
महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून वर्धा जिल्हा प्रसिद्ध आहे. वर्धा शहरातील लक्ष्मी–नारायण मंदिर महत्त्वाच्या धार्मिक स्थानाबरोबरच अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार ठरले आहे. १९०५ मध्ये बांधलेले हे मंदिर जमनालाल बजाज यांनी १९२८ मध्ये हरिजनांसाठी खुले केले. दलित, अस्पृश्यांसाठी खुले झालेले हे देशातील पहिले मंदिर ठरले होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील देवतांच्या मूर्तींना भरजरी वस्त्रांऐवजी केवळ खादीची वस्त्रे परिधान केली जातात. १०० हून जास्त वर्षांपासूनची ही परंपरा आजही पाळली जाते.
वर्धा शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराचे सेठ बच्छराज यांच्या मार्गदर्शनाखाली १९०५ मध्ये बांधकाम सुरू झाले आणि १९०७ मध्ये त्यात लक्ष्मी– नारायण यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. १७ जुलै १९२८ रोजी महात्मा गांधींच्या आदर्शांनी प्रेरित होऊन आणि जमनालाल बजाज यांच्या पुढाकाराने आचार्य विनोबा भावे यांनी या मंदिरात दलितांना प्रवेश मिळवून देण्यासाठी दलितांच्या एका गटाचे नेतृत्व केले होते.
गांधीजींना अभिप्रेत असलेले समाजसुधारणेचे धाडस जमनालाल बजाज यांनी दाखविले होते. गांधीवादी सामाजिक क्रांतिपर्वातील ही महत्त्वाची वाटचाल होती.
दलितांना प्रवेश देणारे भारतातील हे पहिलेच मंदिर ठरल्याने देश–विदेशातून तेव्हा त्याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या महत्त्वपूर्ण घटनेनंतर गांधीजींनी प्रसिद्ध केलेल्या आपल्या मनोगतामध्ये असे म्हटले होते की लक्ष्मी–नारायण मंदिरासारखे सुप्रसिद्ध मंदिर अस्पृश्यांना जाहीरपणे खुले करण्यात येत असताना सनातन्यांनी विरोधाचा ‘ब्र’ ही काढू नये, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. आजपर्यंत मनाई असलेल्या हिंदू मंदिराचा उंबरठा ओलांडण्यास अस्पृश्य लोक पुढे येत आहेत, हे पाहूनही सनातन धर्माच्या नावाखाली धर्ममार्तंडांनी गोंधळ माजविला नाही, हे खरोखरच महत्त्वपूर्ण आहे. अस्पृश्यतेविरुद्ध चालू असलेल्या चळवळीची किती आश्चर्यकारक प्रमाणात प्रगती झाली आहे, याचे हे स्पष्ट निदर्शक आहे. सुधारणेच्या खऱ्या
चळवळीसाठी दृढनिष्ठा व चिकाटी यांच्याद्वारे कणखर लोकमत कसे बनविता येते, तेही यावरून दिसून येईल. शेठ जमनालाल बजाज व त्यांचे सहकारी विश्वस्त यांनी हा जो धाडसी उपक्रम केला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि सबंध हिंदुस्थानभर त्यांचे अनुकरण केले जाईल, अशी मी आशा बाळगतो.
१९४२ मध्ये सेवाग्राम येथून ‘छोडो भारत’ आंदोलनासाठी मुंबईला रवाना होण्याआधी महात्मा गांधी यांनी या मंदिरात येऊन लक्ष्मी–नारायणाचे दर्शन घेतले होते. हे भव्य मंदिर यावर असलेले वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम, उत्कृष्ट शिल्पे, स्तंभांवरील कुशल कारागिरी यासाठीही प्रसिद्ध आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर असून दोन्ही बाजूला द्वारपालांची शिल्पे आहेत. ६ ते ७ पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे.
अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील द्वारपट्टीच्या वरच्या दोन्ही बाजूला बासरी वाजवितानाच्या श्रीकृष्ण मूर्ती आहेत़, तर ललाटबिंबावर श्रीगणेशाची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आहे. अंतराळातील स्तंभांवर कलाकुसर असून वरच्या बाजूला भारवाहक प्रतिमांचे अंकन आहे.
