आत्मगजानन मंदिर

अंगापूर, ता. सातारा, जि. सातारा

सातारा तालुक्यात असलेले अंगापूर हे गाव गणपतीच्या भद्रोत्सवासाठी प्रसिद्ध आहे. या गावचे वैशिष्ट्य असे की येथे कोणत्याही घरात अथवा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जात नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असताना अंगापूरमध्ये मात्र गणेशोत्सवाऐवजी आत्मगजानन मंदिरात आगळावेगळा भद्रोत्सव साजरा होतो. येथील आत्मगजाननाची मूर्ती ही मोरगावच्या मयुरेश्वराचे रूप असल्याचे मानले जाते. राज्य सरकारनेही या मंदिराला तीर्थस्थानाचादर्जा देऊन त्याचा गौरव केला आहे.

येथील मंदिराची आख्यायिका अशी की साधारणतः ३५० वर्षांपूर्वी अंगापूरमधील सुवर्णकार समाजातील एक गणेश भक्त प्रत्येक संकष्टी चतुर्थीला मोरगाव येथे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पायी जात असे. अनेक वर्षे त्याचा हा नित्यक्रम होता; परंतु वृद्धत्वामुळे त्याला मोरगावी जाणे अवघड होऊ लागले. एका चतुर्थीस गेल्यावर त्याने गणेशाला सांगितले की हे मयुरेश्वरा आजपर्यंत मी तुझी सेवा केली; परंतु वृद्ध झाल्याने आता यापुढे ती सेवा शक्य होणार नाही. त्यावेळी मयुरेश्वराने त्याला दृष्टांत दिला की मी तुझ्याबरोबर येत आहे, पण तू मागे वळून पाहू नको, नाहीतर मी तेथेच थांबेन. गणेशभक्त परत येण्यास निघाला; परंतु अंगापूरजवळ आल्यावर त्याने मागे वळून पाहिले असता तेथेच मयुरेश्वर अदृश्य झाले. ज्या ठिकाणी मयुरेश्वर अदृश्य झाले, त्या ठिकाणी गणेशाची मूर्ती प्रकट झाली. त्याच ठिकाणी मंदिर बांधून गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेच स्थान आज स्वयंभू आत्मगजानन मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे.

सातारा शहरापासून पूर्वेकडे कृष्णा नदीकाठी अंगापूर गाव वसले आहे. समर्थ रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गावाला संत गाडगे महाराज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला आहे. अंगापूर येथील कृष्णा नदीच्या डोहात समर्थ रामदास स्वामी यांना श्रीराम आंग्लाई देवीच्या मूर्ती सापडल्या होत्या. त्यातील श्रीरामांची मूर्ती समर्थांनी चाफळ येथील मंदिरात, तर आंग्लाई देवीची मूर्ती ही सज्जनगडावर प्रतिष्ठापित केली होती. असे सांगितले जाते की या आंग्लाई देवीच्या नावावरूनच या गावाला अंगापूर असे नाव पडले आहे.

आत्मगजानन मंदिर हे अंगापूर गावचे ग्रामदैवत आहे. या मंदिराभोवती मोठी तटबंदी असून त्या तटबंदीमधील प्रवेशद्वारातून मंदिर परिसरात प्रवेश होतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूस हनुमान मंदिर, तर आतील भागात अनेक ओवऱ्या असून तेथे धार्मिक विधी करण्याची भाविकांना थांबण्याची सुविधा आहे. मंदिराचे आवार मोठे असून सर्वत्र दगडी फरसबंदी करण्यात आलेली आहे. येथील मुख्य मंदिर हे गणपतीचे असून त्याचे बांधकाम पेशवेकालीन आहे. मंदिरासमोर दोन उंच दीपमाळा मंदिराच्या सभामंडपात स्वयंचलित कारंजे आहे. मंदिराचे बांधकाम करतानाच पावसाचे पाणी साठविण्याची स्वयंचलित रितीने ते येथील कारंजात येण्याची योजना करण्यात आली होती.

