
नागपूरमधील हिंगणा तालुक्यातील श्रीक्षेत्र चौकी येथील जागृत व स्वयंभू देवगुरू बृहस्पती मंदिर प्रसिद्ध आहे. हे मंदिर नागपूर व वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर असून गुरू बृहस्पतींचे महाराष्ट्रातील ते एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते. बृहस्पती हे सर्व देवांचे गुरू मानले जातात. त्यामुळे गुरुपौर्णिमेला येथे भरणारी यात्रा ही तालुक्यातील मोठी यात्रा असून हजारोंच्या संख्येने भाविक यावेळी येथे दर्शनाला येतात.
बृहस्पती मंदिराचे निर्माण कोणत्या कालावधीत झाले याचा निश्चित पुरावा उपलब्ध नसला तरी काही अभ्यासकांनुसार येथील पुरातन वास्तू पांडवकालीन आहेत. हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलातील बहुमूल्य वृक्ष व वनसंपदेची चोरी, तसेच पशू–पक्ष्यांची अवैध शिकार थांबविण्यासाठी १९६५ मध्ये वन विभागामार्फत येथे काही आदिवासी कुटुंबांना विनामूल्य घरे बांधून देण्यात आली व उदरनिर्वाहासाठी जमिनी देऊन त्यांची वस्ती निर्माण करण्यात आली. त्याचवेळी वन विभागाकडून येथील बृहस्पती मंदिराचा जीर्णोद्धारही करण्यात आला. या परिसराची देखरेख करण्यासाठी वन विभागातर्फे येथे चौकी (तपासणी नाका) उभारण्यात आली. तेव्हापासून या गावाचे नाव चौकी असे पडले.
या मंदिराची आख्यायिका अशी की विदर्भ हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण मानले जाते. पांडवकाळात या परिसरात एकचक्र नावाचे राज्य होते. अज्ञातवासाच्या काळात पांडव एकदा एकचक्र नगरात वास्तव्याला होते. तेव्हा येथील जंगलामध्ये बकासुर नावाचा बलाढ्य राक्षस राहत असे. त्याला दररोजच्या भोजनात १ गाडा धान्य व १ जिवंत पुरुष लागत असे. आपल्या राज्यातील जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या या त्रासामुळे येथील राजा हताश झाला होता. हे सर्व अज्ञातवासात असलेल्या पांडवांना समजले. त्यांनी याच नगराच्या परिसरात घनदाट जंगलात एका उंच पहाडावर जाऊन या समस्येचा तोडगा काढण्यासाठी गुरू बृहस्पतींची तपश्चर्या केली. आपल्या भक्तांची तपश्चर्या पाहून बृहस्पती तेथे प्रकट झाले व पांडवांना कार्यसिद्धी पार पाडण्यासाठी आशीर्वाद दिले.
देवगुरू बृहस्पतींचे आशीर्वाद मिळाल्यानंतर बकासुराकडे जाण्याची जबाबदारी भीमाने घेतली. गाडीभर धान्य घेऊन स्वतः भीम बकासुर राहत असलेल्या जंगलात गेला. यावेळी त्यांच्यात भयंकर युद्ध होऊन बकासुर मारला गेला व एकचक्र नगरी भयमुक्त झाली. पांडवांनी आपल्या अज्ञातवासातील बराच काळ या तीर्थक्षेत्री व्यतित केला. तेव्हापासून दिव्य ज्योती रूपात स्वयंभू गुरू बृहस्पती येथे विराजमान
आहेत.
ऐतिहासिक नोंदींनुसार, नागपूरचे रघुजीराजे भोसले यांनी १७०० च्या कालखंडात या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पहिले रघुजीराजे भोसले यांनी हा परिसर नागा गोसावी (नहंग) यांना दान दिला आणि या धार्मिक स्थळाचा सर्वत्र प्रचार केला. तेव्हापासून दूरवरून भाविक गुरू बृहस्पतींच्या दर्शनासाठी येऊ लागले. नागा गोसावी यांचे वास्तव्य असताना शामगिरी महाराजांनी जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत या घनदाट जंगलातील मंदिरात पुजारी म्हणून सेवा केली. आजही मंदिराशेजारी त्यांचे समाधी स्थळ आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत या परिसराचे मालगुजार (खोत) भास्करराव (पाटील) घारपुरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. विठ्ठलपंत सोमनकर ऊर्फ कानटोपरे महाराज यांनी १९३० सालापासून याठिकाणी चैत्र कृष्ण षष्ठी ते द्वादशीपर्यंत सप्ताहाची सुरुवात केली. ती परंपरा आजही सुरू आहे.