गर्भगृहात उंच चौथऱ्यावर श्रीविष्णू व लक्ष्मी माता यांच्या शुभ्र संगमरवरी मूर्ती आहेत. श्रीविष्णूंची मूर्ती चतुर्भुज, तर लक्ष्मी मातेची मूर्ती द्विभुज आहे. या दोन्ही मूर्तींवर सुंदर मुकट आहेत.
स्वर्गीय जमनालाल बजाज यांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुले केल्यानंतर १९ जुलै १९२८ रोजी या मंदिराच्या शेजारीच गोरगरिबांसाठी धर्मार्थ औषधालय सुरू केले होते. ९६ वर्षांनंतर आजही मंदिराशेजारी हे औषधालय सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात असणाऱ्या सेवाग्राम येथील बापू कुटी, पवनार येथील आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम या वास्तूंना ऐतिहासिक महत्त्व आहे. त्याचबरोबरीने जमनालाल बजाज यांच्या काळात सुरू झालेल्या लक्ष्मी–नारायण मंदिरालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणांना भेटी देण्यासाठी देश–विदेशातील अनेक पर्यटक येत असतात.
वृंदावनात साजरी होणारी ‘लठमार’ होळी देशात परिचित आहे. यामध्ये गोपिका आपल्या पती वा प्रियकरास लाठीने मारण्यासाठी जातात व ते त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. यावेळी रंगांची व फुलांची उधळण होत असते. अशाच प्रकारच्या होळीचे आयोजन लक्ष्मी–नारायण मंदिरातही दरवर्षी करण्यात येते.
केवळ यामध्ये रंगांचा वापर न करता फुलांची उधळण होते. या देवस्थानाचे विश्वस्त प्रसिद्ध उद्योजक बजाज कुटुंबीय आहेत. हा होळीचा सण साजरा करण्यासाठी बजाज कुटुंबातील सदस्य पुण्याहून वर्धा येथे दरवर्षी आवर्जून येतात. येथील आणखी एक वैशिष्ट्य असे की या मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्यापासून नैवेद्याचा प्रसाद हा गाईचे दूध, तूप व मंदिराजवळ असलेल्या कुंडाच्या पाण्यापासूनच बनविला जातो.
या मंदिरामध्ये सुसज्ज ग्रंथालय असून त्यात संस्कृत, प्राकृत व हिंदी भाषेतील वेद, उपनिषदे, भागवत इत्यादी अनेक ग्रंथांचा संग्रह आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी वर्धा रेल्वे स्थानकाजवळ मंदिराच्या मालकीची सेठ बच्छराज धर्मशाळाही आहे. देवस्थान ट्रस्टतर्फे येथे दररोज सकाळी ६ ते ७.३० पर्यंत निःशुल्क प्राणायाम वर्ग चालविले जातात. दररोज रात्री ८ ते ९.१५ वाजता येथे भजन होते. तसेच प्रत्येक शनिवारी हनुमान चालिसाचे पठण केले जाते.

