
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणामुळे सातारा जिल्हा प्रसिद्ध आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यापासून मराठा साम्राज्याच्या राजधानीचे ते शहर होते. धार्मिक ग्रंथांमध्ये ‘विराटनगरी’ असा उल्लेख आहे, ती नगरी म्हणजे आताचे वाई हे निसर्गसमृद्ध शहर होय. येथील कृष्णा नदीवरील गणपती घाटावर असलेले महागणपती म्हणजेच ढोल्या गणपतीचे मंदिर हे वाईकरांचे ग्रामदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
वाई शहरातील हे महागणपतीचे मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी १७६२ मध्ये बांधले. पेशवे बाळाजी बाजीराव यांचे सरदार रास्ते हे सासरे होत. या मंदिरासाठी त्यांना त्यावेळी दीड लाख रुपये खर्च आला होता, असा उल्लेख आढळतो. कृष्णाकाठाला लागून असलेल्या या मंदिराची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना अशी की या मंदिराची मागील बाजू ही त्रिकोणी म्हणजेच बोटीच्या आकाराची आहे. यामागचे कारण असे सांगितले जाते की अशा आकारामुळे कृष्णा नदीला पूर आल्यानंतर नदीचे पाणी विभागले जाईल व पाण्याचा दाब कमी होऊन मंदिराचे संरक्षण होईल.
महागणपती मंदिरातील भव्य गणेशमूर्ती ही एकाच दगडातून कोरण्यात आलेली आहे.
असे सांगितले जाते की या मूर्तीसाठी वापरण्यात आलेला विशेष काळा पाषाण हा कर्नाटकातून आणण्यात आला होता. या प्रशस्त मंदिराची रचना सभामंडप व गर्भगृह अशी आहे. येथील गर्भगृह ३० फूट लांब आणि ३० फूट रुंदीचा आहे. त्यात एका मोठ्या चौथऱ्यावर अखंड पाषाणातून घडविलेली सहा फूट उंच व सात फूट रुंदीची गणेशमूर्ती आहे. या भव्य मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती, असे म्हटले जाते.
महागणपती मूर्तीची प्रसन्न मुद्रा व त्यावरील तेज विलोभनीय आहे. ही मूर्ती बैठी असून तिचे डोळे तेजस्वी भासतात. महागणपतीच्या मूर्तीला जानवे, गळ्यात हार, बाजुबंद, पायात तोडे परिधान केलेले आहेत. संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, गणेश जयंती यांसारख्या दिवसांमध्ये या मूर्तीला अनेक अलंकारांनी मढविले जाते. मूर्तीच्या मागील बाजूस अर्धचंद्राकृती प्रभावळ आहे. वाई शहर व परिसरात असलेल्या सर्व मंदिरांमध्ये ढोल्या गणपती मंदिराचे शिखर हे सर्वात उंच असून त्याची उंची पायथ्यापासून २४ मीटर आहे. येथील ग्रामस्थ प्रत्येक कार्याची सुरुवात करताना या महागणपतीची आराधना करतात. महागणपती जागृत असून भाविकांच्या नवसाला तो पावतो, अशी ख्याती असल्यामुळे येथे दररोज हजारो भाविक दर्शनाला येतात. उत्सवांच्या दिवसांत तर ही संख्या ५०,००० ते ७५,००० इतकी असते.
भाविकांसोबतच महाबळेश्वर व पाचगणीला येणारे पर्यटकही आवर्जून महागणपतीच्या दर्शनाला येत असतात. दररोज सकाळी ५.३० पासून रात्री ९.३० पर्यंत भाविकांना महागणपतीचे दर्शन घेता येते. वैशाख शुद्ध त्रयोदशीला महागणपतीच्या प्रतिष्ठापनेचा वर्धापनदिन सोहळा येथे उत्साहात साजरा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेला या मंदिरासह नदीच्या घाटावर करण्यात येणारा दीपोत्सव प्रसिद्ध असून त्यावेळी हा परिसर हजारो मिणमिणत्या दिव्यांनी उजळून निघतो.
महागणपती मंदिराच्या शेजारी कृष्णामाई मंदिर आहे. या मंदिर परिसरासह कृष्णा नदीच्या सात घाटांवर साजरा होणारा येथील कृष्णामाई उत्सव सर्वश्रुत आहे. माघ शुद्ध प्रतिपदेपासून साधारणतः दीड महिना हा उत्सव चालतो. असे सांगितले जाते की नदीचा उत्सव साजरा होणारे वाई हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे. काही अभ्यासकांच्या मते स्वतः शिवाजी महाराजांनी हा उत्सव सुरू केला होता.
