विठ्ठल-रुख्मिणी मंदिर

टाकळीभान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय कर्नाटकातील हरिदास संप्रदाय यांचे विठ्ठल हे प्रमुख दैवत. विष्णूचा अवतार आणि कृष्णाचे रूप असलेले विठ्ठल हे विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या अशा अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत. विठ्ठल वा पांडुरंग म्हटले की डोळ्यांसमोर येते ती कटेवर दोन हात ठेवलेली विटेवर उभी असलेली सावळी, सुंदर गोजिरी मूर्ती; परंतु अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळीभान येथील मंदिरातील विठ्ठल मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण असून या मूर्तीला चक्क मिशी चार हात आहेत. त्यातील दोन हात हे कटेवर, तर एका हातात शंख दुसऱ्या हातात चक्र आहेही मूर्ती सुमारे १६०० वर्षांपूर्वीची असून अशा प्रकारची महाराष्ट्रातील ही एकमेव मूर्ती असल्याचे सांगितले जाते.

नेवासा ते श्रीरामपूर रस्त्यावर असलेले टाकळीभान हे गाव प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते ते येथील पुरातन विठ्ठलरुख्मिणी मंदिरामुळे. यादवकालीन असलेले हे मंदिर येथील वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठलाच्या मूर्तीमुळे प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की यादवकाळात भान (भानू) नावाचा राजा पांडुरंगाचा भक्त होता. या गावाचे तेव्हाचे नाव टाकळी असावे. भान राजाच्या वास्तव्यानंतरटाकळीभानहे नाव पडले. त्यावेळी येथे विठ्ठलाची चतुर्भुज मूर्ती होती. या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग ओठावर मिशी होती. इतिहास संशोधकांच्या मते, यादवकाळाच्या आधीपासून ही मूर्ती येथे आहे. याबाबतची माहिती पंढरपुरात सापडलेल्या एका शिलालेखात आहे. महाद्वार रस्त्यावर विठ्ठल मंदिराकडून चंद्रभागेकडे जाताना डावीकडे असलेल्या पोलिस चौकीच्या इमारतीत एक लेखशिला आहे. त्यातील लेख देवगिरीच्या यादव घराण्यातील महादेवराव यादव यांच्या कारकिर्दीतील असून लेखाचा काळ ज्येष्ठ शु. ११, शके ११९२ (.. १२७०) असा आहे. पंढरपुरात भीमेच्या काठी, सितवाहक कुळातील काश्यपगोत्री केशवपुत्र भानूने आप्तोर्याम यज्ञ केल्याची नोंद या शिलालेखात आहे. हा ब्राह्मणकुलीन भानू म्हणजेच भान यादवांचा सामंत असल्याचे सांगितले जाते.

अनेक संशोधकांनी या मूर्तीचा निर्माण कालावधी १६०० वर्षांपूर्वीचा असल्याचे दाखले दिलेले आहेत. यादवकालीन भानू राजाची टाकळी ही राजधानी असल्याचेही संशोधकांच्या शोध निष्कर्षातून सिद्ध झाले आहे. पंढरपूरप्रमाणे येथील आषाढी उत्सव आषाढ प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान साजरा केला जातो. पंढरपूर येथील विठ्ठल मूर्ती ही मूर्ती एकाच काळात घडविलेल्या असाव्यात, असा अंदाजही व्यक्त करण्यात येतो. इतिहास संशोधक रा. चिं. ढेरे यांनीही येथील विठ्ठल मूर्तीवर संशोधन करून मूर्तीचे महात्म्य विषद केले आहे. महानुभव साहित्य स्थानपोथी लीळाचरित्र यामध्ये या मंदिराचा उल्लेख १३व्या शतकातील यादव काळाशी जोडलेला आहे.

गावाच्या मध्यभागी एका लहानशा टेकडीवजा उंचवट्यावर हे मंदिर स्थित आहे. १९७७ मध्ये केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. मंदिर हेमाडपंती रचनेचे असून संपूर्ण दगडी बांधकाम त्यावर कोरीव नक्षीकाम असे त्याचे रूप आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपाच्या भिंतींवरील देवड्यांमध्ये श्रीगणेश, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, पांडुरंग, संत गोरोबा काका, संत चोखामेळा, संत नरहरी सोनार, संत सावता माळी, संत कैकाडी महाराज, गंगागिरी महाराज, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, संत सेना महाराज, संत रोहिदास, महामुनी मातंगऋषी, संत जगनाडे महाराज या देवतांच्या थोर संतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत.

अंतराळात असलेल्या दोन कोरीव खांबांना लागून हनुमंत गरुडदेव यांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर विठ्ठल रुख्मिणी यांच्या मूर्ती आहेत. चतुर्भुज, ओठावर मिशी, मस्तकावर शिवपिंडी आहे छातीवर कौस्तुभमणी अशी विठ्ठल मूर्ती असून त्याशेजारी रुख्मिणी मातेची मूर्ती आहे.