केळझर सावळी मार्गाला लागून असलेल्या या मंदिरातील गर्भगृहात देवगुरू बृहस्पतींची स्वयंभू मूर्ती आहे. या मूर्तीवर चांदीचा मुकुट असून मूर्तीशेजारीच अखंड दिव्य ज्योत सुरू असते. मूर्तीसोबतच भाविक या ज्योतीचीही पूजा करतात. मंदिराचे आवार प्रशस्त असून तेथे एक नवग्रहांचे मंदिर आहे. बृहस्पती हे नवग्रहांपैकी एक असल्यामुळे येथे दररोज या ग्रहांचीही पूजा होते. मंदिर समितीतर्फे येथे गुरुपौर्णिमा हा मोठा उत्सव, तर कोजागरी पौर्णिमा, महाशिवरात्र, हनुमान जयंती, गुरुपुष्यामृत योग पूजन आदी उत्सवही साजरे केले जातात. त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.
धार्मिक कार्यक्रमांसोबतच येथे अन्नदान, सामूहिक विवाह, बाल सुसंस्कार शिबिर इत्यादी कार्यक्रम होतात. मंदिर समितीतर्फे निराधार वृद्धांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंदिरावर हिंगणा तालुक्यातील भाविकांची विशेष श्रद्धा असून कोणत्याही कामाचा शुभारंभ येथूनच करण्याची पद्धत आहे. कोणतीही निवडणूक असली तरी प्रचाराची सुरुवातही येथूनच केली जाते. महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देण्यात आला असून त्याद्वारे उपलब्ध होणाऱ्या निधीतून वेळोवेळी येथे अनेक विकासकामे करण्यात येत आहेत.

नागपुर की हिंगना तहसील में श्रीक्षेत्र चौकी स्थित जागृत एवं स्वयंभू देवगुरु बृहस्पति मंदिर प्रसिद्ध है। यह मंदिर नागपुर और वर्धा जिलों की सीमा पर स्थित है। इसे महाराष्ट्र में गुरु बृहस्पति का एकमात्र मंदिर माना जाता है। बृहस्पति को सभी देवताओं का गुरु माना जाता है। इसलिए गुरुपूर्णिमा पर यहाँ आयोजित होने वाला मेला इस तहसील का एक बड़ा मेला है। इस समय हजारों श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं।
यद्यपि बृहस्पति मंदिर के निर्माण काल के बारे में कोई निश्चित प्रमाण उपलब्ध नहीं है। फिर भी कुछ विद्वानों के अनुसार यहाँ की प्राचीन संरचनाएँ पांडव काल की हैं। यह पूरा क्षेत्र घने जंगलों से आच्छादित है। जंगल में बहुमूल्य वृक्षों की चोरी और अवैध शिकार को रोकने के लिए 1965 में कदम उठाए गए। उस समय कुछ आदिवासी परिवारों को वन विभाग द्वारा निःशुल्क आवास दिए गए और उन्हें जीवनयापन के लिए भूमि प्रदान करके उनकी बस्तियाँ बसाई गईं। उसी समय यहाँ के बृहस्पति मंदिर का भी वन विभाग द्वारा जीर्णोद्धार किया गया। इस क्षेत्र की निगरानी के लिए वन विभाग द्वारा यहाँ एक चौकी बनाई गई थी। तभी से इस गाँव का नाम चौकी पड़ा।
इस मंदिर की पौराणिक कथा है कि विदर्भ को भारत का मध्य भाग माना जाता है। पांडव काल में इस क्षेत्र में एकचक्रा नामक राज्य था। वनवास के दौरान पांडव एक बार एकचक्रा नगरी में रहे थे। उस समय यहाँ के वन में बकासुर नामक एक शक्तिशाली राक्षस रहता था। वह प्रतिदिन एक गाड़ी अनाज और एक जीवित मनुष्य को खा जाता था। प्रजा को हो रहे इस कष्ट से यहाँ का राजा हताश था। वनवास में रह रहे पांडवों को यह बात पता चलने पर वे इस नगरी के निकट घने जंगल में एक ऊँचे पर्वत पर गए और इस समस्या के समाधान के लिए गुरु बृहस्पति की तपस्या की। अपने भक्तों की तपस्या देखकर बृहस्पति वहाँ प्रकट हुए और पांडवों को उनका कार्य पूर्ण करने का आशीर्वाद दिया।
