
वाई तालुक्यातील चंदन आणि वंदन या दोन किल्ल्यांच्या मध्यभागी ऐतिहासिक व समृद्ध वारसा लाभलेल्या किकली या गावातील भैरवनाथाचे मंदिर प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या इतर मंदिरांच्या तुलनेने या मंदिराची रचना, बांधकाम व त्यावरील शिल्परचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. अश्विन महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. येथील वैशिष्ट्य असे की गावच्या बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते आणि त्यावेळी देवाच्या पालखीवर गुलाल, खोबरे व पेढ्यांची उधळण होते. पेढ्यांची उधळण होणारी ही जिल्ह्यातील एकमेव यात्रा आहे.
किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला भैरवनाथ मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. या मंदिराच्या स्थापत्य रचनेवरून ते १२व्या शतकातील यादावकाळातील असल्याचे सांगितले जाते. मंदिराच्या समोरील बाजूस उंच दगडी दीपमाळ व त्याच्या शेजारीच गणेशवंदना स्तंभ आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या या मंदिराची रचना त्रिदल (तीन गर्भगृह असणारे) पद्धतीची आहे. यामध्ये कक्षासनयुक्त (भिंतीत बसण्यासाठी दगडी बाकांची रचना) मुखमंडप आहे. मुखमंडपाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या भिंतीवर असणाऱ्या विविध प्रकारच्या व्यालशिल्पांना मेष, शुक्र,
अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह व व्याघ्र अशी मुखे आहेत. याशिवाय मैथुन शिल्पे व विविध वाद्य वाजविणारे वादक अशी शिल्पे आहेत. मुखमंडपाच्या छतावर झुंबरे कोरलेली आहेत.
मुखमंडपातून सभामंडपाकडे जाताना प्रवेशद्वारावर द्वारपाल, सेवक व इतर शिल्पे दिसतात. सभामंडपात वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम असणारे पूर्णस्तंभ व अर्धस्तंभ असून या स्तंभांच्या मध्यभागी असलेल्या आयताकृती सपाट पृष्ठभागावर रामायणातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. त्यामध्ये सुवर्णमृगाचे रूप घेतलेल्या मारीच राक्षसाचा वध, वाली–सुग्रीव युद्ध, श्रीरामांकडून झालेला वाली वध, श्रीराम–हनुमान भेट, हनुमानाकडून अशोकवनाचा विध्वंस, अशोकवनात राक्षसांचे सीतेला धमकावणे, कुंभकर्ण व रावण वध यांचा समावेश आहे. याशिवाय या स्तंभांवर त्रिविक्रम, शिवतांडव, वामनावतार, हरिहर, नर्तकी व दर्पणसुंदरी यांचीही शिल्पे आहेत. या सर्व वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांनी हा सभामंडप व्यापून गेला असून या सभामंडपातच अखंड दगडातील नंदीची मूर्ती आहे.
सभामंडपाच्या पुढे असलेल्या अंतराळात दोन देवड्या आहेत. त्यातील एकात शंकर पार्वती, तर दुसऱ्यात मच्छिंद्रनाथ यांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. सभामंडपाच्या समोर, उजव्या व डाव्या बाजूकडे तीन गर्भगृहे आहेत. त्यातील मुख्य व दक्षिण गर्भगृहात शिवपिंडी असून उत्तरेकडील गर्भगृहात भैरवनाथांची मूर्ती आहे. सभामंडपातील नंदीचे मुख हे शिवलिंग असलेल्या गर्भगृहांकडे नसून ते भैरवनाथांच्या गर्भगृहाच्या दिशेने झुकलेले दिसते. भैरवनाथांच्या गर्भगृहासमोरील अंतराळ हा तुलनेने इतर दोन अंतराळापेक्षा रेखीव आहे.
मंदिराच्या मागच्या बाजूला एक लहानसे शिखर असून इतर पृष्ठभाग हा सपाट आहे. या कळसाकडील भागावरही विविध शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रांगणात उजवीकडे असलेल्या लहान मंदिरात दत्ताची मूर्ती आहे. याशिवाय एक पडके मंदिर असून त्यात एक शिवपिंडी आहे. किकली गावात व परिसरात सापडलेल्या अनेक विरगळींचे येथे जतन करण्यात आले आहे. असे सांगितले जाते की येथे तीन प्राचीन मंदिरांचा समूह होता. १६४९ साली जेव्हा अफजल खानाला वाई प्रांताची सुभेदारी मिळाली होती, तेव्हा त्याने येथील दोन मंदिरे पाडून त्या दगडांचा वापर त्याच्या वाड्याच्या बांधकामासाठी केला होता.
