श्री क्षेत्र भगवानगड

खरवंडी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांपैकी पाथर्डी तालुक्यातील भगवानगड हे एक प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते. बीड अहिल्यानगर जिल्ह्यांच्या सीमेवर खरवंडी गावाच्या बाजूला असलेल्या निसर्गसमृद्ध परिसरात हे स्थान आहे. वारकरी संप्रदायाचे संत भगवानबाबा यांनी निर्माण केलेले हे स्थान राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान मानले जाते.

पुराणातील नोंदींनुसार, या परिसरात सप्तर्षींनी अनेक वर्षें तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषी यांचे या भागात वास्तव्य होते. या ठिकाणी धौम्य ऋषींच्या पादुका होत्या. त्यामुळे हे स्थान पूर्वीपासूनधौम्यगडकिंवाधुम्यागडम्हणून प्रसिद्ध होते. येथील धौम्य ऋषींचे मंदिर काही हजार वर्षांपूर्वीपासूनच आहे. या शिवाय येथे रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंग ऋषी, पराशर ऋषी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) यांचेही वास्तव्य होते.

भगवानबाबा यांचा जन्म बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे २९ जुलै १८९६ या दिवशी झाला. वंजारी समाजाचे तुबाजीराव सानप कौतिकाबाई यांचे ते पाचवे अपत्य. आईवडिलांनी त्यांचे नाव आबाजी असे ठेवले होते. लहानपणापासून आबाजीचा ओढा देवधर्माकडे होता. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी प्रथम पायी पंढरपूरची वारी केली. पंढरपूरहून परतल्यानंतर आबाजी घरी जाता गावातील हनुमंताच्या मंदिरात थांबला. घरातील सर्वजण माळकरी होत असतील तरच मी घरी येईन, अशी अट त्यांनी घातली. मुलाच्या हट्टापायी सर्वांनी तुळशीमाळ घालण्याचे मांसाहार वर्ज्य करण्याचे वचन दिल्यावरच आबाजी घरी परतला. समाजसुधारण्याची मुहूर्तमेढ आपल्या घरापासूनच सुरू करून भक्ती ज्ञानमार्गाच्या कामाला त्यांनी सुरुवात केली

आबाजीच पूर्वज बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील नारायणगडाचे उपासक होते. त्यामुळे आबाजीचे तेथे सतत जाणे होत असे. पुढे सांप्रदायिक शिक्षणासाठी आबाजी नारायणगडावर गेलेतेथील महंत माणिकबाबांनी अनुग्रह दिल्यानंतर त्यांचे नाव बदलूनभगवानअसे ठेवले. त्यानंतर भगवानबाबा आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेत भरती झाले. तेथील बंकट स्वामींच्या विचारांच्या प्रभावाने भगवानबाबांनी सन्याशी जीवनाचा स्वीकार केला. पुढे भगवानबाबांनी नारायणगडाचे महंत म्हणून ३५ वर्षे काम पाहिले. त्या काळात १९१८ मध्ये नारायणगड ते पंढरपूर अशी पायी दिंडी त्यांनी सुरू केली. मराठवाड्यातून पंढरपूरकडे जाणारी ही पहिली दिंडी समजली जाते. त्यानंतर त्यांनी नारायणगडावरून पैठण येथे दिंडी सुरू केली. हे सर्व सुरू असतानाच काही समाजविघातक प्रवृत्तींनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला. हे सहन झाल्याने आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी भगवानबाबांनी स्वतःच्या हाताने स्वतःचे लिंग कापले. त्यानंतरही त्यांच्यावर निरनिराळे आरोप होत राहिल्याने अखेर भगवानबाबांनी नारायणगड सोडले धौम्यगडावर राहून ते तपसाधेत रममाण होऊ लागले.

भगवानबाबा यांनी त्यांच्या जीवनातील मोठा काळ धौम्यगडावर व्यतीत केला. कीर्तनाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यातील खेड्यापाड्यांत ते जात असत. या काळात त्यांचा शिष्यपरिवार खूप वाढला होता. त्यांनी धौम्यगडावरून पंढरपूर, आळंदी तसेच पैठणसाठी पालखी वारी सुरू केली. ते भक्तांसोबत दरवर्षी आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबा गडावर असताना येथून निघणाऱ्या पालखीसोबत हत्ती, घोडे असा लवाजमा असे.

