गोंदवलेकर महाराज मंदिर,

गोंदवले, ता. माण, जि. सातारा

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी संत एकनाथ महाराज या संतांमुळे महाराष्ट्र ही संतभूमी म्हणून ओळखली जाते. या संतांच्या मांदियाळीतील एक संत म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. लाखो भक्तांना रामनामाच्या भक्तीत तल्लीन करणारे आणि अन्नदानाचा महिमा सांगणारे गोंदवलेकर महाराज यांची सातारा जिल्ह्यातील गोंदवले ही जन्मभूमी. माण तालुक्यातील माणगंगा नदीच्या काठावर असलेले गोंदवले हे गाव महाराजांच्या येथील वास्तव्याने आज संपूर्ण देशात पुण्यक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.

गोंदवलेकर महाराजांचा जन्म १८४५ साली झाला. त्यांचे मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे असे होते. त्यांच्या घरामध्ये धार्मिक वातावरण होते. लहानपणापासून भजन, किर्तन पारायण ऐकल्यामुळे वैराग्य येऊन गुरूचा शोध घेण्यासाठी ते वयाच्या बाराव्या वर्षीच घराबाहेर पडले. या काळात त्यांनी तत्कालीन बहुतेक संतांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये हरिपूर (सांगली) येथील साध्वी राधाबाई, मिरजेचे सत्पुरुष अण्णाबुवा, सटाण्याचे देव मामलेदार, अक्कलकोटचे श्रीस्वामी, हुमणाबादचे माणिक प्रभु, काशीचे तैलंगस्वामी, दक्षिणेश्वरचे श्रीरामकृष्ण परमहंस यांचा समावेश होता. श्रीरामकृष्णांनी त्यांना येहळेगांवच्या श्रीतुकाराम चैतन्यांकडे जाण्यास सांगितले. गुरूंनी खडतर कसोट्या घेऊन त्यांना अनुग्रह केला आणि ब्रह्मचैतन्य असे नाव ठेवले. सद्गुरु भेटल्यावर त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाऊन वयाच्या केवळ पंंधराव्या वर्षी त्यांनी पूर्ण सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली होती.

परमेश्वरप्राप्तीचा सुलभ मार्ग म्हणून सर्वसामान्य भाविकांना उपदेश देण्यात गोंदवलेकर महाराजांनी आपले आयुष्य खर्ची घातले. श्रीरामाचे सतत स्मरण करावे, रामाची भक्ती केल्यामुळे संसार सुखाचा होतो, नामात दंग झाल्याने राम आपल्या मागे आहे याचा अनुभव येतो, असा ते भाविकांना सतत उपदेश करीत असत. देशभरात अनेक ठिकाणी त्यांनी श्रीराम, श्रीदत्त शनिदेव यांची मंदिरे बांधली. इतरांनाही मंदिरे बांधण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्री गोंदवलेकर महाराजांनी स्वतः देशभरात २५ हून अधिक राम मंदिरे स्थापन केली. यामध्ये थोरले राममंदिर, आटपाटी दत्तमंदिर धाकटे राममंदिर (गोंदवले), बेलधडी राममंदिर आनंदराम मंदिर (जालना), जवळगेकर राममंदिर (सोलापूर) तिळवणकर राममंदिर (वाराणसी), पट्टाभीराम राममंदिर (हरदा, मध्य प्रदेश), सोरटी राममंदिर (उज्जैन), मांडवे राममंदिर (सोलापूर), यावंगल राममंदिर (कर्नाटक), दत्तमंदिर (सातारा), आटपाडी येथील राममंदिराचा समावेश आहे. याशिवाय शेकडो मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्वार केला.

१८७६ १८९६ या वर्षांमध्ये प्रचंड दुष्काळ पडला असता त्यांनी गोंदवले आणि जवळच्या गावांतील लोकांसाठी आपली धान्याची कोठारे खुली केली. लोकांना स्वत:च्या शेतावर कामाला लावून त्यांच्या रोजच्या जेवणाची सोय केली. दुर्बल, गरीब आणि वृद्धांना मोफत अन्नदान केले. गोंदवलेकर महाराजांचे हे कार्य पाहून औंधच्या तत्कालीन राजानेही त्यांची स्तुती केली होती. गोंदवलेकर महाराजांनी जनावरांवर खूप माया केली. येथून जवळ असलेल्या म्हसवडमधील बाजारातील कसायांकडून गायी विकत घेऊन त्यांना जीवदान दिले त्यांच्यासाठी गोशाळा बांधली.