गर्भगृहात उत्तराभिमुख शेंदूरचर्चित आत्मगजाननाची चार फूट उंचीची मूर्ती आहे. या मूर्तीचे डोळे चांदीचे आहेत. अष्टविनायकांपैकी मोरगाव येथील मयुरेश्वराची मूर्ती येथील मूर्तीमध्ये साम्य असल्याचे सांगितले जाते. याशिवाय या आवारात महादेवाचे मंदिर असून मंदिराबाहेर एका मोठ्या चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. १९१८ मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये महादेव मंदिराच्या कळसावर वीज पडल्याने येथील प्राचीन शिवपिंडी भंग पावली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी रुद्राभिषेक, धार्मिक विधी करून येथे नवीन शिवपिंडीची प्रतिष्ठापना केली.

अंगापूर या गावात स्वयंभू गणेशाचे जागृत स्थान असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात येथे कोणत्याही घरात अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला जात नाही. नोकरीव्यवसायानिमित्त येथील ग्रामस्थ परगावी असतील तरीही ते आपल्या घरात गणेशोत्सव साजरा करीत नाहीत. गणेशोत्सव म्हणजे या गावची जत्रा असून या उत्सवाला येथेभद्रोत्सवअसे म्हणतात. भाद्रपद चतुर्थी आणि पंचमी या दोन दिवस चालणाऱ्या भद्रोत्सवाला २०० वर्षांची परंपरा आहे. येथील भद्रोत्सवाचे स्वरूप असे आहे की या उत्सवाचा मुख्य मान हा येथील सुवर्णकार समाजाला आहे. सुवर्णकार समाजाचा मानकरी नागपंचमी ते गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस हा साधारणतः एक महिन्याचा काळ (अधिक महिना असेल तर दोन महिने) आत्मगजानन मंदिरामध्येच थांबतो. या काळात दररोज गावाजवळील कृष्णा नदीवर स्नान करून गावातील जेवढी दैवते आहेत, त्यांना तो जलाभिषेक करतोया कालावधीत त्याने इतर कोणत्याही व्यक्तीला स्पर्श करायचा नसतो.

या गावात आणखी एक परंपरा आहे, ती म्हणजे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी कृष्णेवर स्नान करून अंगापूर, फडतरवाडी, लिंबाचीवाडी येथील सुमारे ६०० ते ७०० आबालवृद्ध ६० ते ६५ किलोमीटर अंतर अनवाणी चालत अंगापूरची प्रदक्षिणा (या प्रदक्षिणेला स्थानिक भाषेतदोराअसे म्हटले जाते) पूर्ण करतात. यावेळी ते परिसरातील दैवतांना जलाभिषेक करतात. हे सर्व दोरेकरी गणेश चतुर्थीच्या दिवशी दुपारी मंदिराजवळ परततात. त्यावेळी तेथे नवसाची तान्ही बाळे जमिनीवर ठेवली जातात. दोरेकरी या बाळांना ओलांडून पुढे जातात. या विधीनंतर दोरेकऱ्यांकडूनमोरया म्हणा दोरया…’ या जयघोषात मंदिराला पाच प्रदक्षिणा केल्या जातात.

भद्रोत्सवाचा मुख्य दिवस हा गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस म्हणजे पंचमीचा असतो. या दिवशी संध्याकाळी महिनाभर गणेशाची सेवा करणाऱ्या सुवर्णकार भाविकाच्या डोक्यावर भद्रपात्र (मातीचे मडके ज्याला खालच्या बाजूने फोडून त्याला पात्राचा आकार आणला जातो) दिले जाते. या पात्रात उद, धूप, कापूर, खारीक टाकून ते प्रज्वलित करण्यात येते. ते डोक्यावर घेऊन हा भक्त संपूर्ण गावातून फेरी मारतो. ही फेरी एक तासाची असते. या फेरीमध्ये भाविक या भद्रपात्रात ठिकठिकाणी उद टाकत असतात. ‘मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरयाच्या जयघोषाने अंगापूरचा परिसर यावेळी दुमदुमून जातो. ही फेरी मंदिराजवळ आल्यानंतर भद्रपात्राचे विसर्जन होते. या उत्सवाला आत्मगजाननाचा भद्रोत्सव असेही म्हटले जाते.

