यज्ञसेनी देवी कार्तिक स्वामी मंदिर

पुणतांबा, ता. राहाता, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात गोदावरीच्या तीरावर वसलेल्या पुणतांबे या गावास धार्मिक, पौराणिक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. गोदावरीच्या उगमापासूनच्या प्रवासात ती केवळ पुणतांबा येथे दक्षिणवाहिनी होते. पूर्वपश्चिम वाहणारी नदी ज्या ठिकाणी दक्षिणवाहिनी होते ते स्थान धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र समजले जाते. पुणतांब्यात १६ मारुती मंदिरे, महादेव मंदिरे, विठ्ठल मंदिरे, दत्त मंदिरे, लक्ष्मीनारायण मंदिर आणि चांगदेव महाराज मंदिर अशी धार्मिक स्थळे असल्यामुळे या गावास मंदिरांचे गाव असे म्हटले जाते. या मंदिरांच्या गावात ४०० वर्षांपूर्वीचे यज्ञसेनी देवीचे मंदिर दुर्मिळ असे हेमाडपंती रचनेचे कार्तिक स्वामी मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

ऐतिहासिक उल्लेखांनुसार, प्राचीन काळी पुण्यस्तंभ वा ताम्रनगरी (आताचे पुणतांबा) ही राजा विक्रमादित्याची राजधानी होती. हे गाव गोदावरी तीरावर वसलेले असल्यामुळे आणि येथील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांमुळे या गावाला दक्षिणकाशी असेही संबोधले जाते. या गोदावरीच्या काठी यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे. यज्ञसेनी देवी मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील देवीच्या व्युत्पत्तीबाबत आख्यायिका अशी की प्राचीन काळी येथे चंद्रसेन राजा राज्य करीत होता, त्याच्या मुलास एक गंभीर आजार होता. अनेक उपचार करूनही तो बरा होत नव्हता. त्यावेळी राजास एका रात्री स्वप्न पडले की गोदावरीच्या काठावर यज्ञ करून त्यात १२ वर्षांखालील मुलाचा बळी दिल्यास त्याचा मुलगा रोगमुक्त होईल.

या स्वप्नदृष्टांतानुसार राज्यात दवंडी पिटवली गेली, ‘जो कोणी ब्राह्मण आपल्या मुलाला राजाकडे यज्ञात बळी देण्यासाठी देईल, त्याला मुलाच्या वजनाइतके सोने दान करण्यात येईल.’ येथून जवळ असलेल्या पुरणगावात गोऱ्हे आडनावाचे गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. त्यांना पाच मुले होती. त्यापैकी मुद्‌गल नावाच्या मुलाने राजाची ही दवंडी ऐकली विचार केला की माझ्या बळी जाण्याने आपल्या कुटुंबाचे कल्याण होत असेल तर मी बळी जाण्यास तयार आहे. त्याने बळी जाण्याचे ठरवले तसे राजाला कळविण्यात आले. राजाने मुद्‌गलच्या वजनाइतके सोने गोऱ्हे कुटुंबाला देऊन मुद्‌गलची संपूर्ण राज्यातून मिरवणूक काढली त्यास बळी देण्यासाठी यज्ञकुंडाजवळ बसविले. मुद्‌गलची पूजा करून त्यास बळी देण्यासाठी यज्ञात टाकताच यज्ञातून देवी प्रकट झाली तिने मुद्‌गल यास वरचेवर झेलून यज्ञकुडांबाहेर सोडले. यज्ञातून निघालेली देवी म्हणून ही देवी पुढे यज्ञसेनी नावाने प्रसिद्ध झाली. श्री यज्ञसेनी देवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला गोदावरीच्या तीरावर स्थित आहे.

त्यानंतर मुद्‌गल यांनी येथेच राहून देवीची अनेक वर्षे सेवा केली. त्यांना १४० वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. या ठिकाणी त्यांनी मुद्‌गल पुराण हा ग्रंथही लिहिला. मंदिरात देवीची पाषाणातील मूर्ती आहे. ही देवी अहिल्यानगर जिल्ह्यासोबतच खानदेशातील हजारो भाविकांची कुलदेवता मानली जाते. देवी मंदिरापासून काही अंतरावर मुद्‌गलेश्वर यांनी समाधी घेतली. हे समाधी मंदिर मुद्‌गलेश्वर (मुंजाचे) मंदिर म्हणून आज प्रसिद्ध आहे.

गोदावरी तीरावरील यज्ञसेनी देवीच्या मंदिराला सर्व बाजूंनी उंच तटबंदी आहे. त्यामुळे नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे मंदिराचे नुकसान झालेले नाहीतटबंदीच्या प्रवेशद्वाराजवळ उंच प्राचीन दीपमाळ असून या दीपमाळेच्या आतून अरुंद जिन्यातून वर टोकावर जाता येते. तटबंदीत असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मंदिर परिसरात प्रवेश होतो. जुन्या वाड्याप्रमाणे येथील रचना आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात ४०० वर्षांपूर्वीचा शिलालेख असून त्यावर पुरातन जीर्ण झालेल्या मंदिराचा शके १६८१ रोजी हरबाजी बिडवाई यांनी नूतनीकरण केल्याचा उल्लेख आहे.

