
‘विदर्भाची काशी’ अशी ख्याती असलेल्या देवळी तालुक्यातील कोटेश्वर महादेवाचे मंदिर विदर्भातील प्राचीन मंदिरांपैकी एक महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. हे देवस्थान सुमारे ४००० वर्षांपासून अस्तित्वात आहे, असा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर निसर्गसमृद्ध प्रदेशात ज्या टेकडीवर हे मंदिर आहे, ती भस्माची टेकडी असल्याचे सांगितले जाते. केवळ या मंदिराभोवती वर्धा नदी उत्तर वाहिनी होऊन मंदिराला प्रदक्षिणा घालते व पुन्हा पूर्व–पश्चिम वाहते हे येथील आश्चर्य व वैशिष्ट्य मानले जाते.
कोटेश्वर मंदिराची आख्यायिका अशी की ऋषी विश्वामित्र या नदीकिनारी भ्रमण करीत असताना त्यांना श्रीरामांचे गुरू वशिष्ठ ऋषी यांचे शतपुत्र येथील अरण्यात निद्रिस्त अवस्थेत दिसले. हे पाहून विश्वामित्रांचा क्रोध अनावर झाला व त्यांनी निद्रिस्त असलेल्या शतपुत्रांवर आपल्या कमंडलूतील पाणी शिंपडून
भस्म केले. ध्यानधारणेत मग्न असलेल्या वशिष्ठ ऋषींना जेव्हा याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी येथे कोटीयज्ञ केले व या नदीचा प्रवाह उत्तर वाहिनी व्हावा म्हणून तिला प्रसन्न करून घेतले. वशिष्ठांच्या विनंतीवरून ही नदी येथे उत्तरवाहिनी झाली व त्या पवित्र पाण्याने त्यांनी आपल्या पुत्राला पुन्हा जिवंत केले. कार्यसिद्धीनंतर त्यांनी या भस्माच्या टेकडीवरच शिवलिंगाची स्थापना केली. तेच हे आजचे कोटेश्वर मंदिरात असलेले शिवलिंग आहे, असे म्हटले जाते. या परिसरात खोदकाम केले असता येथे मातीऐवजी तुपाचा सुगंध असलेले यज्ञाचे भस्म सापडते.
वर्धा–यवतमाळ मार्गावर वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या या मंदिर परिसरात श्रीरामांचे वास्तव्य होते, असे सांगितले जाते. या मंदिराची स्थापत्यशैली हेमाडपंती रचनेची असून बांधकामात लांब व मोठ्या आकाराच्या दगडी चिऱ्यांचा वापर करण्यात आला आहे. पुराच्या पाण्याने मंदिराचे नुकसान होऊ नये म्हणून मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीच्या सर्व बाजूंनी दगडी संरक्षक भिंत घालण्यात आली आहे. मंदिरासमोर प्रशस्त प्रांगण असून ५ ते ६ फूट उंच चौथऱ्यावर मंदिराचे बांधकाम आहे. प्रांगणातून १२ ते १३ पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार व त्याभोवती असलेली द्वारपट्टी पितळेची असून त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम आहे. प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस उभा नंदी, तर त्याच्याही वर छतावर असलेल्या देवळीमध्ये महादेवाची मूर्ती आहे.
प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर प्राचीन व मूळ मंदिर दिसते. अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. अंतराळात पितळी नंदी आहे. येथील गर्भगृह अंतराळापासून ३ फूट खोलवर असून त्यात असलेल्या प्राचीन शिवपिंडीला पितळी पत्र्याने मढविलेले आहे. येथील गाभाऱ्यामध्ये अनेकदा अचानक गंगा अवतीर्ण होऊन शिवपिंडीवर दीड ते दोन फूट पाणी येते व काही वेळाने ते ओसरून जाते.