आयुष्यभर त्यांनी रामदासी संप्रदायाचा प्रसार प्रचार केला. २२ डिसेंबर १९१३ या दिवशी गोंदवलेमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. येथेच त्यांची समाधी आहे. येथील समाधी मंदिराची उभारणी १९३६३७ साली झाली. मंदिरात प्रशस्त सभामंडप त्यासमोरील गर्भगृहात गोपाळकृष्णाची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या खालच्या बाजूला महाराजांचे समाधी स्थान आहे. पायऱ्या उतरून तेथे जावे लागते. समाधीवर श्रीराम, लक्ष्मण, सीता मारुती यांच्या मूर्ती आहेत. मंदिरात सततश्रीराम जयराम जयजय रामहा जप सुरू असतो. सकाळी सायंकाळी होणाऱ्या महाराजांच्या आरतीसाठी या सभामंडपात शेकडो भाविक असतात. याच ठिकाणी नित्य कीर्तन भजनाचे कार्यक्रम होत असतात.

समाधी मंदिराच्या मागे एक तुळशी वृंदावन आहे. याच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या मंडपामध्ये महाराजांच्या आईसाहेबांची समाधी आहे. मंदिराच्या पश्चिमेस गोशाळा आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या गायी आहेत. त्यांची नावे नद्यांच्या नावांवरून ठेवलेली आहेत. दर गुरुवारी आणि पौर्णिमेला येथे मोठ्या संख्येने भाविक येतातआलेल्या सर्व भाविकांना मंदिर संस्थानतर्फे मोफत महाप्रसाद भक्त निवासात राहण्याची सोय करण्यात येते. याव्यतिरिक्त समाधी मंदिरात दर्शनासाठी इतर दिवशीही हजारो भाविकांची गर्दी असते. सकाळी .३० ते रात्री १० पर्यंत भाविकांना महाराजांच्या समाधीचे दर्शन घेता येते

समाधी मंदिरापासून एक किमी अंतरावर असलेल्या गोंदवले गावातील थोरले राम मंदिर त्यासमोर असलेल्या हनुमान मंदिराचेही आध्यात्मिक ऐतिहासिक महत्त्व आहे.

गोंदवलेकर महाराज चरित्र वाड्‌मय या ग्रंथानुसार, महाराज गुरूच्या शोधार्थ बालपणी घरातून बाहेर पडले आणि गुरूची कृपा ब्रह्मचैतन्य नाम प्राप्त करून ते १८६५ मध्ये गोंदवले येथील हनुमान मंदिरात आले. अनेक दिवस त्यांचे येथे वास्तव्य होते. मंदिरात कोणी महात्मा आला आहे ही वार्ता सर्वत्र पसरली, तेव्हा महाराजांचे आईवडील त्यांना या मंदिरात भेटण्यासाठी आले होते.

आईवडिलांचे दर्शन घेऊन महाराज तीर्थयात्रेसाठी गेले आणि बरोबर एक वर्षांनी ते पुन्हा गोंदवले येथे आले होते. आध्यात्मिक महत्त्वासोबतच या मंदिराला ऐतिहासिक महत्त्वही आहे.

१९४२ मधील स्वातंत्र्य लढ्याची माण तालुक्यातील प्रथम ज्योत या मंदिरात पेटली महात्मा गांधीजींच्याचले जावचा उठाव करणारी घोषणा या मंदिरातून स्वातंत्र्यवीर धोंडीराम नाना पिसाळ संभाजीराव तात्यासाहेब पाटील यांच्या साथीने पुकारली गेली.