चतुर्भुज मूर्ति लावण्य रुपड़े पाहतां आवडे जीवा बहू ॥१॥
वैंजयंती माळा कीरीट कुंडलें । भुषण मिरवलें मकराकार ॥२॥

कासे सोनसळा पितांबर पिवळा । कस्तुरीचा टिळा शोभे माथे ॥३॥
शंख चक्र हातीं पद्म तें शोभलें । भानुदासें वंदिलें चरणकमळ ॥४॥

संत भानुदास यांचा हा अभंग टाकळीभान येथील विठ्ठलाच्या मूर्तीला तंतोतंत लागू पडतो.

आषाढ शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा या दरम्यान येथील आषाढी उत्सव साजरा होतो. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक रोषणाई केली जाते. यावेळी दररोज ग्रामस्थांकडून अन्नदान केले जाते. दररोज सायंकाळी वाजता विठ्ठलरुख्मिणीची दिंडी काढली जाते. गावात प्रदक्षिणा करून दिंडी मंदिरात आल्यावर आरती होऊन महाप्रसाद दिला जातो. चतुर्दशीच्या दिवशी येथे भंडारा असतो. या दिवशी टाकळीभान पंचक्रोशीतील भजनी मंडळे टाळ, मृदंग वीणा यांसह दिंड्या घेऊन विठ्ठलाच्या दरबारात हजेरी लावतात. पौर्णिमेच्या दिवशी दहीहंडीच्या कार्यक्रमाने उत्सवाची सांगता होते.

उपयुक्त माहिती:

  • श्रीरामपूरपासून १४ किमी, तर अहिल्यानगरपासून ६० किमी अंतरावर
  • श्रीरामपूर, नेवासा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

टाकलीभान, तह. श्रीरामपुर, जि. अहिल्यानगर

महाराष्ट्र के वारकरी संप्रदाय तथा कर्नाटक के हरिदास संप्रदाय में विठ्ठल को प्रमुख आराध्य देवता माना जाता है। विष्णु के अवतार और कृष्ण के स्वरूप में पूज्य विठ्ठल भगवान ‘विठोबा’, ‘पांडुरंग’ और ‘पंढरीनाथ’ आदि नामों से विख्यात हैं। जब विठ्ठल या पांडुरंग का नाम लिया जाता है, तो एक छवि मन में उभरती है। वे कटि पर दोनों हाथ टिकाए, ईंट पर खड़े, साँवले, मनोहर और आकर्षक स्वरूप में दिखते हैं।

लेकिन अहिल्यानगर जिले के टाकलीभान गाँव में स्थित विठ्ठल की मूर्ति विलक्षण है। इस मूर्ति की चार भुजाएँ हैं और एक घनी मूँछ भी है। इनमें दो भुजाएँ कटि पर हैं। एक हाथ में शंख और दूसरे में चक्र है। यह मूर्ति लगभग 1600 वर्ष पुरानी मानी जाती है। ऐसी मूर्ति महाराष्ट्र में अन्यत्र कहीं नहीं पाई जाती है।

नेवासा से श्रीरामपुर मार्ग पर स्थित टाकलीभान गाँव अपने इस प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर के कारण ‘प्रति-पंढरपुर’ के नाम से प्रसिद्ध है। यह मंदिर यादवकालीन है। यह अपनी विशेष मूर्ति के लिए चर्चित है। जनश्रुति के अनुसार यादवकाल में भान नामक राजा यहाँ का शासक था। वह पांडुरंग का परम भक्त था। उस समय गाँव का नाम टाकली था। भान राजा के निवास के पश्चात इसका नाम टाकलीभान पड़ा।

तब यहाँ चतुर्भुज विठ्ठल की एक अनोखी मूर्ति थी। इसके मस्तक पर शिवलिंग और होंठों पर मूँछ थी। इतिहासकारों के अनुसार यह मूर्ति यादव काल से भी पूर्व की है। इस संदर्भ में एक अभिलेख पंढरपुर में भी मिला है। महाद्वार मार्ग पर स्थित पुलिस चौकी भवन में शिलालेख लगा है। इस लेख के अनुसार, यह देवगिरि के यादव शासक महादेवराव यादव के काल का है। इसकी तिथि ज्येष्ठ शुक्ल 11, शक 1192 (ई. स. 1270) बताई जाती है। उसमें उल्लेख है कि भीमा तट पर काश्यप गोत्रीय, केशवपुत्र भानु ने आप्तोर्याम यज्ञ किया था। ऐसा माना जाता है कि यह भानु ब्राह्मण कुल में जन्मा वही भान यादवकालीन सामंत था।

