बंदी हनुमान मंदिर / विठ्ठल-रुख्मिणी मंदिर

बेलोना, ता. नरखेड, जि. नागपूर

लंकाधीश रावणाने जेव्हा हनुमानाला बंदी बनविण्याचा प्रयत्न करून त्याच्या शेपटीला आग लावण्यास सांगितली, तेव्हा हनुमानाने लंकेचा विध्वंस केला होता. पुराणातील ही कथा सर्वश्रूत असली तरी नागपूर जिल्ह्यात बेलोना येथे असे एक गाव आहे जेथे वर्षभर हनुमानाला बंदीत ठेवले जाते वर्षातील केवळ अडीच दिवस त्याला बाहेर काढून त्याची पूजा केली जाते. त्यामुळे येथील हनुमानबंदी हनुमानम्हणून प्रसिद्ध असून तो येथील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापित आहे.

बंदी हनुमानाची आख्यायिका अशी की बेलोना गावात नरहरी जोशी नामक एक गृहस्थ राहत. वेदशास्त्रात निपुण असल्यामुळे त्यांना सर्वजण गुरुजी म्हणून संबोधित असत. सर्व ग्रामस्थ या गुरुजींना विचारल्याशिवाय कोणतेही शुभकार्य करीत नसत. एके दिवशी अचानक गावातील एका गोठ्याला आग लागली. गावातील प्रत्येक जण ही आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांच्या प्रयत्नांनी हळूहळू आग आटोक्यात आली; परंतु त्याच वेळी ज्या ठिकाणी आग लागली होती तेथील जमिनीखालून आवाज येऊ लागला.

जमिनीखालून येणाऱ्या आवाजाने गावकरी अचंबित झाले त्यांनी गुरुजींकडे याबाबत तोडगा विचारला. गुरुजींनी अंतर्ज्ञानाने येथे बाल हनुमानाची मूर्ती असल्याचे जाणले. जमीन खोदण्यास सुरुवात केली असता ग्रामस्थांना एक पेटी सापडली. ती पेटी ते काढणार तशी ती जमिनीत खाली जाऊ लागली. गुरुजींनी हनुमानाची प्रार्थना करून अजाणतेपणी काही चूक झाली असेल तर माफी मागितली. तेव्हा पेटीतून आवाज आला की मी वर येईन, पण फक्त अडीच दिवसांसाठी! त्यानंतर पुन्हा मी माझ्या स्थानावर जाईन. त्यावेळी गुरुजींनी भक्तिभावाने हनुमानाला विनंती केली कीतुझी इच्छा असेल तर तू अडीच दिवसच बाहेर ये, पण ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी तरी तू येथे कायमचे वास्तव्य कर.’ गुरुजींची ही विनंती हनुमानाने मान्य केली पेटी अलगद जमिनीच्या वर आली. पेटी उघडून पाहिली असता त्यात नमस्कार मुद्रेतील बाल हनुमानाची मूर्ती होती. ग्रामस्थांनी या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा करून गावातील विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून येथे हनुमानाचा प्रकटदिन सोहळा पार पडतो. २६० हून जास्त वर्षांची या उत्सवाला परंपरा आहे.

नागपूरमधील नरखेड तालुक्यातील बेलोना या गावाच्या मध्यभागी प्राचीन विठ्ठल मंदिर आहे. या मंदिरातील गाभाऱ्यात विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्ती मुख्य असल्या तरी त्यांच्या बाजूला लाल रेशमी कपड्यात गुंडाळलेली हनुमानाची मूर्ती या हनुमानाची प्रकटदिन रथयात्रा येथील प्रमुख आकर्षण आहे. हे बजरंगबली वर्षभर या विठ्ठल मंदिरात बंदिस्त असतात; परंतु ते जेव्हा अडीच दिवसांसाठी बाहेर येतात तेव्हा गावात उत्सवाचे वातावरण असते.

मूळ विठ्ठलरुख्मिणी मंदिरातील हनुमानाची मूर्ती नेहमीच्या बलशाली स्वरूपात नसून बालस्वरूपात आहे. ही मूर्ती हात जोडून उभी आहे. अडीच दिवसांच्या प्रकटदिन उत्सवापैकी मार्गशीर्ष चतुर्थीला कापडात गुंडाळलेल्या या मूर्तीची विधिवत पूजा केली जाते. या दिवशी ही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी गाभाऱ्यातील विठ्ठलरुख्मिणी मूर्तीच्या समोर ठेवली जाते. त्यानंतर सायंकाळी मूर्ती रथात ठेवून रथयात्रा काढली जाते. या रथयात्रेलाही सुमारे २६० वर्षांची परंपरा आहे. रथयात्रेच्या मार्गावर प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढल्या जातात. मंदिरासह संपूर्ण गावात रोषणाई करण्यात येते. संपूर्ण गाव यावेळी हजारो भाविकांनी गजबजून जातो. रात्री उशिरा ही रथयात्रा पुन्हा मंदिराजवळ येते.