वर्धा नदी ही वर्धा व यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे. कोटेश्वर मंदिराच्या पलीकडील तीरावर खटेश्वर नावाचे देवस्थान आहे. ते यवतमाळ जिल्ह्यात येते. या दोन्ही मंदिरांना जोडण्यासाठी शासनाच्या निधीतून नदीवर झुलता पूल बनविण्याचे काम सुरू आहे. हा विदर्भातील अशा प्रकारचा पहिलाच पूल होणार असून तो येथील आकर्षण ठरणार आहे. दरवर्षी माघ शुद्ध चतुर्थीपासून येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवाची सुरुवात होते. त्यानंतर महाशिवरात्री व फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला दहीहांडी, गोपालकाला, महाप्रसाद अशा कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता होते. ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवादरम्यान १,००,००० पेक्षा
अधिक भाविक कोटेश्वर महादेवाच्या दर्शनाला येतात, अशी नोंद आहे. याशिवाय श्रावण महिन्यात हजारो भाविक येथे दर्शनाला येत असतात.
मंदिराच्या परिसरात अनेक साधू–संतांची समाधी स्थाने आहेत. वर्धा नदीच्या पूर्वेकडील बाजूस श्रीरामांचे मंदिर आहे. असे सांगितले जाते की वर्धा नदी कधीही कोरडी पडत नाही. उन्हाळ्यातसुद्धा नदीला भरपूर पाणी असते. विशेष म्हणजे बेलाचे पान नदीत टाकले तर ते पान या नदीत तरंगत नाही, ते थेट बुडते. उत्तर वाहिनी असल्यामुळे या नदीला विशेष महत्त्व आहे. कोटेश्वर येथे रक्षा विसर्जन केल्याने मृत व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे दररोज रक्षा विसर्जनासाठी अनेक लोक येत असतात.
देवळी तालुक्यातील या प्राचीन देवस्थानावर भाविकांची असलेली श्रद्धा, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या व निसर्गसमृद्ध परिसरामुळे पर्यटकांचीही या स्थानाला असणारी पसंती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारकडून या मंदिराला तीर्थस्थळाचा ‘ब‘ दर्जा देण्यात आला आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या मंदिर परिसराच्या विकासासाठी ९,००,००,०००/- रुपयांचा (नऊ कोटी) निधी दिला आहे. इतर पर्यटनस्थळांप्रमाणे कोटेश्वर मंदिर व या परिसराचाही विकास होत आहे.

‘विदर्भ की काशी’ के नाम से विख्यात, देवली तहसील में स्थित कोटेश्वर महादेव मंदिर को विदर्भ के प्राचीन एवं महत्वपूर्ण श्रद्धास्थलों में से एक माना जाता है। प्राचीन ग्रंथों में इस बात का उल्लेख मिलता है कि यह देवस्थान लगभग चार हजार वर्षों से अस्तित्व में है। वर्धा नदी के पश्चिमी तट पर, प्राकृतिक रूप से समृद्ध यह क्षेत्र ‘भस्म की पहाड़ी’ पर स्थित है। इस स्थान की विशेष बात यह है कि मंदिर के चारों ओर वर्धा नदी उत्तर-वाहिनी होकर मंदिर की परिक्रमा करती है और तत्पश्चात पूर्व-पश्चिम दिशा में प्रवाहित होती है।