उपयुक्त माहिती:

  • सातारा शहरापासून ६४ किमी, तर पुण्याहून 
  • १५३ किमी अंतरावर
  • अनेक शहरांतून गोंदवलेसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिरात दुपारी रात्री महाप्रसादाची सुविधा
  • निवासासाठी मंदिर समितीतर्फे सुसज्ज भक्त निवास
  • संपर्क : मंदिर कार्यालय : ०२१६५२५८२९२

गोंदवलेकर महाराज मंदिर

गोंदवले, तह. माण, जि. सतारा

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी और संत एकनाथ महाराज जैसे संतों के कारण महाराष्ट्र को संतभूमि के रूप में जाना जाता है। इन्हीं संतों की परंपरा में एक संत हैं – श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज। लाखों श्रद्धालुओं को रामनाम की भक्ति में तल्लीन करने वाले तथा अन्नदान के महत्व का उपदेश देने वाले गोंदवलेकर महाराज की जन्मभूमि सतारा जिले के गोंदवले में है। माण तहसील में माणगंगा नदी के तट पर स्थित यह गोंदवले गाँव महाराज के निवास के कारण आज पूरे देश में पुण्यक्षेत्र के रूप में प्रसिद्ध है।
गोंदवलेकर महाराज का जन्म सन् 1845 में हुआ। उनका मूल नाम गणपति रावजी घुगरदरे था। उनके घर में धार्मिक वातावरण था। बचपन से भजन, कीर्तन और पारायण सुनने के कारण उनमें वैराग्य उत्पन्न हुआ। गुरु की खोज में वे बारह वर्ष की आयु में ही घर से निकल पड़े। इस दौरान उन्होंने तत्कालीन अनेक संतों से भेंट की। इनमें हरिपुर (सांगली) की साध्वी राधाबाई, मिरज के सत्पुरुष अण्णाबुवा, सटाणा के देव मामलेदार, अक्कलकोट के श्रीस्वामी समर्थ, हुमणाबाद के माणिक प्रभु, काशी के तैलंगस्वामी और दक्षिणेश्वर के श्रीरामकृष्ण परमहंस आदि सम्मिलित थे।

श्रीरामकृष्ण परमहंस ने उन्हें येहलेगाँव के श्री तुकाराम चैतन्य के पास जाने को कहा। श्री तुकाराम चैतन्य ने गुरु के रूप में कठिन परीक्षाएँ लेकर उन्हें अनुग्रह दिया और ‘ब्रह्मचैतन्य’ नाम प्रदान किया। सद्गुरु की प्राप्ति के बाद उनके बताए मार्ग पर चलकर मात्र पंद्रह वर्ष की आयु में उन्होंने पूर्ण सिद्ध अवस्था प्राप्त कर ली थी।
परमेश्वर-प्राप्ति का सरल मार्ग बताने में गोंदवलेकर महाराज ने अपना जीवन समर्पित किया। वे श्रद्धालुओं को निरंतर उपदेश देते थे कि वे श्रीराम का निरंतर स्मरण करें। रामभक्ति से संसार सुखमय होता है। नाम में तल्लीन होने पर यह अनुभूति होती है कि राम सदैव अपने साथ हैं। देशभर में अनेक स्थानों पर उन्होंने श्रीराम, श्रीदत्त और शनिदेव के मंदिर बनवाए और दूसरों को भी मंदिर निर्माण के लिए प्रेरित किया। श्री गोंदवलेकर महाराज ने स्वयं देशभर में 25 से अधिक राम मंदिरों की स्थापना की। इनमें थोरले राम मंदिर, आटपाडी दत्त मंदिर और धाकटे राम मंदिर (गोंदवले), बेलधडी राम मंदिर और आनंदराम मंदिर (जालना), जवळगेकर राम मंदिर (सोलापुर), तिळवणकर राम मंदिर (वाराणसी), पट्टाभीराम राम मंदिर (हरदा, मध्य प्रदेश), सोरटी राम मंदिर (उज्जैन), मांडवे राम मंदिर (सोलापुर), यावंगल राम मंदिर (कर्नाटक), दत्त मंदिर (सतारा) और आटपाडी का राम मंदिर सम्मिलित हैं। इसके अतिरिक्त उन्होंने सैकड़ों मंदिरों का जीर्णोद्धार किया।

