
महाबळेश्वर आणि पाचगणीमधील अनेक ठिकाणे निसर्गसौंदर्यांनी नटलेली असल्याने देशभरातील पर्यटकांना बाराही महिने ती भुरळ घालतात. येथे पर्यटकांना खुणावणारे अनेक पॉईंटस (स्थळे) असले तरी त्याचबरोबरच या भागाला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वही आहे. पाचगणी शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र राजपुरी येथील लेण्यांमध्ये असलेले कार्तिक स्वामी मंदिर हे महाबळेश्वर तालुक्यातील महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक समजले जाते. हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला राज्य सरकारकडून ‘क’ वर्ग तीर्थस्थानाचा दर्जा देण्यात आलेला आहे.
वाई–पाचगणी मार्गावर पाचगणीच्या अलीकडे डाव्या हाताला दांडेघर नावाचे गाव आहे. येथून सुमारे सात किमी अंतरावर श्री क्षेत्र राजपुरी आहे. हे गाव जावळी, वाई आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यांच्या सीमेवर वसले आहे. या गावाला छोटे पाचगणी (Mini Panchgani) असेही म्हणतात, कारण येथे पाचगणीतील प्रसिद्ध टेबल लॅण्डसारखे (डोंगराच्या पृष्ठभागावरील पठार / सपाट जागा) येथेही एक पठार आहे. हे पठार म्हणजे पाचगणीच्या टेबल लॅण्डची प्रतिकृतीच आहे. पाचगणीच्या तुलनेत ते काहीसे लहान असले तरी येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गावातही हजारो पर्यटक येत असतात. येथे असणारी लेणी व त्यामधील कार्तिक स्वामींचे मंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते.
साधारणतः लेणी पाहण्यासाठी डोंगरावर चढाई करून जावे लागते; परंतु राजपुरी येथे मात्र कार्तिक स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी गावापासून सुमारे ७५ पायऱ्या उतरून दरीत असलेल्या लेण्यांपर्यंत जावे लागते. असे सांगितले जाते की राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी १९४३ साली येथील दलित समाजाच्या मदतीने हा पायरी मार्ग बांधला होता. या दरम्यान गाडगेबाबांचे येथे १५ दिवस वास्तव्य होते. पायरी मार्गाने खाली उतरल्यानंतर उजव्या बाजूला लेणी, तर डाव्या बाजूला खोल दरी दिसते. लेण्यांच्या डाव्या बाजूला मोठ्या कातळाजवळ एका साधूची संगमरवरातील समाधी आहे. या समाधीच्या मागच्या बाजूने पावसाळ्यात कोसळणारा धबधबा या परिसराचे सौंदर्य वाढवितो. येथील निसर्गाची विविध रूपे मन प्रसन्न करतात.
येथील लेण्यांमध्ये असणाऱ्या पहिल्या गुहेत एक विहार असून त्यामध्ये रेणुकादेवीची मूर्ती आहे. या विहाराच्या समोरील बाजूस मल्लिकार्जुन, दत्तकुंड व विष्णूकुंड असे तीन पाण्याचे कुंड आहेत. यातील एका कुंडामध्ये गोमुखातून पाणी येत असते. या गुहेच्या बाजूलाच असणाऱ्या दोन गुहा आतून एकमेकांना जोडलेल्या आहेत. त्यामध्ये विष्णूमूर्ती आहे.