कोटेश्वर मंदिर की पौराणिक कथा के अनुसार, जब ऋषि विश्वामित्र नदी के किनारे भ्रमण कर रहे थे, तब उन्होंने श्रीराम के गुरु, महर्षि वशिष्ठ के सौ पुत्रों को निद्रा में लीन देखा। यह दृश्य देखकर विश्वामित्र का क्रोध भड़क उठा और उन्होंने अपने कमंडल के जल से उन सभी को भस्म कर दिया। जब ध्यानस्थ महर्षि वशिष्ठ को इस घटना की जानकारी मिली, तो उन्होंने इस स्थान पर कोटि यज्ञ किया और वर्धा नदी को उत्तर-वाहिनी बनाया। इसके साथ ही उन्होंने अपने भस्म हुए पुत्रों की पुनर्जीवन प्रक्रिया संपन्न कराई और भस्म की पहाड़ी पर एक शिवलिंग की स्थापना
की। यही शिवलिंग आज कोटेश्वर मंदिर में प्रतिष्ठित है। कहा जाता है कि इस क्षेत्र में आज भी खुदाई करने पर यज्ञ की भस्म की सुगंध आती है।
वर्धा-यवतमाल रास्ते पर वर्धा नदी के किनारे बसे इस मंदिर परिसर में श्रीराम का वास माना जाता है। मंदिर की बनावट हेमाडपंती शैली की है और इसे बनाने में बड़े-बड़े और लंबे पत्थरों का उपयोग किया गया है। बाढ़ के पानी से होने वाले नुकसान से बचाने के लिए पहाड़ी के चारों तरफ पत्थर की एक सुरक्षा दीवार बनाई गई है। मंदिर के सामने एक बड़ा प्रांगण है, जहाँ लगभग ५-६ फुट ऊँचे चबूतरे पर मंदिर बना है। प्रांगण से १२-१३ सीढ़ियाँ चढ़कर मंदिर के सभा मंडप के प्रवेश द्वार तक पहुँचा जा सकता है। प्रवेश द्वार और उसके आसपास की चौखट पीतल की बनी हैं, जिन पर सुंदर नक्काशी है। प्रवेश द्वार के ऊपर नंदी की मूर्ति है और छत की दीवार में महादेव की प्रतिमा विराजमान है।
प्रवेश द्वार के आगे प्राचीन और मूल मंदिर है। मंदिर की बनावट अंतराल और गर्भगृह में बटी है। अंतराल में पीतल के बने नंदी विराजमान हैं। गर्भगृह, अंतराल से लगभग ३ फुट गहरा है। वहाँ प्राचीन शिवलिंग स्थापित है, जिसे पीतल के कवच से ढका गया है।
गर्भगृह में कभी-कभी अचानक गंगाजल प्रकट होता है और शिवलिंग पर १.५ से २ फुट तक जल भर जाता है, जो कुछ समय बाद अपने आप उतर भी जाता है। वर्धा नदी, वर्धा और यवतमाल जिलों की सीमा बनाती है। कोटेश्वर मंदिर के दूसरी तरफ यवतमाल जिले में खटेश्वर देवस्थान है।
माघ मास की शुक्ल चतुर्थी से मंदिर में महाशिवरात्रि यात्रा उत्सव का आरंभ होता है। महाशिवरात्रि और फाल्गुन मास की शुक्ल प्रतिपदा को दही-हांडी, गोपाल-काला तथा महाप्रसाद जैसे कार्यक्रमों के साथ इस उत्सव का समापन होता है। इस अवधि में एक लाख से अधिक श्रद्धालु दर्शन हेतु आते हैं। श्रावण मास में भी हजारों भक्त दर्शन के लिए यहाँ आते हैं।
मंदिर परिसर में अनेक साधु-संतों की समाधियाँ हैं। वर्धा नदी के पूर्वी किनारे पर श्रीराम मंदिर स्थित है। ऐसी मान्यता है कि वर्धा नदी कभी सूखती नहीं है; ग्रीष्मकाल में भी इसमें पर्याप्त जल रहता है। एक विशेष बात यह है कि यदि बेल का पत्ता नदी में डाला जाए तो वह तैरने के बजाय डूब जाता है। उत्तर-वाहिनी होने के कारण इस नदी का विशेष धार्मिक महत्व है। ऐसी श्रद्धा है कि कोटेश्वर में अस्थि-विसर्जन करने से मृत व्यक्ति को मोक्ष की प्राप्ति होती है, जिस कारण यहाँ प्रतिदिन अनेक भक्त आते हैं। महाराष्ट्र सरकार ने इस प्राचीन देवस्थान को तीर्थस्थल की ‘ब’ श्रेणी में सम्मिलित किया है।