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील शिक्षण परिषदेत सहभागी झालेल्या भगवान बाबांनी तेव्हावाचाल तर वाचालहा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र ऐकला आणि त्यांनी आपल्या परिसरातील नागरिकांनाशेत विका, पण पोरं शिकवाअसे सांगितले. त्यासाठी त्यांनी खरवंडी गावात पहिली शाळा सुरू केली. मे १९५८ रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी धौम्यगडाला भेट देऊन भगवानबाबांचे कार्य जाणून घेतले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’ तेव्हापासून धौम्यगडाचे नावभगवानगडअसे पडले. गावोगावी, खेड्यापाड्यात धर्माचे ज्ञानार्जनाचे काम करता करता १९६५ च्या सुरुवातीला भगवानबाबांची प्रकृती ढासळली. उपचारासाठी त्यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्यांना यश आले नाही. अखेर जानेवारी १९६५ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. बाबांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव भगवानगडावर आणून तेथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री क्षेत्र भगवानगड हे मराठवाड्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. खरवंडी गावाजवळील टेकडीच्या माथ्यावर असलेल्या या गडाला तटबंदी असून त्यात ६० फूट उंचीचे महाद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर भगवानगडावरील प्रशस्त परिसरात प्रवेश होतो. या गडावर विठ्ठल, भगवानबाबा, धौम्य ऋषी आणि हनुमंत अशा चार मंदिरांचा समूह आहे. यामध्ये विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवताली धौम्य ऋषी आणि मारुती ही मंदिरे आहेत.

विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख असून त्यावर सुबक कोरीव काम आहे. मंदिराच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर सभामंडपात प्रवेश होतो. येथील शिल्पांकित स्तंभ पाहिल्यावर एखाद्या किल्ल्यात आल्याचा भास होतो. गर्भगृहात वैशिष्ट्यपूर्ण विठ्ठल मूर्ती आहे. विठ्ठलमूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर तेथील गर्भगृहाच्या बाजूनेभगवानबाबा यांच्या समाधी स्थानाकडे जाण्यासाठी खालील बाजूस पायऱ्या आहेत. तळमजल्यावर संत भगवानबाबा भीमसिंह महाराज यांच्या काळ्या संगमरवरी समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणा मार्ग अरुंद आहे. या स्थानाच्या विशिष्ट रचनेमुळे सूर्योदयाच्यावेळी सूर्याची किरणे थेट गाभाऱ्यातील समाधीवर पडतात.

विठ्ठल मंदिराच्या शेजारी धौम्य ऋषींचे मंदिर आहे. त्यात पांडव, द्रौपदी धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांचे मंदिर आहे. विठ्ठल मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर हनुमानाचे मंदिर आहे. याशिवाय विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस भगवानबाबांनी वास्तव्य केलेले ठिकाण त्यांनी आपल्या वास्तव्याच्या काळात वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय आहे

गडावरील मुख्य उत्सव हा विजयादशमीचा असतो. भगवानबाबांनी सुरू केलेल्या या उत्सवाला ७५ वर्षांची परंपरा आहे. यावेळी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गडावर गुरुपदेश घेण्यासाठी येतात. याशिवाय भगवानबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त (१८ जानेवारी) भगवानगडावर भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या दिवसांत सुमारे ,००,००० (दोन लाख) भाविक गडावर येऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतात.

उपयुक्त माहिती:

  • पाथर्डीपासून ३० किमी, तर अहिल्यानगरपासून ८१ किमी अंतरावर
  • मुंबई, पुणे, अहिल्यानगरहून एसटीची थेट सेवा
  • शेवगाव, गेवराई, पैठण, पाथर्डी येथून एसटी खासगी वाहन सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे

श्री क्षेत्र भगवानगढ़

खरवंडी, तह. पाथर्डी, जि. अहिल्यानगर

राज्य के प्रमुख तीर्थ स्थलों में पाथर्डी तहसील में भगवानगढ़ एक प्रसिद्ध तीर्थ स्थल के रूप में जाना जाता है। यह स्थान बीड और अहिल्यानगर जिलों की सीमा पर खरवंडी गाँव के पास एक प्राकृतिक क्षेत्र में स्थित है। वारकरी संप्रदाय के संत भगवान बाबा द्वारा निर्मित यह स्थान राज्य में गन्ना श्रमिकों के लिए पूजा स्थल माना जाता है।

