर्जित है। धन-वृद्धि और पारिवारिक बाधाओं के निवारण हेतु यहाँ मन्नत माँगने वाले श्रद्धालुओं की संख्या अधिक रहती है। यह एक जागृत स्थान माना जाता है। ऐसी जनश्रद्धा है कि यहाँ देव मनोकामना पूर्ण करते हैं। ऐसी भी मान्यता है कि जिन व्यक्तियों को मंगल दोष हो, वे कृतिका नक्षत्र पर कार्तिक स्वामी के दर्शन कर लें, तो मंगल दोष शांत होता है। अतः कार्तिक पूर्णिमा के दिन कृतिका नक्षत्र पर यहाँ सहस्रों श्रद्धालु एकत्रित होते हैं।