चैतन्येश्वर मंदिर

आंभोरा, ता. कुही, जि. नागपूर

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात असलेल्या चैतन्येश्वर देवस्थानाचा विदर्भातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून लौकिक आहे. आंभोरा देवस्थान अशी ख्याती असलेल्या या तीर्थक्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा, कोलारी या नद्यांच्या संगमावर स्थित आहे. पाच नद्यांच्या संगमावरील टेकडीवर असणारे राज्यातील हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. याच मंदिर परिसरात मराठीचे आद्यकवी मुकुंदराज यांनी शके १११० मध्येविवेकसिंधूया ग्रंथाचे लेखन केले होते.

वैनगंगेचीये तिरी मनोहर अंबानगरी ।। 

तेथे प्रकटले श्रीहरि जगदीश्वर।।

आद्यकवी मुकुंदराज यांच्याविवेकसिंधूया ग्रंथामधील हा उल्लेख चैतन्येश्वर देवस्थानाबद्दल आहे. देवस्थानचा परिसर निसर्गसमृद्ध असल्याने भाविकांसोबतच येथे पर्यटकही मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या देवस्थानाला तीर्थक्षेत्राचादर्जा दिला आहे. असे सांगितले जाते की १२ वर्षांच्या महाव्रतानंतर येथे झालेल्या महायज्ञातून चैतन्येश्वरांची पिंडी प्रगट झाली आहे. वनवासकाळात श्रीराम, लक्ष्मण सीतेने या परिसरातून नदी तीराने प्रवास केला होता, तर महाभारत काळात पांडवांनी वनवासातील काही काळ या परिसरात वास्तव्य केले होते. त्यामुळे भाविकांच्या दृष्टीने या स्थानाचे आगळे महत्त्व आहे.

हे तीर्थस्थान नागपूर जिल्ह्यात असले तरी भंडारा शहरापासून या मंदिराचे अंतर केवळ १८ किमी आहे. भंडाऱ्याहून या मंदिरात येण्यासाठी नदी पार करावी लागते. त्यासाठी येथे डोंगा (होड्या) असतात. डोंग्यातून नदी पार करताना येथील नद्यांचे विस्तृत पात्र, तेथील रुपेरी वाळू, नद्यांचा संगम, टेकडीला वळसा घालून चंद्राकार झालेली आम नदी आणि निसर्गसौंदर्याने वेढलेले महादेवाचे मंदिर हे दृश्य चैतन्य निर्माण करणारे आहे. कदाचित म्हणूनच येथील देवस्थानाचे नावही चैतन्येश्वर असावे.

चैतन्येश्वराचे मंदिर हे विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे मंदिर आहे. आंभोरा येथील ब्रह्मगिरी टेकडीवर (ज्या टेकडीवर हे मंदिर आहे ती टेकडी) पांढऱ्या रंगाने रंगविलेले चैतन्येश्वराचे मंदिर लांबूनच लक्ष वेधून घेते. पायथ्यापासून मंदिराकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. सुमारे १०० पायऱ्या चढून मंदिराच्या आवारात प्रवेश होतो. चैतन्येश्वराच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी तेथे नंदेश्वर हे नंदीचे मंदिर लागतेत्यापुढे दर्शन मंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. गर्भगृहात चैतन्येश्वराची प्राचीन पिंडी आहे. मंदिराच्या आवारातून खाली पाहिल्यास सर्वत्र वाहणाऱ्या नद्या, डोंगर, हिरवाई असा सुंदर परिसर दिसतो.

चैतन्येश्वराचे दर्शन घेऊन पायथ्याशी आल्यावर येथे अनेक मंदिरांचा समूह आहे. त्यामध्ये हरिनाथ महाराजांचे मंदिर प्रसिद्ध आहे. या मंदिरातील शिलालेखानुसार मुकुंदराज यांनी विवेकसिंधू हा ग्रंथ येथे लिहिल्याची नोंद आहे. असे सांगितले जाते की हरिनाथांनी १२ वर्षे पशुपत नावाचे महाव्रत करून येथील ब्रह्मगिरी टेकडीवर महायज्ञ केले. त्यातून स्वतः महादेव प्रकट झाले हरिनाथास तुझ्या मनोकामना पूर्ण होतील, असा आशीर्वाद देऊन गुप्त झाले. महादेव गुप्त झाल्यानंतर त्यांच्यामागोमाग यज्ञातून शिवलिंग प्रकट झाले. तेच आजचे हे चैतन्येश्वर शिवलिंग होय.