वर्ष 1876 और 1896 में जब भयंकर अकाल पड़ा, तब उन्होंने गोंदवले और आसपास के गाँवों के लोगों के लिए अपने धान्य-भंडार खोल दिए। उन्होंने लोगों को अपने खेतों में काम पर लगाकर उनके भोजन की व्यवस्था की। दुर्बल, निर्धन और वृद्धों को निःशुल्क अन्नदान किया। गोंदवलेकर महाराज के इस कार्य की प्रशंसा औंध के तत्कालीन राजा ने भी की थी। गोंदवलेकर महाराज को पशुओं से बहुत प्रेम था। उन्होंने समीपवर्ती म्हसवड के बाजार में कसाइयों से गोमाता को खरीदकर उन्हें जीवनदान दिया और उनके लिए गोशाला का निर्माण किया।

उन्होंने निरंतर रामदासी संप्रदाय का प्रचार किया। 22 दिसंबर 1913 को गोंदवले में ही उन्होंने देहत्याग किया। यहीं उनकी समाधि है। समाधि मंदिर का निर्माण 1936-37 में हुआ। मंदिर में विशाल सभामंडप है और उसके सम्मुख गर्भगृह में गोपालकृष्ण की मूर्ति है। गर्भगृह के नीचे महाराज की समाधि है, जहाँ जाने के लिए सीढ़ियों से उतरना पड़ता है। समाधि पर श्रीराम, लक्ष्मण, सीता और मारुति की मूर्तियाँ हैं। मंदिर में निरंतर “श्रीराम जयराम जय जय राम” का जप चलता रहता है। सुबह और सायंकाल की आरती में सभामंडप में सैकड़ों श्रद्धालु उपस्थित रहते हैं। यहीं प्रतिदिन कीर्तन और भजन होते रहते हैं।

समाधि मंदिर के पीछे एक तुलसी वृंदावन है। उसके पास एक बड़े मंडप में महाराज की माताजी की समाधि है। मंदिर के पश्चिम की ओर गोशाला है, जिसमें विभिन्न नस्लों की गायें हैं। इन गायों के नाम नदियों के नामों पर रखे गए हैं। प्रत्येक गुरुवार और पूर्णिमा को यहाँ भारी संख्या में श्रद्धालु आते हैं। आने वाले सभी श्रद्धालुओं के लिए संस्थान की ओर से निःशुल्क महाप्रसाद और भक्तनिवास में ठहरने की व्यवस्था की जाती है। अन्य दिनों में भी हजारों श्रद्धालु दर्शन हेतु आते रहते हैं। दर्शन का समय सुबह 4:30 से रात 10 बजे तक है।

समाधि मंदिर से एक किलोमीटर की दूरी पर स्थित गोंदवले के ‘थोरले राम मंदिर’ और उसके सम्मुख स्थित हनुमान मंदिर का भी आध्यात्मिक एवं ऐतिहासिक महत्व है। गोंदवलेकर महाराज के चरित्र और वाङ्मय के अनुसार, महाराज बचपन में गुरु की खोज में घर से निकले थे। वे गुरु कृपा प्राप्त कर ब्रह्मचैतन्य नामधारी होकर सन् 1865 में गोंदवले के इसी हनुमान मंदिर में आए। यहाँ उनका कई दिनों तक निवास रहा। जब यह बात फैली कि कोई महान संत यहाँ आए हैं, तब उनके माता-पिता उनसे मिलने मंदिर आए। माता-पिता के दर्शन कर महाराज तीर्थयात्रा पर चले गए और एक वर्ष बाद पुनः गोंदवले लौटे।

इस मंदिर का ऐतिहासिक महत्व भी है। सन् 1942 के स्वतंत्रता आंदोलन में माण तहसील में ‘भारत छोड़ो’ की प्रथम घोषणा इसी मंदिर से वीर धोंडीराम नाना पिसाल और संभाजीराव तात्यासाहेब पाटिल के सहयोग से हुई थी।

मुख्य विशेषताएँ

  • सतारा शहर से 64 किमी तथा पुणे से 153 किमी की दूरी।
  • अनेक शहरों से गोंदवले हेतु एसटी बस सुविधा उपलब्ध।
  • निजी वाहन मंदिर के वाहनतल तक जा सकते हैं।
  • दोपहर एवं रात में महाप्रसाद की व्यवस्था।
  • निवास हेतु सुसज्ज भक्तनिवास।
  • संपर्क : मंदिर कार्यालय : 02165-258292
Back To Home