मांढरदेवची काळूबाई

मांढरदेवगड, ता. वाई, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथे श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई देवीचे मंदिर आहे. राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये हे एक महत्त्वाचे देवीचे स्थान मानले जाते. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येतात. पौष पौर्णिमेपासून १० दिवस भरणारी येथील यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. यावेळी लाखो भाविक मांढरदेव गडावर येतात. नवसाला पावणारी मनोरथ पूर्ण करणारी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजातील अनेकांची ही कुलदेवी आहे.

काळूबाई देवीचे हे स्थान पुणे सातारा जिल्ह्यांच्या तसेच भोर, वाई खंडाळा या तालुक्यांच्या सीमेवर असून ते समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मांदार डोंगरावरील गर्द वनराईत देवी विराजमान आहे. या स्थानाला मांढरगड असेही म्हणतात. येथे येण्यासाठी सातारा जिल्ह्यातून वाईमार्गे, तसेच पुणे जिल्ह्यातून भोरमार्गे रस्ता आहे. येथून थेट वाहने मांढरगडावरील देवीच्या मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. याशिवाय सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून डोंगरावरील पायवाटेने येथे पोचता येते. या पायवाटेतून येताना म्हसोबाचे मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईं (मंडी आई) यांची मंदिरे लागतात. असे सांगितले जाते की मांडव्य ऋषींच्या येथील वास्तव्यामुळे या डोंगराचे नाव मांढरगड गावाचे नाव मांढरदेव असे पडले.

काळूबाई देवीबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की द्वापारयुगात दैत्यराजा रत्नासुर याचा सेनापती लाख्यासुर याला महादेवाकडूनकोणताही देव माणूस तुला दिवसात मारू शकत नाही’, असा वर मिळाला होता. या वरामुळे लाखासुर उन्मत्त झाला होता. मांदार पर्वताच्या परिसरात त्याची सर्वत्र दहशत होती. या पर्वतावरील ऋषीमुनींच्या तपसाधनेमध्येही तो वारंवार अडथळे आणत असे. याचवेळी मांडव्य ऋषींचे पत्नी मंडाबाई हिच्यासह या पर्वतावर वास्तव्य होते. लाखासुराकडून ऋषीमुनींना देण्यात येणारा त्रास पाहून मंडाबाईने आदिमाया पार्वतीकडे हे संकट निवारण्यासाठी मदत मागितलीमाता पार्वतीने मंडाबाईची विनंती मान्य केली तिने काळूबाईचे रूप घेऊन लाखासुराला युद्धाचे आव्हान दिले. सात दिवस चाललेल्या या युद्धात महादेवाच्या वरदानामुळे दिवसात त्याला काहीही होत नव्हते. त्यामुळे पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने त्याचा अंत केला. युद्धानंतर देवीने सध्या जेथे मंदिर आहे ती जागा विश्रांतीसाठी निवडली. तेव्हापासून येथे देवीचे स्थान आहे.

काळूबाई मंदिराच्या स्थापनेबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. या डोंगरावर महादेवाचे हेमाडपंती शैलीतील मंदिर आहे. ते यादवसम्राट सिंघण यांच्या कारकिर्दीतील (१२१० ते १२४७) आहे. काळूबाई देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप गर्भगृह अशा रचनेचे आहे. मंदिरासमोर दोन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. आटोपशीर सभामंडपात देवीचे वाहन सिंहाची मूर्ती आहे. तुलनेने मोठ्या असलेल्या गर्भगृहात काळूबाई देवीची शेंदूरचर्चित स्वयंभू उभी मूर्ती असून ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या उजवीकडील हातांमध्ये त्रिशूल आणि तलवार आहे. डावीकडील एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर आहे. चांदीचा मुकुट, तेजस्वी डोळे, विविध दागिन्यांनी मढविलेले, हिरवी साडी चोळी परिधान केलेले, कपाळभर हळदीकुंकवाचे भळवट भरलेले देवीचे रूप भाविकांना भारावून टाकते. गर्भगृहात चांदीच्या पत्र्यावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या कळसावर गाय सिंह यांची शिल्पे आहेत.

पौष पौर्णिमेपासून येथे मोठी यात्रा भरते. यावेळी देवीची यथासांग महापूजा महाअभिषेक करण्यात येतो. या उत्सवाच्या वेळी देवीच्या चेहऱ्यावर सोन्याचा मुखवटा लावला जातो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोपगावच्या फडतरे कुटुंबाला प्रथेप्रमाणे सासनकाठीचा पालखीचा मान दिला जातो. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत ठेऊन वाद्यांच्या गजरात त्याची मिरवणूक (छबिना) काढली जाते. हा छबिना या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. या उत्सवाच्यावेळी गावोगावची भक्त मंडळी ताशा, हलगी, संबळ, झांज अशा वाद्यांच्या गजरात देवीचा जयघोष करीत डोंगर चढून येतात. या डोंगरवाटेवर यावेळी पूजा साहित्य, न्याहरी तसेच चहापाण्याची शेकडो दुकाने थाटली जातात. अधिकृत माहितीनुसार या दहा दिवसांत देवीच्या दर्शासाठी तीन ते चार लाख भाविक येतात. नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून यावेळी देवीला पुरणपोळीचा दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो.