गोदावरीच्या एका किनाऱ्यावर यज्ञसेनी देवी, तर दुसऱ्या किनाऱ्यावर कार्तिक स्वामींचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार १६६४ मध्ये झालेला आहे. असे सांगितले जाते की या मंदिराजवळ आदिलशाही निजामशाही यांची सीमा निश्चित करणारे ठिकाण होते. श्री कार्तिक स्वामींची महाराष्ट्रात मंदिरे आहेत. त्या सर्व मंदिरांमध्ये एकमुखी मूर्ती असून पुणतांबा येथील मंदिरामध्ये कार्तिक स्वामींची सहामुखी (षष्टमुखी) मूर्ती आहे. वर्षभर या मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नसला तरी कार्तिक पौर्णिमेच्या (त्रिपुरारी पौर्णिमा) दिवशी गाभाऱ्यात जाऊन स्त्रियांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. कार्तिक स्वामींच्या दर्शनाने आरोग्य, धनसंपत्ती, महिलांना सौभाग्याची प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे मोठी जत्रा भरते. त्या एकाच दिवशी महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची अनुमती असल्यामुळे या जत्रेत महिलांची उपस्थिती लक्षणीय असते.

मंदिरांचे गाव यासोबतच पुणतांबा हे गाव प्रसिद्ध आहे ते ऐतिहासिक शेतकरी संपासाठी. २०१७ साली झालेल्या शेतकरी संपाची सुरुवात पुणतांबा गावापासून झाली. ग्रामसभेत ठराव करून जून २०१७ पासून येथील शेतकरी संपावर गेले. त्यांनी शहराकडे जाणारा भाजीपाला, अन्नधान्य दूध पुरवठा रोखला पेरणीही करण्याचे ठरविले. येथून सुरू झालेल्या संपाचे रूपांतर नंतर राज्यव्यापी आंदोलनात झाले होते. त्यावेळी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करावी लागली होती.

उपयुक्त माहिती:

  • राहातापासून १९ किमी, तर शिर्डीपासून १७ किमी अंतरावर
  • राहाता शिर्डीपासून येथे एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा

यज्ञसेनी देवी एवं कार्तिक स्वामी मंदिर

पुणतांबा, तह. राहाता, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर जिले की राहाता तहसील में गोदावरी नदी के तट पर स्थित पुणतांबा गाँव को धार्मिक, पौराणिक और ऐतिहासिक विरासत प्राप्त है। गोदावरी नदी अपने उद्गम से लेकर संपूर्ण प्रवाह में केवल पुणतांबा में दक्षिण की ओर बहती है। पूर्व-पश्चिम बहने वाली नदी जहाँ दक्षिणवाहिनी होती है, वह स्थान धार्मिक रूप से अत्यंत पवित्र माना जाता है। पुणतांबा में 16 मारुति मंदिर, 6 महादेव मंदिर, 3 विठ्ठल मंदिर, 2 दत्त मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर और चांगदेव महाराज मंदिर जैसे धार्मिक स्थान होने के कारण इस गाँव को “मंदिरों का गाँव” कहा जाता है। इन्हीं मंदिरों में स्थित 400 वर्ष पुराना यज्ञसेनी देवी मंदिर और दुर्लभ हेमाडपंती शैली का कार्तिक स्वामी मंदिर विशेष रूप से प्रसिद्ध हैं।

ऐतिहासिक संदर्भों के अनुसार प्राचीन काल में पुणतांबा (तत्कालीन पुण्यस्तंभ या ताम्रनगरी) राजा विक्रमादित्य की राजधानी थी। गोदावरी के तट पर बसे इस गाँव को उसके धार्मिक महत्त्व के कारण ‘दक्षिणकाशी’ भी कहा जाता है। गोदावरी के किनारे स्थित यज्ञसेनी देवी मंदिर हज़ारों श्रद्धालुओं की आस्था का केंद्र है। देवी के नाम की उत्पत्ति से संबंधित एक कथा के अनुसार प्राचीन काल में यहाँ चंद्रसेन नामक राजा राज्य करता था। उसका पुत्र गंभीर रोग से पीड़ित था। तमाम उपचारों के बावजूद भी वह ठीक नहीं हो रहा था। एक रात राजा को स्वप्न आया कि यदि गोदावरी के किनारे यज्ञ करके उसमें 12 वर्ष से कम आयु के बालक की बलि दी जाए, तो उसका पुत्र रोगमुक्त हो जाएगा।