उपयुक्त माहिती:

  • कोरेगावपासून १५ किमी, तर सातारा शहरापासून २० किमी अंतरावर
  • सातारा कोरेगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

आत्मगजानन मंदिर

अंगापूर, तह. सातारा, जि. सातारा

सातारा तहसील के अंगापूर गाँव को भद्रोत्सव के लिए प्रसिद्ध माना जाता है। इस गाँव की विशेषता यह है कि यहाँ किसी भी घर में या सार्वजनिक रूप से गणेशोत्सव नहीं मनाया जाता। पूरे महाराष्ट्र में गणेशोत्सव मनाया जाता है। अंगापूर में गणेशोत्सव की जगह आत्मगजानन मंदिर में अनोखा भद्रोत्सव आयोजित होता है। यहाँ की आत्मगजानन मूर्ति मोरगाँव के मयुरेश्वर का स्वरूप मानी जाती है। राज्य सरकार ने भी इस मंदिर को तीर्थस्थान की ‘क’ श्रेणी में सम्मिलित किया है।

मंदिर की आख्यायिका के अनुसार लगभग 350 साल पहले अंगापूर के सुवर्णकार समाज का एक भक्त हर संकष्टी चतुर्थी को मोरगाँव जाकर मयुरेश्वर के दर्शन के लिए पैदल जाता था। कई सालों तक यह उसकी दिनचर्या रही। किंतु वृद्धावस्था के कारण मोरगाँव जाना कठिन हो गया। एक चतुर्थी को उसने गणेश से कहा कि अब मैं आपकी सेवा नहीं कर सकता। तब मयुरेश्वर ने उसे दृष्टांत दिया कि मैं तुम्हारे साथ आ रहा हूँ। तुम पीछे मुड़कर नहीं देखना, अन्यथा मैं वहीं रुक जाऊँगा। जब वह भक्त अंगापूर के पास पहुँचा और उसने पीछे मुड़कर देखा तो मयुरेश्वर अदृश्य हो गए। जिस स्थान पर मूर्ति अदृश्य हुई, वहीं गणेश की मूर्ति प्रकट हुई। उसी स्थान पर मंदिर बनाकर गणेश की प्रतिष्ठा की गई। यह स्थान आज स्वयंभू आत्मगजानन मंदिर के नाम से प्रसिद्ध है।

सातारा शहर से पूर्व की ओर कृष्णा नदी के तट पर अंगापूर गाँव स्थित है। समर्थ रामदास स्वामी के निवास से यह गाँव पावन हुआ है। इस गाँव को संत गाडगे महाराज और कर्मवीर भाऊराव पाटिल का भी सान्निध्य प्राप्त हुआ। कृष्णा नदी के कुंड में समर्थ रामदास स्वामी को श्रीराम और आंग्लाई देवी की मूर्तियाँ मिली थीं। श्रीराम की मूर्ति समर्थ ने चाफल के मंदिर में प्रतिष्ठित की। आंग्लाई देवी की मूर्ति सज्जनगढ़ पर स्थापित की। इसी आंग्लाई देवी के नाम पर गाँव का नाम अंगापूर पड़ा।

आत्मगजानन मंदिर गाँव का ग्रामदैवत है। मंदिर के चारों ओर विशाल सुरक्षा दीवार है। इसके प्रवेशद्वार से मंदिर परिसर में प्रवेश होता है। सुरक्षा दीवार के बाहरी हिस्से में हनुमान मंदिर है। इसके भीतरी भाग में कई छोटे कक्ष हैं। यहाँ धार्मिक विधि करने और श्रद्धालुओं के ठहरने के लिए भक्तनिवास की सुविधा है। मुख्य मंदिर गणेश का है। इसका निर्माण पेशवाकालीन है। मंदिर के सम्मुख दो ऊँची दीपमालाएँ हैं। सभामंडप में स्वयंचलित फव्वारे हैं।