असे सांगितले जाते की या विष्णू गुहेत गगनगिरी महाराजांचे वास्तव्य होते. त्यांनी अनेक दिवस येथे तपसाधना केली होती. त्याच्या बाजूच्या गुहेमध्ये काही वीरगळ, सतीशिळा, देवी–देवतांच्या मूर्ती आहेत. अशाच प्रकारच्या काही वीरगळी लेण्यांच्या बाहेरील बाजूस असलेल्या वडाच्या झाडाजवळही पाहायला मिळतात. चौथी गुहा आकाराने लहान आहे. त्यात शिवलिंग, गणेश व भवानी मातेची मूर्ती आहे. या गुहेसमोर कोरीव नंदी असून नंदीच्या अंगावरील आभूषणे व त्याचा डौलदारपणा वैशिष्ट्यपूर्ण भासतो. सर्वात शेवटच्या गुहेमध्ये असलेल्या विहारात कार्तिक स्वामींची अडीच फूट उंचीची मूर्ती आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती सुंदर आहे. या मूर्तीमध्ये कार्तिक स्वामी मोरावर आरूढ दाखविले आहेत. या पाचही गुहा कार्तिक स्वामी नावाने ओळखल्या जातात. अभ्यासकांच्या मते, या लेण्या दहाव्या ते अकराव्या शतकात कोरल्या गेल्या आहेत.
असे सांगितले जाते की या लेण्यांसमोर असलेल्या तीन कुंडांतील पाण्यात गंगा अवतरली असून त्याचे महत्त्व प्रयाग येथील पवित्र संगमावरील पाण्याइतके आहे.
या कुंडात स्नान केल्यास अनेक जन्मांची पापे नष्ट होऊन शरीरावरील रोगराई नाहीशी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कुंडांमध्ये स्नान करण्याचीही एक पद्धत आहे. त्यानुसार शनिवारी सकाळी या तीन कुंडांतील प्रत्येक कुंडातून एक बादली पाणी घेऊन स्नान करावे व त्यानंतर औदुंबरास पाच प्रदक्षिणा करून कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे.
हाच प्रकार सोमवारी व गुरुवारी म्हणजेच आठवड्यातील तीन दिवस करावा, असे सांगितले जाते. याप्रमाणे अनेक भाविक सोमवार, गुरुवार व शनिवारी येथील कुंडातील पवित्र पाण्यात स्नान करण्यासाठी येत असतात.
या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. केवळ कृतिका नक्षत्र आणि त्रिपुरारी पौर्णिमा एका दिवशी येतात, त्या मुहूर्तावर महिलांना येथे कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. असा मुहूर्त तीन वर्षांतून एकदा येतो.
यावेळी या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी हजारो महिला आणि भाविक येथे येतात. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच भाविकांना या लेण्यांच्या परिसरात जाण्यास परवानगी आहे.

महाबलेश्वर और पंचगणी के निकटवर्ती कई स्थान प्राकृतिक सौंदर्य से भरपूर हैं। ये स्थल संपूर्ण देश के पर्यटकों को निरंतर आकर्षित करते हैं। यहाँ कई दर्शनीय स्थल हैं। इसके साथ ही इस क्षेत्र का ऐतिहासिक और धार्मिक महत्त्व भी है। पंचगणी के निकट स्थित श्री क्षेत्र राजपुरी की प्राचीन गुफाओं में प्रतिष्ठित भगवान कार्तिक स्वामी का मंदिर महाबलेश्वर तहसील के प्रमुख और जागृत देवस्थानों में से एक है। हजारों श्रद्धालुओं का श्रद्धास्थान होने के कारण राज्य सरकार ने इस मंदिर को ‘क’ श्रेणी में सम्मिलित किया है।