पुराणों के अनुसार, सप्तर्षियों ने कई सालों तक इस क्षेत्र में तपस्या की थी। पांडवों के पुरोहित ऋषि धौम्य इसी क्षेत्र में रहते थे। इस स्थान पर ऋषि धौम्य की पादुकाएँ मिली थीं। इसलिए यह स्थान प्राचीन काल से ‘धौम्यगढ़’ या ‘धुम्यगढ़’ के नाम से प्रसिद्ध था। यहाँ ऋषि धौम्य का मंदिर लगभग एक सहस्र साल पहले से है। इसके अलावा रंग ऋषि, भारद्वाज ऋषि, श्रृंग ऋषि, पराशर ऋषि और राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) भी यहीं रहते थे।

भगवान बाबा का जन्म 29 जुलाई 1896 को बीड जिले के सावरगाँव घाट में हुआ था। वे वंजारी समुदाय के तुबाजीराव सानप और कौटिकाबाई की पाँचवीं संतान थे। उनके माता-पिता ने उनका नाम आबाजी रखा था। आबाजी बचपन से ही भगवान की ओर आकर्षित थे। छह साल की उम्र में उन्होंने पहली बार पैदल पंढरपुर की तीर्थ यात्रा की। पंढरपुर से लौटने के बाद आबाजी घर जाने के बजाय गाँव के हनुमान मंदिर में रुके। उन्होंने शर्त रखी कि वे तभी घर आएँगे, जब परिवार में सभी लोग माला पहनकर मांसाहार छोड़ देंगे। बेटे के आग्रह पर सभी ने तुलसी की माला पहनने और मांसाहार से परहेज करने का वादा किया, तभी आबाजी घर लौटे। उन्होंने भक्ति और ज्ञान के मार्ग का कार्य अपने घर से ही प्रारंभ किया।

आबाजी के पूर्वज बीड जिले के शिरूर तहसील के नारायणगढ़ के उपासक थे। इसलिए आबाजी वहाँ नियमित रूप से आते थे। बाद में आबाजी सांप्रदायिक शिक्षा के लिए नारायणगढ़ चले गए। वहाँ महंत माणिक बाबा से अनुग्रह प्राप्त करने के बाद उनका नाम बदलकर ‘भगवान’ रखा गया। उसके बाद भगवान बाबा आलंदी में वारकरी शिक्षण संस्थान में सम्मिलित हो गए। वहाँ बंकट स्वामी के विचारों से प्रभावित होकर भगवान बाबा ने साधु जीवन स्वीकार कर लिया। बाद में भगवान बाबा ने 35 सालों तक नारायणगढ़ के महंत के रूप में काम किया। उस दौरान 1918 में उन्होंने नारायणगढ़ से पंढरपुर तक पैदल यात्रा निकाली। इसे मराठवाड़ा से पंढरपुर तक की पहली पैदल यात्रा माना जाता है। उसके बाद उन्होंने नारायणगढ़ से पैठण तक पैदल यात्रा निकाली। जब यह सब चल रहा था, तब कुछ असामाजिक तत्वों ने उनके चरित्र पर संदेह किया। आरोपों को मिथ्या सिद्ध करने के लिए भगवान बाबा ने अपने हाथों से अपना लिंग विच्छेदन कर दिया। इसके बाद भी आरोप होने के पश्चात भगवान बाबा ने अंततः नारायणगढ़ छोड़ दिया और धौम्य गढ़ में रहकर तपस्या करने लगे।

भगवान बाबा ने अपने जीवन का एक बड़ा हिस्सा धौम्य गढ़ में बिताया। वे पश्चिमी महाराष्ट्र और मराठवाड़ा के गाँवों में कीर्तन के लिए जाते थे। इस दौरान उनके शिष्यों की संख्या में बहुत वृद्धि हुई थी। उन्होंने धौम्य गढ़ से पंढरपुर, आलंदी और पैठण तक पालकी यात्राएँ प्रारंभ कीं। वे हर साल आषाढ़ी वारी के अवसर पर अपने श्रद्धालुओं के साथ पंढरपुर जाते थे। जब भगवान बाबा दुर्ग में थे, तब यहाँ से निकलने वाली पालकियों के साथ हाथी और घोड़े भी होते थे।