कई विद्वानों ने इस मूर्ति की निर्माण तिथि लगभग 1600 वर्ष पूर्व की मानी है। शोधकर्ताओं ने यह निष्कर्ष निकाला है कि टाकली उस समय भानु राजा की राजधानी रही होगी। पंढरपुर की तर्ज पर यहाँ आषाढ़ी उत्सव भी आषाढ़ शुद्ध प्रतिपदा से पूर्णिमा तक आयोजित होता है। यह भी माना जाता है कि पंढरपुर और टाकलीभान की विठ्ठल मूर्तियाँ एक ही कालखंड में निर्मित हुई होंगी। प्रसिद्ध इतिहासकार रा. चिं. ढेरे ने भी इस मूर्ति पर गहन अध्ययन कर इसका महात्म्य वर्णित किया है। महानुभाव संप्रदाय के स्थानपाठी व लीलाचरित्र जैसे ग्रंथों में भी इस मंदिर का उल्लेख 13वीं शताब्दी के यादवकाल से संबंधित रूप में मिलता है।

गाँव के मध्य स्थित एक छोटी-सी पहाड़ी पर यह मंदिर स्थित है। सन् 1977 में हुए जीर्णोद्धार के पश्चात मंदिर को वर्तमान स्वरूप प्राप्त हुआ। यह हेमाडपंती शैली में निर्मित पूर्ण पत्थर का मंदिर है। इसमें उत्कृष्ट शिल्पकारी की गई है। मंदिर की संरचना सभामंडप, अंतराल और गर्भगृह में विभाजित है। सभामंडप की दीवारों पर बने देवकोष्टकों में श्रीगणेश और विभिन्न संतों की मूर्तियाँ हैं। इनमें संत नामदेव, संत जनाबाई, पांडुरंग और संत गोरोबा काका सम्मिलित हैं। संत चोखामेला, संत नरहरी सोनार, संत सावता माली, संत कैकाडी महाराज और गंगागिरी महाराज की मूर्तियाँ भी यहाँ हैं। समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा, संत सेना महाराज, संत रोहिदास, महामुनि मातंगऋषि और संत जगनाडे महाराज की संगमरमर की मूर्तियाँ यहाँ प्रतिष्ठित हैं।

अंतराल के दो मनोहर नक्काशीदार स्तंभों के पास हनुमान एवं गरुड़ की मूर्तियाँ हैं। गर्भगृह के द्वार पर अद्वितीय शिल्पकारी की गई है। गर्भगृह के चतुर्थ तल पर विराजमान विठ्ठल और रुक्मिणी की मूर्तियाँ विशिष्ट रूप से आकर्षक हैं। चतुर्भुज विठ्ठल के होठों पर मूँछ और मस्तक पर शिवलिंग है। उनकी छाती पर कौस्तुभ मणि है। उनके पार्श्व में रुक्मिणी माता की मनोहर मूर्ति है।

यहाँ पर संत भानुदास का यह अभंग मूर्ति की भव्यता को अत्यंत मनोहर रूप में चित्रित करता है:

चतुर्भुज मूर्ति लावण्य रूपड़े । पाहतां आवडे जीवा बहू ॥
वैजयंती माला, कीरीट-कुंडलें । भूषण मिरवले मकराकार ॥
कासे सोनसळा, पीतांबर पिवळा । कस्तुरी का तिलक शोभे माथे ॥
शंख-चक्र हाती, पद्म तें शोभले । भानुदासे वंदिले चरणकमळ ॥
यह अभंग टाकलीभान के विठ्ठल स्वरूप का संपूर्ण वर्णन करता है।

आषाढ़ शुक्ल प्रतिपदा से पूर्णिमा तक चलने वाले उत्सव में मंदिर प्रांगण को सजाया जाता है। हर दिन गाँववासी अन्नदान करते हैं। सायंकाल 5 बजे प्रतिदिन विठ्ठल-रुक्मिणी की पालकी गाँव में प्रदक्षिणा लगाती है। इसके पश्चात मंदिर में आरती होती है और महाप्रसाद वितरित किया जाता है। चतुर्दशी के दिन भंडारा आयोजित होता है। इसमें टाकलीभान व आसपास के गाँवों की भजन मंडलियाँ ताल, मृदंग और वीणा सहित मंदिर में हाजिरी लगाती हैं। पूर्णिमा के दिन दही हांडी कार्यक्रम के साथ यह उत्सव संपन्न होता है।

मुख्य विशेषताएँ:

  • श्रीरामपुर से 14 किमी और अहिल्यानगर से 60 किमी की दूरी।
  • श्रीरामपुर और नेवासा से राज्य परिवहन बस सेवा उपलब्ध है।
  • निजी वाहन मंदिर तक जा सकते हैं।
  • परिसर में आवास और जलपान की सुविधा नहीं है।
Back To Home