वाई-पंचगणी मार्ग पर पंचगणी के समीप बाईं ओर दांडेघर नामक गाँव है। यहाँ से लगभग 7 किमी दूर श्री क्षेत्र राजपुरी स्थित है। यह गाँव जावली, वाई और महाबलेश्वर तहसील की सीमा पर स्थित है। इसे लघु पंचगणी (मिनी पाचगणी) भी कहा जाता है। यहाँ भी पंचगणी के प्रसिद्ध ‘टेबल लैंड’ की भाँति एक पठार है। यह पठार पंचगणी के पठार का छोटा रूप है। यहाँ की प्राकृतिक सुंदरता हज़ारों पर्यटकों को अपनी ओर आकर्षित करती है। पौराणिक मान्यताओं के अनुसार, ये प्राचीन गुफाएँ और इनमें प्रतिष्ठित भगवान कार्तिक स्वामी का मंदिर पांडवकालीन माना जाता है।
सामान्यतः गुफाओं तक पहुँचने के लिए पहाड़ पर चढ़ाई करनी पड़ती है। परंतु राजपुरी में कार्तिक स्वामी मंदिर तक पहुँचने के लिए गाँव से लगभग 75 सीढ़ियाँ उतर कर गुफाओं तक जाना पड़ता है। मान्यता है कि राष्ट्रसंत गाडगे बाबा ने वर्ष 1943 में जनसहयोग के माध्यम से इस दुर्गम सीढ़ी मार्ग का निर्माण करवाया था। इस अवधि में गाडगेबाबा का यहाँ 15 दिन तक निवास रहा। सीढ़ियों से नीचे उतरने पर दाईं ओर गुफाएँ और बाईं ओर गहरी खाई दिखाई देती है। गुफाओं के बाईं ओर एक विशाल पत्थर के पास एक साधु की संगमरमर की समाधि है। इसके पीछे से वर्षा ऋतु में गिरने वाला झरना इस क्षेत्र की मनोहरता बढ़ाता है।
पहली गुफा में एक विश्राम कक्ष है, जिसमें रेणुकादेवी की मूर्ति है। विश्राम कक्ष के सम्मुख मल्लिकार्जुन, दत्तकुंड और विष्णु-कुंड नामक तीन जलकुंड हैं। इनमें से एक कुंड में गोमुख से पानी आता है। इस गुफा के बगल में दो और गुफाएं हैं, जो अंदर से जुड़ी हुई हैं। इनमें विष्णु की मूर्ति है। कहा जाता है कि यहाँ गगनगिरी महाराज का निवास था और उन्होंने कई दिनों तक तपस्या की। दूसरी गुफा में कुछ वीर-शिला, सती-शिला और देवी-देवताओं की मूर्तियाँ हैं। कुछ वीर-शिला गुफाओं के बाहरी भाग में बरगद के पेड़ के पास भी देखी जा सकती हैं। चौथी गुफा छोटी है।
इसमें शिवलिंग, गणेश और भवानी माता की मूर्ति है। इसके सम्मुख उत्कीर्ण नंदी है। यह नंदी अपने आभूषणों और भव्यता के लिए विशिष्ट है। अंतिम गुफा के विश्राम कक्ष में कार्तिक स्वामी की लगभग 2.5 पद ऊँची काले पाषाण की मूर्ति है। मूर्ति में कार्तिक स्वामी मोर पर सवार हैं। इन पाँचों गुफाओं को ‘कार्तिक स्वामी गुफाएं’ कहा जाता है। विशेषज्ञों के अनुसार ये गुफाएं 10वीं से 11वीं सदी में निर्मित की गई थीं।
कहा जाता है कि गुफाओं के सम्मुख स्थित तीन कुंडों के जल में गंगा अवतरित हुई थी। इसका महत्त्व प्रयाग के पवित्र संगम जितना ही है। इन कुंडों में स्नान करने से जन्मों के पाप दूर हो जाते हैं। इसके साथ ही शरीर की व्याधियाँ समाप्त होती हैं, ऐसी श्रद्धालुओं की आस्था है। स्नान की पद्धति के अनुसार शनिवार को प्रत्येक कुंड से एक बाल्टी जल लेकर स्नान करना चाहिए। इसके पश्चात गूलर के वृक्ष के चारों ओर पाँच प्रदक्षिणा करके कार्तिक स्वामी के दर्शन करने चाहिए। इसी प्रकार सोमवार और गुरुवार को भी यह प्रक्रिया की जाती है।
मंदिर में महिलाओं का प्रवेश वर्जित है। केवल कृतिका नक्षत्र और त्रिपुरारी पूर्णिमा पर महिलाओं को दर्शन की अनुमति मिलती है। यह अवसर तीन वर्ष में एक बार आता है। इस अवसर पर हजारों महिलाएँ और श्रद्धालु दर्शन के लिए आते हैं। श्रद्धालुओं को प्रातः 6 बजे से सायंकाल 6 बजे तक ही गुफा परिसर में प्रवेश की अनुमति होती है।