या मंदिराला लागून विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या समाधी मंदिरांमध्ये एक नेपाळच्या राजाच्या मुलाची (नेपाळचा राजपुत्र राजवैभव त्यागून येथे तपसाधना करण्यासाठी आला होता), तर दुसरी समाधी हरिनाथ महाराजांचे शिष्य रघुनाथ ऊर्फ रामचंद्र महाराज यांची आहे. या गुरुशिष्यांनी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशीला मध्यान्ही समाधी घेतली. या तिथीला त्यांचा पुण्यतिथी उत्सव येथे साजरा केला जातो. ऋषी पंचमी, भाद्रपद शुद्ध पंचमीला येथे भरणाऱ्या यात्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय असते. नागपूर, भंडारा, गोंदिया, बाळाघाट, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा अमरावती येथून मोठ्या प्रमाणात महिला येथे येतात. येथील नद्यांच्या संगमावर स्नान करून त्या आपल्या व्रताची उजवणी करतात. घरी लावलेल्या धान्यापासून तयार केलेले अन्न (तांदूळ भाजीपाला, बैलाच्या पायाने तयार केलेले नाही) प्रसाद म्हणून ग्रहण करतात. याशिवाय या नद्यांच्या संगमावर अस्थी विसर्जनासाठी अनेक लोक येत असतात. त्यासाठी देवस्थान कमिटीतर्फे येथे घाट बांधण्यात आले आहेत. मंदिर परिसरात भाविकांना राहण्याची सुविधा असून यात्रेसाठी आलेल्या भाविकांनाही राहण्यासाठीही येथे मोठे दालन बांधण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • नागपूरपासून ७२, तर भंडारा शहरापासून १८ किमी अंतरावर
  • कुही या तालुक्याच्या शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा

चैतन्येश्वर मंदिर

आंभोरा, तह. कुही, जि. नागपुर

नागपुर जिले की कुही तहसील में स्थित चैतन्येश्वर देवस्थान को प्रमुख तीर्थस्थान के रूप में ख्याति प्राप्त है। आंभोरा देवस्थान के नाम से प्रसिद्ध यह तीर्थस्थान विशेष है। यह वैनगंगा, कन्हान, आम, मुर्जा और कोलारी नदियों के संगम पर स्थित है। कहा जाता है कि संपूर्ण राज्य में पाँच नदियों के संगम पर पहाड़ी पर स्थित यह एकमात्र मंदिर है। इसी मंदिर परिसर में मराठी के आद्यकवि मुकुंदराज ने ‘विवेकसिंधु’ ग्रंथ की रचना की थी। उन्होंने शक संवत 1110 में इसकी रचना की थी।
वैनगंगेचीये तिरी । मनोहर अंबानगरी ।।
तेथे प्रकटले श्रीहरि । जगदीश्वर।।
आद्यकवि मुकुंदराज के ‘विवेकसिंधु’ ग्रंथ का यह उल्लेख चैतन्येश्वर देवस्थान के संबंध में है। मंदिर का परिसर प्राकृतिक सौंदर्य से परिपूर्ण है। यहाँ श्रद्धालुओं के साथ-साथ पर्यटक भी बड़ी संख्या में आते हैं। इसी कारण महाराष्ट्र सरकार ने इस देवस्थान को तीर्थक्षेत्र का ‘क’ दर्जा प्रदान किया है। कहा जाता है कि 12 वर्ष के महाव्रत के उपरांत यहाँ महायज्ञ आयोजित हुआ था। \

उस यज्ञ से चैतन्येश्वर का शिवलिंग प्रकट हुआ था। मान्यता है कि वनवास काल में श्रीराम, लक्ष्मण और सीता यहाँ से गुज़रे थे। वहीं महाभारत काल में पांडवों ने भी यहाँ कुछ दिन बिताए थे। इस कारण श्रद्धालुओं की दृष्टि में इस स्थान का विशेष महत्व है।