देवगुरु बृहस्पति का आशीर्वाद प्राप्त करने के बाद भीम ने बकासुर के पास जाने का दायित्व संभाला। भीम स्वयं अनाज से भरी गाड़ी लेकर उस वन में गए जहाँ बकासुर रहता था। उनके बीच भयंकर युद्ध हुआ, बकासुर मारा गया और एकचक्रा नगरी भयमुक्त हो गई। पांडवों ने अपने अज्ञातवास का लंबा समय इसी तीर्थस्थल पर बिताया। तब से स्वयंभू गुरु बृहस्पति यहाँ दिव्य ज्योति के रूप में विराजमान हैं।
ऐतिहासिक अभिलेखों के अनुसार नागपुर के रघुजीराजे भोसले ने 1700 के काल में इस मंदिर का जीर्णोद्धार कराया था।
प्रथम रघुजीराजे भोसले ने यह क्षेत्र नागा गोसावी (नाहंग) को दान कर दिया और इस धार्मिक स्थल का हर जगह प्रचार किया। तब से दूर-दूर से श्रद्धालु गुरु बृहस्पति के दर्शन हेतु आने लगे। नागा गोसावी के निवास के दौरान शामगिरी महाराज ने पुजारी के रूप में सेवा की। आज भी उनका समाधि स्थल मंदिर के बगल में स्थित है। बाद में ब्रिटिश शासन के दौरान भास्करराव (पाटिल) घारपुरे ने इस मंदिर का जीर्णोद्धार कराया। विट्ठलपंत सोमणकर उर्फ कानटोपरे महाराज ने 1930 में यहाँ चैत्र कृष्ण षष्ठी से द्वादशी तक साप्ताहिक अनुष्ठान का प्रारंभ किया। यह परंपरा आज भी जारी है।
केळझर सावली मार्ग से सटे इस मंदिर के गर्भगृह में देवगुरु बृहस्पति की स्वयंभू पाषाण मूर्ति स्थापित है। इस पाषाण मूर्ति पर चाँदी का मुकुट है और पाषाण मूर्ति के बगल में एक अखंड दिव्य ज्योति जलती रहती है।
पाषाण मूर्ति के साथ-साथ श्रद्धालु इस ज्योति की भी पूजा करते हैं। मंदिर परिसर विशाल है और यहाँ नवग्रहों का एक मंदिर भी है। चूँकि बृहस्पति नवग्रहों में से एक हैं, इसलिए यहाँ प्रतिदिन इन ग्रहों की भी पूजा की जाती है। मंदिर समिति यहाँ गुरु पूर्णिमा, कोजागरी पूर्णिमा, महाशिवरात्रि, हनुमान जयंती और गुरुपुष्यामृत योग पूजा आदि उत्सव मनाती है। इसके साथ ही प्रत्येक गुरुवार को यहाँ बड़ी संख्या में श्रद्धालु आते हैं।
धार्मिक कार्यक्रमों के साथ-साथ यहाँ अन्नदान, सामूहिक विवाह और बाल कल्याण शिविर आदि आयोजित किए जाते हैं। मंदिर समिति ने निराश्रित वृद्धों के लिए आवास की व्यवस्था की है।
हिंगना तहसील के श्रद्धालुओं की इस मंदिर में विशेष आस्था है। यहाँ से कोई भी कार्य शुरू करने की प्रथा है। यहाँ तक कि कोई चुनाव हो, तो प्रचार अभियान भी यहीं से शुरू किया जाता है।
महाराष्ट्र सरकार ने इस मंदिर को ‘ब’ श्रेणी के तीर्थस्थल का दर्जा दिया है। इसके माध्यम से उपलब्ध धनराशि से यहाँ समय-समय पर कई विकास कार्य किए जाते हैं।