अश्विन महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आणि रविवारी भैरवनाथांची मोठी यात्रा भरते. अनेक वर्षांपासून या गावातील व परिसरातील बारा बलुतेदारांकडून या यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यावेळी शनिवारी देवाची महापूजा होते. मध्यरात्री भैरवनाथ व शेजारी असलेल्या जांब या गावातील चिलाई देवीची भेट हा महत्त्वाचा विधी असतो. या यात्रेसाठी हजारो भाविक येथे येतात. रविवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारी भैरवनाथांची मिरवणूक (छबिना) निघते. नवसाला पावणारा भैरवनाथ अशी या देवाची ख्याती असल्यामुळे नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून या छबिन्यात पेढे, खोबरे व गुलालाची उधळण केली जाते. पेढ्यांची उधळण हा प्रकार अन्यत्र कुठे पाहायला मिळत नाही.
या मंदिराबाबत असे सांगितले जाते की यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री या मंदिरात ३६५ दिवे लावले जातात. त्यावेळी गावातील परिट समाजातील एका व्यक्तीच्या अंगात येते आणि ती व्यक्ती त्या दिव्यांवरून उडी मारून भैरवनाथांच्या गाभाऱ्यासमोर असलेल्या दगडी स्तंभाला डोक्याने धडक मारते. हा प्रकार शेकडो भाविकांसमोर तीन वेळा केला जातो. तरीही त्या व्यक्तीला काही दुखापत होत नाही.
या मंदिराची रचना, पुरातत्त्वीय व ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन जून २००० मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे हे मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

वाई तहसील में स्थित चंदन और वंदन नामक दो किले हैं। इनके मध्य भाग में समृद्ध ऐतिहासिक और सांस्कृतिक परंपरा वाला किकली गाँव बसा है। यहाँ का भैरवनाथ मंदिर अत्यंत प्रसिद्ध है। सतारा जिले के अन्य मंदिरों की तुलना में इसकी संरचना विशेष है। इसका निर्माण और शिल्पकला श्रद्धालुओं का ध्यान आकर्षित करती है। आश्विन मास में यहाँ भव्य मेला आयोजित होता है। इस मेले की विशेषता यह है कि गाँव के ‘बारह बलुतेदारों’ द्वारा इसका आयोजन किया जाता है। उस समय देवता की पालकी पर गुलाल, नारियल और पेड़े (मिठाई) की वर्षा की जाती है। यह जिले का एकमात्र ऐसा मेला माना जाता है, जिसमें पेड़ों की लूट मचाई जाती है।
किकली गाँव में प्रवेश करते ही सड़क की बाईं ओर भैरवनाथ मंदिर का प्रवेश द्वार दिखाई देता है। इसके स्थापत्य के आधार पर इसे 12वीं शताब्दी के यादवकाल का माना जाता है। मंदिर के सम्मुख पाषाण की ऊँची दीपमाला है। उसके पास ‘गणेश वंदना स्तंभ’ स्थित है। यह पूर्वाभिमुख मंदिर ‘त्रिदल’ प्रकार का है। इसमें ‘कक्षासनयुक्त’ मुखमंडप बना है।
मुखमंडप की बाईं और दाईं ओर की दीवारों पर मेष, शुक्र, अश्व, वृषभ, गर्दभ, सिंह, वराह और व्याघ्र जैसे मुखों वाले विविध ‘व्याल-शिल्प’ उत्कीर्ण हैं। इसके अतिरिक्त यहाँ मैथुन-शिल्प भी हैं। विभिन्न वाद्य यंत्र बजाने वाले वादकों के शिल्प भी दिखाई देते हैं। मुखमंडप की छत पर झूमर की आकृतियाँ उकेरी गई हैं।