यद्यपि यह तीर्थस्थान नागपुर जिले में है, किंतु भंडारा नगर से इसकी दूरी केवल 18 किमी है। भंडारा से इस मंदिर तक पहुँचने के लिए नदी पार करनी पड़ती है। इसके लिए यहाँ नावें उपलब्ध रहती हैं। नाव से नदी पार करते समय विस्तृत नदी पाट दिखाई देता है। यहाँ की सप्तवर्णीय रेत और पाँच नदियों का संगम मन मोह लेता है। प्राकृतिक सौंदर्य से घिरा महादेव मंदिर मन में अद्भुत चैतन्य का संचार करता है। संभवतः इसी कारण इस देवस्थान का नाम ‘ चैतन्येश्वर’ पड़ा।

चैतन्येश्वर का मंदिर विदर्भ के प्राचीन मंदिरों में से एक है। आंभोरा की ब्रह्मगिरी पहाड़ी पर सफेद रंग से रंगा यह मंदिर दूर से ही आकर्षित करता है। पहाड़ी की तलहटी से मंदिर तक पहुँचने के लिए सीढ़ियों का मार्ग है। लगभग 100 सीढ़ियाँ चढ़ने के बाद मंदिर परिसर में प्रवेश होता है। मंदिर में प्रवेश से पूर्व नंदीमंडप आता है। इसके आगे दर्शनमंडप और गर्भगृह है। गर्भगृह में चैतन्येश्वर का प्राचीन शिवलिंग विराजमान है। मंदिर परिसर से नीचे देखने पर चारों ओर बहती नदियाँ और हरियाली का अद्भुत दृश्य दिखाई देता है।

चैतन्येश्वर के दर्शन के बाद तलहटी पर स्थित मंदिर समूह में हरिनाथ महाराज का मंदिर प्रसिद्ध है। शिलालेख के अनुसार मुकुंदराज ने यहीं ‘विवेकसिंधु’ ग्रंथ की रचना की थी। कहा जाता है कि हरिनाथ ने 12 वर्षों तक ‘पशुपत’ नामक महाव्रत किया था। उन्होंने ब्रह्मगिरी पहाड़ी पर महायज्ञ आयोजित किया। उस यज्ञ से स्वयं महादेव प्रकट हुए। उन्होंने हरिनाथ को आशीर्वाद दिया और अंतर्धान हो गए। महादेव के अंतर्धान के उपरांत उसी यज्ञ से शिवलिंग प्रकट हुआ। वह आज ‘चैतन्येश्वर शिवलिंग’ के रूप में पूजित है।

इस मंदिर के समीप विठ्ठल-रुक्मिणी का मंदिर है। मंदिर के पश्चिम में स्थित समाधि मंदिरों में से एक समाधि नेपाल के राजकुमार की है। उन्होंने राजवैभव त्यागकर यहाँ तपस्या की थी। दूसरी समाधि हरिनाथ महाराज के शिष्य रघुनाथ उर्फ रामचंद्र महाराज की है। गुरु-शिष्य दोनों ने मार्गशीर्ष शुक्ल एकादशी को समाधि ली थी। इस तिथि पर यहाँ हर साल उनका पुण्यतिथि उत्सव आयोजित होता है।

ऋषि पंचमी और भाद्रपद शुक्ल पंचमी को लगने वाले मेले में महिलाओं की उपस्थिति विशेष होती है। नागपुर, भंडारा, गोंदिया, बालाघाट, गढ़चिरौली, चंद्रपुर, वर्धा और अमरावती से बड़ी संख्या में महिलाएँ यहाँ आती हैं।

वे पाँच नदियों के संगम पर स्नान कर अपने व्रत का समापन करती हैं। वे प्रसाद स्वरूप घर में बोए गए धान्य से तैयार भोजन ग्रहण करती हैं। इसके अतिरिक्त यहाँ अस्थि विसर्जन हेतु भी अनेक लोग आते हैं।

इस उद्देश्य से देवस्थान समिति द्वारा यहाँ घाट बनाए गए हैं। मंदिर परिसर में श्रद्धालुओं के ठहरने की व्यवस्था है। यात्रियों के लिए भी एक विशाल भवन निर्मित किया गया है।

प्रमुख विशेषताएँ

  • नागपुर से 72 किमी तथा भंडारा नगर से 18 किमी दूरी पर स्थित।
  • कुही तहसील नगर से राज्य परिवहन बस सुविधा उपलब्ध।
  • निजी वाहन सीधे मंदिर के वाहनतल तक पहुँच सकते हैं।
  • मंदिर परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध।
Back To Home