दुसऱ्या दिवशी हनुमानाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात येतो, तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेच्या दिवशी हनुमान पुन्हा येथील विठ्ठल मंदिरात बंदी स्वरूपात राहतात. असे सांगितले जाते की उत्सव काळातील तीनही दिवशी हनुमानाच्या मुद्रा वेगवेगळ्या भासतात. पहिल्या दिवशी हास्यवदन मुद्रा, दुसऱ्या दिवशी शांत, तर तिसऱ्या दिवशी रौद्रमूर्तीचे दर्शन होते.

हनुमानाची मूर्ती जरी अडीच दिवसांसाठी बाहेर काढण्यात येत असली तरी हा कार्यक्रम मात्र गावकरी आठवडाभर साजरा करतात. येथील नोंदीनुसार या उत्सवासाठी येथे ते . लाख भाविक येतात. नोकरीव्यवसायानिमित्त बाहेरगावी असणारे येथील ग्रामस्थ आवर्जून यावेळी येतात. असे सांगितले जाते की संत तुकडोजी महाराज संत गुलाबबाबा यांनीही या रथयात्रेत सहभाग घेतला होता. नवसाला पावणारा इच्छापूर्ती करणारा हा बाल हनुमान आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. संतानप्राप्तीसाठी बाल हनुमानाकडे नवस करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या मंदिरात नर्मदामाता महादेव यांचीही मंदिरे आहेत.

कोणत्याही धार्मिक उत्सवानंतर देवाला बंदीत अथवा झाकून ठेवण्याची आपल्याकडे प्रथा नसली तरी ही मूर्ती मात्र वर्षाचे ३६२ दिवस बंदीत असते. तेच या मंदिराचे वेगळेपण आहे. या मंदिरावर असलेली भाविकांची श्रद्धा वर्षभरात येणाऱ्या भाविकांच्या संख्येमुळे राज्य शासनाने या मंदिराचा तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत समावेश केला आहे

उपयुक्त माहिती:

  • नरखेडहून किमी, तर नागपूरपासून ९९ किमी अंतरावर
  • नरखेडहून गावात येण्यासाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

बंदी हनुमान मंदिर/ विठ्ठल–रुक्मिणी मंदिर

बेलोना, तह. नरखेड, जि. नागपुर

लंकेश रावण ने जब हनुमान को बंदी बनाने का प्रयास किया और उनकी पूँछ में आग लगाने का आदेश दिया, तब हनुमान ने पूरी लंका का दहन कर दिया। पुराणों की यह कथा सर्वविदित है। परंतु नागपुर जिले के बेलोना गाँव में आज भी ऐसी परंपरा है कि यहाँ हनुमान निरंतर बंदी स्वरूप में रहते हैं। वे वर्ष में केवल ढाई दिनों के लिए बाहर निकलते हैं और उनकी पूजा होती है। इसी कारण यहाँ के हनुमान “बंदी हनुमान” के नाम से प्रसिद्ध हैं। वे विठ्ठल मंदिर में प्रतिष्ठित हैं।

लोकश्रुति के अनुसार बेलोना गाँव में नरहरी जोशी नामक एक गृहस्थ रहते थे। वे वेदशास्त्र में पारंगत थे। सभी ग्रामवासी उन्हें ‘गुरुजी’ कहकर संबोधित करते थे। किसी भी शुभ कार्य से पूर्व वे उनसे परामर्श लेते थे। एक दिन अचानक गाँव की एक गौशाला में आग लग गई। पूरा गाँव आग बुझाने में जुट गया। सभी के प्रयासों से आग पर काबू पा लिया गया। उसी समय उस स्थान की जमीन के भीतर से आवाजें आने लगीं।

इस अद्भुत घटना से विस्मित होकर ग्रामवासियों ने गुरुजी से मार्गदर्शन हेतु प्रार्थना की। गुरुजी ने अपने अंतर्ज्ञान से यह अनुभव किया कि उस स्थान पर बाल हनुमान की पाषाण प्रतिमा विद्यमान है। तदोपरांत, जब वहाँ उत्खनन प्रारंभ किया गया, तब भूमि से एक पेटी प्राप्त हुई। जैसे ही उसे बाहर निकालने का प्रयास किया गया, वह पेटी पुनः भूमिगत होने लगी। संकट की इस स्थिति में गुरुजी ने सजल नेत्रों से हनुमान जी की वंदना करते हुए क्षमायाचना की। उसी क्षण पेटी से एक दिव्य वाणी गूँजी ‘मैं केवल ढाई दिनों के लिए सतह पर आऊँगा और तत्पश्चात पुनः स्वस्थान पर लौट जाऊँगा।’ तब गुरुजी ने अत्यंत विनयपूर्वक निवेदन किया ‘हे प्रभु! यदि आपकी इच्छा केवल ढाई दिन ही बाहर रहने की है, तो वैसा ही हो; किंतु इस ग्राम के संरक्षण हेतु आप यहाँ स्थायी रूप से विराजमान हों।’ इस भक्तिपूर्ण अनुनय के पश्चात पेटी स्वतः ऊपर आ गई। पेटी खोलने पर उसमें अंजलिबद्ध (नमस्कार) मुद्रा में बाल हनुमान की मनमोहक पाषाण प्रतिमा दृष्टिगोचर हुई। ग्रामवासियों ने पूर्ण श्रद्धा एवं विधि-विधान के साथ उक्त प्रतिमा को विठ्ठल मंदिर में प्रतिष्ठित किया। तभी से यहाँ ‘हनुमान प्राकट्य उत्सव’ का सूत्रपात हुआ, जिसकी गौरवशाली परंपरा २६० वर्षों से भी अधिक प्राचीन है।