गर्भगृह में उत्तराभिमुख चार पद ऊँची शेंदूरचर्चित आत्मगजानन मूर्ति है। मूर्ति की आँखें चाँदी की हैं। अष्टविनायकों में मोरगाँव के मयुरेश्वर की मूर्ति और यहाँ की मूर्ति में समानता पाई जाती है। मंदिर परिसर में महादेव का मंदिर भी है। इसमें बाहर चबूतरे पर नंदी की मूर्ति है। वर्ष 1918 में प्राकृतिक आपदा के समय महादेव मंदिर के कलश पर बिजली गिरने से प्राचीन शिवलिंग क्षतिग्रस्त हुआ। इसके पश्चात ग्रामवासियों ने रुद्राभिषेक कर नया शिवलिंग प्रतिष्ठापित किया।

अंगापूर में स्वयंभू गणेश का जागृत स्थान होने के कारण, यहाँ किसी भी घर या सार्वजनिक स्थान पर गणेशोत्सव नहीं मनाया जाता। यहाँ गणेशोत्सव ग्रामोत्सव के रूप में मनाया जाता है। इसे ‘भद्रोत्सव’ कहा जाता है। भाद्रपद की चतुर्थी और पंचमी को आयोजित भद्रोत्सव 200 वर्षों से परंपरा में है। इस उत्सव में मुख्य मान सुवर्णकार समाज का होता है।

गाँव में एक अन्य परंपरा यह है कि गणेश चतुर्थी से एक दिन पूर्व कृष्णा नदी में स्नान किया जाता है। अंगापूर, फडतरवाडी और लिंबाचीवाडी से लगभग 600–700 लोग 60–65 किलोमीटर की दूरी पैदल तय करते हैं। वे अंगापूर की प्रदक्षिणा (‘दोरा’) पूरी करते हैं। इस दौरान देवताओं का जलाभिषेक किया जाता है। परिक्रमा पूर्ण कर श्रद्धालुओं द्वारा ‘मोरया म्हणा दोरया’ के जयघोष के साथ पाँच परिक्रमाएँ मंदिर के चारों ओर की जाती हैं।

भद्रोत्सव का मुख्य आयोजन गणेश चतुर्थी के दूसरे दिन, अर्थात पंचमी (ऋषि पंचमी) को होता है। इस दिन, पूरे मास गणेश जी की अनन्य सेवा करने वाले सुवर्णकार (स्वर्णकार) समुदाय के मुख्य भक्त के शीश पर ‘भद्रपात्र’ (मिट्टी का एक विशेष पात्र) रखा जाता है। इस धूपदानी स्वरूप पात्र में लोबान, धूप, कपूर और छुहारे डालकर अग्नि प्रज्वलित की जाती है। वह श्रद्धालु इस प्रज्वलित पात्र को धारण कर संपूर्ण ग्राम की परिक्रमा करता है। इस यात्रा के दौरान अन्य श्रद्धालु विभिन्न स्थानों पर भद्रपात्र में धूप अर्पित करते हैं। पूरा वातावरण ‘मोरया म्हणा दोरया, दोरया म्हणा मोरया’ के भक्तिमय जयघोष से गुंजायमान हो उठता है। परिक्रमा के पश्चात भद्रपात्र का विधिपूर्वक विसर्जन किया जाता है। इस उत्सव को ‘आत्मगजानन का भद्रोत्सव’ के नाम से भी जाना जाता है।

प्रमुख विशेषताएँ

  • कोरेगांव से 15 किमी, सातारा शहर से 20 किमी।
  • सातारा और कोरेगांव से एसटी की सुविधा।
  • निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
  • परिसर में निवास और जलपान की सुविधा नहीं है।
Back To Home