मुख्य मंदिराच्या उजवीकडे गोंजीबाबा, तर डावीकडे मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत. याशिवाय परिसरात लक्ष्मीमाता, मरीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा, तसेच धावजी पाटील यांची मंदिरे आहेत. त्यापैकी तेलीबाबांबाबत असे सांगितले जाते की देवीचे मंदिर बांधत असताना या तेलीबाबांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ येथे त्यांची समाधी बांधली गेली त्यावर तेल वाहण्याची प्रथा आहे. सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पर्यंत भाविकांना या गडावरील मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून (एमटीडीसी) दुपारच्या वेळी येथे भाविकांना अल्प शुल्क आकारून महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • वाईपासून २२ किमी, तर सातारा शहरापासून ५६ किमी अंतरावर
  • वाई भोर येथून मांढरदेवसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • गडावर न्याहरीसाठी अनेक पर्याय

मांढरदेव की कालूबाई

मांढरदेवगढ़, तह. वाई, जि. सातारा

सातारा जिले की वाई तहसील में स्थित मांढरदेव में श्रीकालेश्वरी अर्थात कालूबाई देवी का मंदिर है। राज्य के प्रसिद्ध मंदिरों में यह एक प्रमुख देवीस्थान माना जाता है। यहाँ प्रतिदिन हजारों श्रद्धालु देवी के दर्शन हेतु आते हैं। यहाँ पौष पूर्णिमा से आरंभ होकर दस दिनों तक चलने वाला मेला जिले के बड़े मेलों में से एक है। इस अवधि में लाखों श्रद्धालु मांढरदेवगढ़ पहुँचते हैं। यह देवी मनोकामना पूर्ण करने वाली और मनोरथ सिद्ध करने वाली मानी जाती हैं। महाराष्ट्र के बहुजन समाज के अनेक लोगों की यह कुलदेवी हैं।
कालूबाई देवी का यह स्थान पुणे और सातारा जिलों की सीमा पर स्थित है। यह भोर, वाई और खंडाला तहसीलों के सीमाक्षेत्र में आता है। यह समुद्र तल से लगभग 4600 पद की ऊंचाई पर सह्याद्री पर्वतराज की मांदार पर्वत श्रेणियों में घने जंगलों के बीच स्थित है। इस स्थान को मांढरगढ़ भी कहा जाता है। यहाँ सातारा जिले से वाई मार्ग तथा पुणे जिले से भोर मार्ग द्वारा पहुँचा जा सकता है। यहाँ से वाहन सीधे मांढरगढ़ पर स्थित देवी के मंदिर के निकट बने वाहनतल तक जा सकते हैं। इसके अतिरिक्त सातारा जिले की खंडाला तहसील के शिरवल गाँव से पर्वत पर बनी पगडंडी के माध्यम से भी यहाँ पहुँचा जा सकता है। इस पगडंडी मार्ग पर चलते समय म्हसोबा तथा मांडव्य ऋषि की पत्नी मंडाबाई (मंडी आई) के मंदिर आते हैं। कहा जाता है कि मांडव्य ऋषि के यहाँ निवास करने के कारण इस पर्वत का नाम मांढरगढ़ और गाँव का नाम मांढरदेव पड़ा।
कालूबाई देवी के संबंध में एक कथा प्रचलित है। द्वापर युग में दैत्यराज रत्नासुर का सेनापति लाख्यासुर था। उसे भगवान महादेव से वरदान प्राप्त हुआ था कि कोई भी देवता या मनुष्य दिन में उसका वध नहीं कर सकेगा। इस वरदान से अहंकारी होकर लाख्यासुर अत्याचारी बन गया। मांदार पर्वत के आसपास उसका आतंक फैल गया। वह इस पर्वत पर तपस्या करने वाले ऋषि-मुनियों को भी निरंतर कष्ट देने लगा। उसी समय मांडव्य ऋषि अपनी पत्नी मंडाबाई के साथ इसी पर्वत पर निवास कर रहे थे। ऋषि-मुनियों पर हो रहे अत्याचारों से व्यथित होकर मंडाबाई ने आदिमाया पार्वती से इस संकट को दूर करने की प्रार्थना की। माता पार्वती ने उनकी प्रार्थना स्वीकार की। वे कालूबाई के रूप में अवतरित हुईं और लाख्यासुर को युद्ध के लिए ललकारा। सात दिनों तक युद्ध चलता रहा। महादेव के वरदान के कारण दिन में उसका कोई कुछ नहीं बिगाड़ सका। अंततः पौष पूर्णिमा की मध्यरात्रि को देवी ने उसका वध कर दिया। युद्ध के पश्चात देवी ने वर्तमान मंदिर स्थल को विश्राम हेतु चुना। तभी से यह स्थान देवी का पवित्र स्थल बन गया।