ऐतिहासिक नोंदींनुसार, शिवाजी महाराजांना मारण्याच्या उद्देशाने आलेल्या अफझल खानाची छावणी अनेक दिवस वाईत डेरेदाखल होती. या काळात मुघल सैन्याने येथे दहशत माजविलेली होती, त्यामुळे वाईकर ग्रामस्थ त्रस्त होते. प्रतापगडाच्या पायथ्याशी होणाऱ्या शिवाजी महाराज व अफजल खान भेटीत महाराजांना यश येवो, असे साकडे त्यावेळी वाईतील ग्रामस्थांनी कृष्णामातेला घातले होते. शिवाजी महाराजांना यश मिळाल्याचे व अफझल खान मारला गेल्याचे समजताच वाईतील हजारो ग्रामस्थांनी तेव्हा कृष्णामाईची पूजा केली होती. तेव्हापासून हा उत्सव अखंडित सुरू आहे. यावेळी ढोल–ताशांच्या गजरात कृष्णामाईच्या मंदिरातून पालखीची मिरवणूक निघते. संपूर्ण पालखी मार्ग हा रांगोळ्यांनी व विविध फुलांनी सजविला जातो. वाईतील जवळपास प्रत्येक घरातून या देवीला खणा–नारळाची ओटी वाहिली जाते. हा महोत्सव पाहण्यासाठी या काळात दररोज हजारो भाविक व पर्यटक वाईमध्ये येत असतात. याशिवाय नोकरी व व्यवसायानिमित्त बाहेरगावी असलेले वाईकर आवर्जून या काळात देवीच्या दर्शनाला येतात.

महाबलेश्वर जैसे शीतकालीन स्थल के कारण सातारा जिला महाराष्ट्र के नंदनवन के रूप में सुप्रसिद्ध है। श्रीमंत छत्रपति शाहू महाराज के समय से यह नगर मराठा साम्राज्य की राजधानी रहा। धार्मिक ग्रंथों में जिस नगर का उल्लेख ‘विराटनगरी’ के रूप में हुआ है, वही वर्तमान का वाई नगर एक प्रकृति-संपन्न शहर है। यहाँ कृष्णा नदी के किनारे स्थित गणपति घाट पर विराजमान महागणपति अर्थात ढोल्या गणपति का मंदिर वाई के निवासियों के ग्राम देवता तथा लाखों श्रद्धालुओं का आस्था का केंद्र है।
वाई नगर का यह महागणपति मंदिर पेशवाओं के सरदार गणपतराव भिकाजी रास्ते ने सन् 1762 में बनवाया। सरदार रास्ते पेशवा बालाजी बाजीराव के ससुर थे। इस मंदिर के निर्माण पर उस समय डेढ़ लाख रुपये खर्च हुए थे, ऐसा उल्लेख मिलता है। कृष्णा तट से सटा यह मंदिर अपनी विशिष्ट रचना के लिए प्रसिद्ध है। मंदिर का पिछला भाग नौकाकार है। ऐसा कहा जाता है कि इस आकार का उद्देश्य यह था कि जब कृष्णा नदी में बाढ़ आती है, तो नदी का पानी दोनों ओर विभाजित होकर बह जाए। इससे मंदिर पर दबाव कम पड़ता है और उसकी सुरक्षा हो सकती है।
महागणपति मंदिर की भव्य गणेशमूर्ति एक ही शिलाखंड से तराशी गई है। कहा जाता है कि इस मूर्ति के लिए प्रयुक्त विशेष काला पाषाण कर्नाटक से लाया गया था। इस विशाल मंदिर की रचना में सभामंडप और गर्भगृह दो भाग हैं।
यहाँ का गर्भगृह 30 पद लंबा और 30 पद चौड़ा है। इसमें एक बड़े चबूतरे पर अखंड शिलाखंड से निर्मित छह पद ऊँची और सात पद चौड़ी गणेशमूर्ति विराजमान है। इसी विशाल मूर्ति के कारण इस गणपति को “ढोल्या गणपति” कहा जाता है।