मुखमंडप से सभामंडप में प्रवेश करते समय द्वार पर द्वारपाल, सेवक और अन्य शिल्प दिखाई देते हैं। सभामंडप अलंकृत पूर्ण और अर्ध-स्तंभों से सुसज्जित है। इन स्तंभों के मध्यवर्ती आयताकार पट्टों पर रामायण के विभिन्न प्रसंगों को बड़ी कुशलता से अंकित किया गया है। जैसे-स्वर्ण मृग का रूप धारण करने वाले मारीच का वध और वाली-सुग्रीव युद्ध। इसमें श्रीराम द्वारा वाली का वध और श्रीराम-हनुमान मिलन दिखाया गया है। हनुमान द्वारा अशोक वाटिका का विध्वंस और वहाँ राक्षसों द्वारा सीता जी को डराना भी अंकित है। इसमें कुंभकर्ण और रावण वध के प्रसंग भी हैं। इसके अतिरिक्त त्रिविक्रम, शिव तांडव, वामनावतार, हरिहर, नर्तकी और दर्पण-सुंदरी के चित्र भी उत्कीर्ण हैं। इसी सभामंडप में अखंड काले पाषाण से निर्मित नंदी की मूर्ति स्थित है।
सभामंडप के आगे स्थित अंतराल में दो देवकोष्टक हैं। इनमें से एक में शंकर-पार्वती तथा दूसरी में मच्छिंद्रनाथ की काले पाषाण की मूर्तियाँ हैं। सभामंडप के सामने, दाईं और बाईं ओर कुल तीन गर्भगृह हैं। मुख्य एवं दक्षिण गर्भगृह में शिवलिंग स्थापित है। उत्तरी गर्भगृह में भैरवनाथ की मूर्ति स्थापित है। विशेष बात यह है कि सभामंडप में स्थित नंदी का मुख शिवलिंग की दिशा में न होकर भैरवनाथ के गर्भगृह की ओर है। भैरवनाथ के गर्भगृह के सम्मुख स्थित अंतराल अन्य दोनों की तुलना में अधिक सुशोभित है।
मंदिर के पीछे की ओर एक छोटा शिखर है। अन्य भाग समतल है। शिखर वाले भाग पर भी शिल्पांकन किया गया है। मंदिर परिसर में दाईं ओर स्थित एक छोटे मंदिर में भगवान दत्त की मूर्ति है। इसके अलावा एक जीर्ण मंदिर भी है। इसमें शिवलिंग स्थित है। किकली और आसपास के क्षेत्र से प्राप्त कई ‘वीर-शिलाओं’ को भी यहाँ संरक्षित किया गया है। ऐसा माना जाता है कि पहले यहाँ तीन प्राचीन मंदिर थे। किंतु सन् 1649 में जब अफजल खान को वाई प्रांत की सुभेदारी मिली, तो उसने इनमें से दो मंदिर तोड़ दिए। उसने उनके पत्थरों का उपयोग अपनी हवेली के निर्माण में किया था।
आश्विन मास के तीसरे शनिवार और रविवार को भैरवनाथ का यह मेला आयोजित होता है। लंबे समय से इस मेले का आयोजन गाँव के ‘बारह बलुतेदारों’ द्वारा किया जाता है। शनिवार को देवता की महापूजा होती है। मध्यरात्रि को भैरवनाथ और समीप स्थित जांब गाँव की चिलाई देवी की भेंट का प्रमुख विधि-विधान संपन्न होता है। रविवार को दोपहर में भैरवनाथ की शोभायात्रा निकलती है। मन्नत पूरी होने पर श्रद्धालु इस शोभायात्रा में पेड़े, नारियल और गुलाल की वर्षा करते हैं। ऐसी पेड़ों की वर्षा अन्यत्र कहीं देखने को नहीं मिलती।
ऐसा कहा जाता है कि मेले के प्रथम दिन रात्रि के समय मंदिर में 365 दीप प्रज्वलित किए जाते हैं। उस समय गाँव के धोबी समुदाय के एक व्यक्ति में देवता का प्रकटीकरण होता है। वह व्यक्ति उन प्रज्वलित दीपों के ऊपर से कूदकर भैरवनाथ के गर्भगृह के सामने स्थित पाषाण-स्तंभ पर अपने सिर से तीन बार प्रहार करता है। फिर भी उसे कोई चोट नहीं आती।
मंदिर की संरचना और इसके पुरातात्त्विक एवं ऐतिहासिक महत्व को ध्यान में रखते हुए, जून 2000 में महाराष्ट्र सरकार द्वारा इसे ‘राज्य संरक्षित स्मारक’ घोषित किया गया है।