महात्मा गांधी और आचार्य विनोबा भावे की कर्मभूमि के रूप में वर्धा जिला विख्यात है। वर्धा शहर में स्थित लक्ष्मी-नारायण मंदिर न केवल एक महत्वपूर्ण धार्मिक स्थल है, अपितु अनेक ऐतिहासिक घटनाओं का साक्षी भी रहा है। इस मंदिर का निर्माण वर्ष १९०५ में हुआ और वर्ष १९२८ में जमनालाल बजाज द्वारा इसे हरिजनों के लिए खोल दिया गया। यह देश का पहला मंदिर था, जिसे दलितों और अस्पृश्यों के लिए खोला गया था। इस मंदिर की एक अनूठी विशेषता यह है कि यहाँ की मूर्तियों को भारी वस्त्रों के स्थान पर केवल खादी के वस्त्र पहनाए जाते हैं। यह परंपरा सौ से अधिक वर्षों से निरंतर जारी है।
वर्धा शहर के मध्य में स्थित इस मंदिर का निर्माण सेठ बच्छराज के मार्गदर्शन में वर्ष १९०५ में आरंभ हुआ तथा १९०७ में यहाँ लक्ष्मी-नारायण की मूर्तियों की प्राण-प्रतिष्ठा की गई। १७ जुलाई १९२८ को, महात्मा गांधी के आदर्शों से प्रेरित होकर,
जमनालाल बजाज के प्रयासों से आचार्य विनोबा भावे ने दलितों के मंदिर प्रवेश का नेतृत्व किया। इस प्रकार, गांधीजी के सामाजिक सुधार के दृष्टिकोण को जमनालाल बजाज ने मूर्त रूप प्रदान किया।
दलितों को प्रवेश देने वाला भारत का प्रथम मंदिर बन जाने के कारण देश-विदेश से अनेक प्रतिक्रियाएँ प्राप्त हुईं। गांधीजी ने इस पर अपने विचार व्यक्त करते हुए लिखा था, “लक्ष्मी-नारायण जैसे प्रसिद्ध मंदिर का अस्पृश्यों के लिए खुल जाना एक आश्चर्यजनक घटना है। इस कदम का पंडितों द्वारा विरोध न किया जाना, अस्पृश्यता के विरुद्ध चल रहे आंदोलन की एक बहुत बड़ी प्रगति है। जमनालाल बजाज और उनके सहयोगियों द्वारा उठाया गया यह साहसी कदम प्रेरणादायक है।”
वर्ष १९४२ में सेवाग्राम से ‘भारत छोड़ो’ आंदोलन के लिए मुंबई प्रस्थान करने से पूर्व महात्मा गांधी ने इस मंदिर में दर्शन किए थे। यह भव्य मंदिर अपनी उत्कृष्ट शिल्पकला तथा स्तंभों पर की गई बारीक नक्काशी के लिए प्रसिद्ध है। मंदिर के प्रवेशद्वार पर विभिन्न कलाकृतियाँ एवं द्वारपालों की मूर्तियाँ स्थापित हैं। ६-७ सीढ़ियाँ चढ़कर सभामंडप में प्रवेश किया जाता है। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराल और गर्भगृह शामिल हैं।
अंतराल के प्रवेशद्वार पर दोनों ओर बांसुरी बजाते हुए श्रीकृष्ण की मूर्तियाँ हैं, जबकि ललाटबिंब पर श्रीगणेश की मूर्ति अंकित है। अंतराल के स्तंभों पर उत्कृष्ट कलाकृति है तथा ऊपरी भाग में भारवाहक (भार ढोने वाले पौराणिक जीव) की प्रतिमाएँ अंकित हैं। गर्भगृह में एक चबूतरे पर श्रीविष्णु और लक्ष्मी माता की शुभ्र संगमरमर की मूर्तियाँ स्थापित हैं। श्रीविष्णु की मूर्ति चतुर्भुजी तथा लक्ष्मी माता की मूर्ति द्विभुज है। दोनों ही मूर्तियों पर सुंदर मुकुट सुशोभित हैं।
जमनालाल बजाज द्वारा हरिजनों के लिए मंदिर खोलने के पश्चात, १९ जुलाई १९२८ को मंदिर के समीप निर्धनों के लिए एक धर्मार्थ औषधालय खोला गया। ९६ वर्ष बाद भी यह औषधालय निरंतर कार्यरत है। यह मंदिर, वर्धा जिले में स्थित सेवाग्राम और पवनार के आश्रमों तथा बापू कुटी के समान ही ऐतिहासिक महत्व रखता है।
लक्ष्मी-नारायण मंदिर में मूर्तियों के लिए नैवेद्य (प्रसाद) विशेष रूप से गाय के दूध, घी और मंदिर के कुंड के जल से ही बनाया जाता है। मंदिर में एक ग्रंथालय भी है, जिसमें संस्कृत, प्राकृत और हिंदी भाषाओं के वेद, उपनिषद और भागवत जैसे ग्रंथों का संग्रह है।
भक्तों की सुविधा के लिए वर्धा रेलवे स्थानक के पास मंदिर न्यास का एक धर्मशाला भवन भी है। न्यास द्वारा प्रतिदिन प्रातः ६ से ७:३० तक निःशुल्क प्राणायाम कक्षा और रात्रि ८ से ९:१५ बजे तक भजन का आयोजन किया जाता है। प्रत्येक शनिवार को यहाँ हनुमान चालीसा का पाठ होता है।