महागणपति की प्रसन्न मुद्रा और उनके मुखमंडल का तेज विलक्षण है। यह मूर्ति बैठी हुई मुद्रा में है और इसके नेत्र अत्यंत तेजस्वी प्रतीत होते हैं। महागणपति की मूर्ति पर जनेऊ, गले में हार, बाजूबंद और पैरों में कड़ा धारण किए गए हैं। संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी और गणेश जयंती जैसे पर्वों पर इस मूर्ति को अनेक आभूषणों से अलंकृत किया जाता है। मूर्ति के पीछे अर्धचंद्राकार प्रभामंडल है। वाई नगर और आसपास के सभी मंदिरों में ढोल्या गणपति मंदिर का शिखर सबसे ऊँचा है। इसकी ऊँचाई तलहटी से 24 मीटर है। यहाँ के ग्रामवासी प्रत्येक कार्य का आरंभ इस महागणपति की आराधना से करते हैं। महागणपति जागृत देवता माने जाते हैं और भक्त की मनोकामना पूर्ण करते हैं। ऐसी ख्याति होने से प्रतिदिन हजारों श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं। उत्सव के दिनों में यह संख्या 50,000 से 75,000 तक पहुँच जाती है।
श्रद्धालुओं के साथ-साथ महाबलेश्वर और पंचगणी आने वाले पर्यटक भी यहाँ दर्शन हेतु अवश्य आते हैं। प्रतिदिन प्रातः 5:30 से रात्रि 9:30 बजे तक श्रद्धालु महागणपति के दर्शन कर सकते हैं। वैशाख शुद्ध त्रयोदशी को महागणपति स्थापना दिवस का वार्षिकोत्सव यहाँ उत्साहपूर्वक मनाया जाता है। त्रिपुरारी पूर्णिमा के दिन इस मंदिर तथा नदीघाट पर किया जाने वाला दीपोत्सव प्रसिद्ध है। उस समय पूरा परिसर हजारों टिमटिमाते दीपों से आलोकित हो उठता है।
महागणपति मंदिर के समीप कृष्णामाई मंदिर स्थित है। इस मंदिर परिसर तथा कृष्णा नदी के सात घाटों पर मनाया जाने वाला कृष्णामाई उत्सव अत्यंत प्रसिद्ध है। माघ शुद्ध प्रतिपदा से आरंभ होकर लगभग डेढ़ मास तक यह उत्सव चलता है। कहा जाता है कि नदी का ऐसा उत्सव मनाने वाला वाई संपूर्ण राज्य का एकमात्र स्थान है। कुछ विद्वानों के अनुसार स्वयं छत्रपति शिवाजी महाराज ने इस उत्सव का प्रारंभ किया था।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार, छत्रपति शिवाजी महाराज की हत्या के उद्देश्य से आया अफ़ज़ल ख़ान कई दिनों तक वाई में डेरा डाले रहा। उस समय आदिलशाही सेना द्वारा वहां भारी आतंक मचाया गया था, जिससे वाई के ग्रामवासी अत्यंत व्यथित थे। प्रतापगढ़ की तलहटी में होने वाली छत्रपति शिवाजी महाराज और अफ़ज़ल ख़ान की भेंट में महाराज को विजय प्राप्त हो, इस हेतु वाई के निवासियों ने नदी कृष्णामाता से मन्नत मांगी थी। जब महाराज ने अफ़ज़ल ख़ान का वध कर विजय प्राप्त की, तब कृतज्ञता स्वरूप वाई के हज़ारों ग्रामीणों ने कृष्णामाई की विशेष पूजा-अर्चना की। तभी से यह उत्सव एक अटूट परंपरा बन गया है। आज भी इस अवसर पर ढोल-ताशों की गूंज के बीच कृष्णामाई मंदिर से भव्य पालकी यात्रा निकलती है। संपूर्ण मार्ग को आकर्षक रंगोलियों और पुष्पों से सजाया जाता है। वाई के लगभग प्रत्येक घर से देवी को साड़ी-नारियल अर्पित कर आंचल भराई की जाती है। इस भव्य महोत्सव का साक्षी बनने के लिए प्रतिदिन हज़ारों श्रद्धालु और पर्यटक वाई आते हैं। साथ ही, शिक्षा या व्यवसाय के लिए बाहर रहने वाले स्थानीय निवासी भी इस समय विशेष रूप से देवी के दर्शन और उत्सव हेतु अपने पैतृक स्थान लौटते हैं।