कालूबाई मंदिर की स्थापना के विषय में निश्चित जानकारी उपलब्ध नहीं है। ऐसा कहा जाता है कि इसका निर्माण छत्रपति शिवाजी महाराज के काल में हुआ था। इस पर्वत पर महादेव का हेमाडपंती शैली में निर्मित मंदिर भी है। यह यादव सम्राट सिंघण (1210–1247) के शासनकाल का माना जाता है। कालूबाई देवी का मंदिर पूर्वाभिमुख है। इसमें सभामंडप और गर्भगृह जैसी दो मुख्य रचनाएँ हैं। मंदिर के सम्मुख दो विशाल पत्थर की दीपमालाएँ हैं। छोटे से सभामंडप में देवी के वाहन सिंह की मूर्ति स्थापित है। बड़े गर्भगृह में कालूबाई देवी की सिंदूर लेपित, स्वयंभू और चतुर्भुज पाषाण मूर्ति प्रतिष्ठित है। उनके दाहिने हाथों में त्रिशूल और तलवार है। बाईं ओर के हाथों में ढाल और एक दैत्य का सिर है। देवी खड़ी अवस्था में हैं। उनका एक पैर दैत्य की छाती पर रखा हुआ है।
चाँदी का मुकुट, तेजस्वी नेत्र और विभिन्न आभूषणों से सुसज्जित देवी का रूप श्रद्धालुओं को मोह लेता है। उन्होंने हरे रंग की साड़ी पहनी है और ललाट पर हल्दी-कुंकु के गंध की सजावट है। गर्भगृह में चाँदी की पत्री पर की गई नक्काशी अद्वितीय है। मंदिर के शिखर पर गाय और सिंह की मूर्तियाँ अंकित हैं।
पौष पूर्णिमा से यहाँ भव्य मेला आयोजित किया जाता है। इस अवसर पर देवी की विधिपूर्वक महापूजा और महाभिषेक होता है। उत्सव के समय देवी के मुख पर स्वर्ण मुखौटा धारण कराया जाता है। पुणे जिले की पुरंदर तहसील के मौजे बोपगाँव के फडतरे परिवार को परंपरा अनुसार सासनकाठी और पालकी का सम्मान दिया जाता है। पौष पूर्णिमा की मध्यरात्रि में देवी का मुखौटा पालकी में स्थापित किया जाता है। वाद्य-घोष के साथ उसकी भव्य शोभायात्रा निकाली जाती है जिसे छबिना कहते हैं। यह छबिना इस मेले का प्रमुख आकर्षण है। इस अवसर पर गाँव-गाँव से श्रद्धालुगण ताशा, हलगी, संबल और झाँझ आदि वाद्यों की गूंज के साथ देवी का जयघोष करते हुए पर्वत पर चढ़ते हैं। उस समय इस पर्वतीय मार्ग पर पूजा सामग्री, जलपान तथा चाय-पानी की सैकड़ों दुकानें सजती हैं। आधिकारिक जानकारी के अनुसार इन दस दिनों में तीन से चार लाख श्रद्धालु देवी के दर्शन हेतु आते हैं। मनोकामना पूर्ण होने पर भक्त देवी को पूरनपोली तथा दही-चावल का भोग अर्पित करते हैं।
मुख्य मंदिर के दाहिनी ओर गोंजीबाबा तथा बाईं ओर मांगीरबाबा के मंदिर हैं। इसके अतिरिक्त परिसर में लक्ष्मीमाता, मरीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा तथा धावजी पाटील के मंदिर भी स्थित हैं। इनमें से तेलीबाबा के संबंध में कहा जाता है कि जब देवी का मंदिर बन रहा था, तब उनका निधन हो गया था। उनके स्मरण में यहाँ उनकी समाधि बनाई गई। तभी से उस पर तेल अर्पित करने की परंपरा चली आ रही है। प्रातः 5 बजे से सायंकाल 7 बजे तक श्रद्धालुओं को मंदिर में देवी के दर्शन प्राप्त होते हैं। महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग (एमटीडीसी) द्वारा दोपहर में अल्प शुल्क पर श्रद्धालुओं के लिए महाप्रसाद की व्यवस्था की जाती है।

प्रमुख विशेषताएं

  • वाई से 22 कि.मी. और सातारा शहर से 56 कि.मी. की दूरी पर।
  • वाई तथा भोर से मांढरदेव के लिए राज्य परिवहन की सुविधा उपलब्ध है।
  • निजी वाहन सीधे मंदिर के समीप स्थित वाहनतल तक जा सकते हैं।
  • गढ़ पर जलपान के लिए अनेक विकल्प उपलब्ध हैं।
Back To Home