इस स्वप्न के बाद संपूर्ण राज्य में घोषणा करवाई गई कि जो ब्राह्मण अपने पुत्र को यज्ञ में बलि हेतु देगा, उसे बालक के भार के बराबर स्वर्ण दान स्वरूप मिलेगा। पास ही के पुरणगाँव में गोऱ्हे उपनाम वाले एक निर्धन ब्राह्मण परिवार के पाँच पुत्रों में से मुद्गल नामक बालक ने यह घोषणा सुनी। उसने सोचा कि यदि उसके बलिदान से परिवार का कल्याण होता है, तो वह बलि हेतु तैयार है। उसने राजा को इस बारे में सूचना दी। राजा ने मुद्गल के भार के बराबर स्वर्ण उस परिवार को देकर उसकी संपूर्ण राज्य में शोभायात्रा निकाली और उसे यज्ञकुंड के समीप बिठाया। पूजन के उपरांत जैसे ही मुद्गल को यज्ञ में अर्पित किया गया, यज्ञकुंड से देवी प्रकट हुईं और मुद्गल को पकड़कर यज्ञकुंड के बाहर सुरक्षित छोड़ दिया। यज्ञ से प्रकट होने के कारण इस देवी को यज्ञसेनी नाम मिला। श्री यज्ञसेनी देवी का मंदिर गाँव के पश्चिम भाग में गोदावरी के किनारे स्थित है।

बाद में मुद्गल वहीं रहकर देवी की सेवा में लीन हो गए। उन्हें 140 वर्षों का दीर्घ जीवन प्राप्त हुआ और उन्होंने वहीं ‘मुद्गल पुराण’ ग्रंथ की रचना की। मंदिर में देवी की पाषाण मूर्ति है। यह देवी केवल अहिल्यानगर जिले में ही नहीं, बल्कि खानदेश के अनेक श्रद्धालुओं की कुलदेवी मानी जाती हैं। देवी मंदिर से कुछ दूरी पर मुद्गल ऋषि का मुद्गलेश्वर समाधि मंदिर स्थित है।

गोदावरी तट पर स्थित यज्ञसेनी देवी मंदिर चारों ओर से ऊँची प्राचीर से घिरा हुआ है। इससे नदी में बार-बार आने वाली बाढ़ के बावजूद मंदिर को कोई क्षति नहीं पहुँची है। प्रवेशद्वार के पास एक प्राचीन, ऊँची दीपमाला है। इसकी संकरी वृत्ताकार सीढ़ियों से ऊपर चढ़ा जा सकता है। प्राचीर के मुख्य द्वार से प्रवेश करने पर मंदिर परिसर आता है, जिसकी रचना पुरानी हवेलियों जैसी है। मंदिर में सभामंडप और गर्भगृह की रचना है। सभामंडप में 400 वर्ष पुराना एक शिलालेख है। इसमें उल्लेख है कि इस प्राचीन मंदिर का जीर्णोद्धार शक 1681 (सन् 1759) में हरबाजी बिडवाई ने करवाया था।

गोदावरी के एक किनारे पर यज्ञसेनी देवी का मंदिर है, तो दूसरे किनारे पर प्राचीन कार्तिक स्वामी मंदिर स्थित है। इसका जीर्णोद्धार सन् 1664 में हुआ था। कहा जाता है कि यह मंदिर आदिलशाही और निजामशाही की सीमा पर था। महाराष्ट्र में कार्तिक स्वामी के चार मंदिर हैं। इनमें अधिकांश में एकमुखी मूर्ति है; किंतु पुणतांबा के इस मंदिर में षष्ठमुखी मूर्ति है। वर्ष भर इस मंदिर में महिलाओं को प्रवेश की अनुमति नहीं होती; परंतु कार्तिक पूर्णिमा (त्रिपुरारी पूर्णिमा) के दिन महिलाएँ गर्भगृह में जाकर कार्तिक स्वामी के दर्शन कर सकती हैं। इस दिन दर्शन करने से स्वास्थ्य, धन-समृद्धि और महिलाओं को सौभाग्य की प्राप्ति होती है। ऐसी श्रद्धालुओं की आस्था है। कार्तिक पूर्णिमा पर यहाँ भव्य मेला आयोजित होता है। केवल इसी एक दिन महिलाओं को गर्भगृह में प्रवेश की अनुमति होने के कारण उनकी उपस्थिति विशेष रूप से उल्लेखनीय होती है।

धार्मिक महत्व के साथ-साथ पुणतांबा गाँव ऐतिहासिक किसान आंदोलन के लिए भी प्रसिद्ध है। वर्ष 2017 में हुए किसान आंदोलन की शुरुआत इसी गाँव से हुई थी। ग्रामसभा में प्रस्ताव पारित कर 1 जून 2017 से यहाँ के किसानों ने आंदोलन आरंभ किया। उन्होंने शहरों को भेजी जाने वाली दूध, सब्जी और अनाज की आपूर्ति रोक दी। साथ ही बोआई भी न करने का निर्णय लिया। पुणतांबा से शुरू हुआ यह आंदोलन धीरे-धीरे संपूर्ण महाराष्ट्र में फैल गया और अंततः राज्य सरकार को किसानों के लिए कर्जमाफी की घोषणा करनी पड़ी।

मुख्य विशेषताएँ

  • राहाता से 19 किमी, शिर्डी से 17 किमी दूरी
  • राहाता और शिर्डी से बस (एसटी) सेवा उपलब्ध
  • निजी वाहन सीधे मंदिर परिसर तक जा सकते हैं
  • क्षेत्र में विश्राम और जलपान की सुविधा उपलब्ध है
Back To Home