नरखेड तहसील के बेलोना गाँव के मध्य में प्राचीन विठ्ठल मंदिर है। गर्भगृह में विठ्ठल–रुक्मिणी की पाषाण मूर्तियाँ मुख्य रूप से प्रतिष्ठित हैं। इनके समीप लाल रेशमी वस्त्र में लिपटी हनुमान की पाषाण मूर्ति भी है। यही हनुमान हर साल ढाई दिनों के लिए प्रकट होते हैं। उनका प्राकट्य दिवस उत्सव यहाँ का मुख्य आकर्षण है।

यह पाषाण मूर्ति बाल और दास स्वरूप में है। यह वीर रूप में नहीं है। यह मूर्ति हाथ जोड़कर खड़ी है। मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी को मूर्ति की विधिवत पूजा होती है। उस दिन मूर्ति विठ्ठल–रुक्मिणी के सम्मुख दर्शन के लिए रखी जाती है। सायंकाल को मूर्ति रथ में विराजमान कर भव्य रथयात्रा निकाली जाती है। लगभग 260 वर्षों से यह परंपरा निरंतर चल रही है। यात्रा मार्ग पर और घर–घर के सामने रंगोलियाँ बनाई जाती हैं। मंदिर और गाँव को सजाया जाता है। इस अवसर पर हजारों श्रद्धालु उमड़ पड़ते हैं। रात्रि में रथ पुनः मंदिर में पहुँचता है।

दूसरे दिन पाषाण मूर्ति का अभिषेक किया जाता है। तीसरे दिन, अर्थात प्रतिपदा को, हनुमान पुनः विठ्ठल मंदिर में बंदी रूप में विराजमान हो जाते हैं। श्रद्धालुओं का विश्वास है कि तीनों दिनों में हनुमान की मुद्राएँ भिन्न–भिन्न दिखाई देती हैं। वे पहले दिन हँसमुख, दूसरे दिन शांत और तीसरे दिन रौद्र रूप में दिखते हैं।

यद्यपि हनुमान की पाषाण मूर्ति केवल ढाई दिन बाहर निकाली जाती है, परंतु ग्रामवासी उत्सव सप्ताहभर मनाते हैं। उपलब्ध जानकारी के अनुसार इस उत्सव में हर साल 2 से 2.5 लाख श्रद्धालु सम्मिलित होते हैं।

गाँव से बाहर रहने वाले निवासी भी इस अवसर पर अवश्य आते हैं। कहा जाता है कि संत तुकडोजी महाराज और संत गुलाब बाबा ने भी इस रथयात्रा में सहभागिता की थी।

श्रद्धालुओं की श्रद्धा है कि ये बाल हनुमान मन्नत पूरी करने वाले और इच्छापूर्ति कराने वाले हैं। विशेषकर संतान प्राप्ति हेतु यहाँ मन्नत करने वालों की संख्या अत्यधिक है। मंदिर परिसर में नर्मदा माता और महादेव के भी मंदिर हैं। वहाँ शिवलिंग स्थापित है।

सामान्यतया किसी देवता को उत्सव के बाद बंदी या ढक कर रखने की परंपरा नहीं है। परंतु यहाँ की पाषाण मूर्ति वर्ष के 362 दिन बंद रहती है। यही इस मंदिर की विशिष्टता है। श्रद्धालुओं की अटूट आस्था और यहाँ आने वालों की संख्या को देखते हुए राज्य शासन ने इस मंदिर को तीर्थक्षेत्र की ‘क’ श्रेणी में शामिल किया है।

प्रमुख विशेषताएँ

  • नरखेड से 5 किमी और नागपुर से 99 किमी की दूरी।
  • नरखेड से गाँव तक एस.टी. बस सुविधा उपलब्ध है।
  • निजी वाहन सीधे मंदिर तक पहुँच सकते हैं।
  • परिसर में निवास और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है।
Back To Home