नासिक जिले के मनमाड़ में शिक्षा सम्मेलन के लिए भगवान बाबा गए थे, तब डॉ. बाबासाहेब आंबेडकर द्वारा ‘पढ़ोगे तो बचोगे’, यह मूल मंत्र सुनकर वह प्रभावित हुए और उन्होंने अपने क्षेत्र के नागरिकों से कहा, ‘खेत बेच दो, लेकिन बच्चों को पढ़ाओ’। साथ ही उन्होंने खरवंडी गाँव में पहला विद्यालय प्रारंभ किया। 1 मई, 1958 को मुंबई प्रांत के तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ने धौम्य गढ़ का दौरा किया और भगवान बाबा के कार्यों के बारे में जाना। इस अवसर पर मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ने कहा, ‘धर्म की रक्षा के लिए भगवान बाबा ने श्रद्धालुओं को संगठित कर शास्त्रों के आधार पर भक्ति का दुर्ग बनाने का काम किया है। आज से ‘धौम्यगढ़’ को ‘भगवानगढ़’ के नाम से जाना जाना चाहिए। तब से ‘धौम्यगढ़’ का नाम ‘भगवानगढ़’ पड़ गया।

गाँव-ढाणियों में धार्मिक और ज्ञान-साधना का काम करते हुए भगवान बाबा का स्वास्थ्य 1965 के प्रारंभ में खराब हो गया। उन्हें उपचार के लिए पुणे के रूबी अस्पताल में भर्ती कराया गया। डॉक्टरों के बेहतरीन प्रयासों के पश्चात वे असफल रहे। आखिरकार 1 जनवरी 1965 को 69 साल की उम्र में वे अपना शरीर त्यागकर ब्रह्मलीन हुए। बाबा की इच्छानुसार उनके पार्थिव शरीर को भगवानगढ़ लाया गया और वहीं उनका अंतिम संस्कार किया गया।

श्री क्षेत्र भगवानगढ़ मराठवाड़ा सहित राज्य के लाखों श्रद्धालुओं के लिए पूजा स्थल है। खरवंडी गाँव के पास एक पहाड़ की चोटी पर स्थित इस दुर्ग में एक प्राचीर और 60 पद ऊँचा मुख्य द्वार है। इस प्रवेश द्वार से प्रवेश करने के बाद भगवानगढ़ के विशाल क्षेत्र में प्रवेश होता है। इस दुर्ग पर विठ्ठल, भगवान बाबा, धौम्य ऋषि और हनुमान—ऐसे चार मंदिरों का समूह है। इसमें विठ्ठल का मुख्य मंदिर बीच में है।

विठ्ठल मंदिर पश्चिम की ओर है और इस पर मनोहर नक्काशी की गई है। मंदिर के मुख्य भवन के प्रवेश द्वार से प्रवेश करने के बाद सभामंडप में प्रवेश होता है। यहाँ नक्काशीदार स्तंभों को देखकर ऐसा लगता है, जैसे आप किसी दुर्ग में प्रवेश कर गए हों। गर्भगृह में विठ्ठल की अनूठी मूर्ति है। विठ्ठल मूर्ति के दर्शन करने के बाद गर्भगृह के निचले हिस्से में भगवान बाबा के समाधि स्थल पर जाने के लिए सीढ़ियाँ हैं। भूतल पर संत भगवान बाबा और भीमसिंह महाराज की काले संगमरमर की समाधियाँ हैं। समाधियों का परिक्रमा पथ संकरा है। इस स्थान की अनूठी बनावट के कारण सूर्योदय के समय सूर्य की किरणें सीधे गुफा में समाधि पर पड़ती हैं।

विठ्ठल मंदिर के समीप ही ऋषि धौम्य का मंदिर है। इसमें 5 पांडवों, द्रौपदी और धौम्य ऋषि की मूर्तियाँ हैं। धौम्य ऋषि के मंदिर के बगल में जनार्दन स्वामी का मंदिर है। विठ्ठल मंदिर के प्रवेश द्वार के सम्मुख हनुमान का मंदिर है। इसके अलावा विठ्ठल मंदिर के पीछे भगवान बाबा के रहने का स्थान और उनके द्वारा अपने प्रवास के दौरान उपयोग की जाने वाली वस्तुओं का संग्रहालय है। दुर्ग में मुख्य उत्सव विजयादशमी को होता है। भगवान बाबा द्वारा प्रारंभ किए गए इस उत्सव की परंपरा 75 सालों से है। इस दौरान पूरे राज्य से श्रद्धालु गुरुपदेश लेने के लिए दुर्ग में आते हैं। इसके अलावा भगवान बाबा की पुण्यतिथि (18 जनवरी) के अवसर पर भगवानगढ़ में भव्य हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। इन 8 दिनों में लगभग 2,00,000 (दो लाख) श्रद्धालु दुर्ग में आते हैं और भगवान बाबा की समाधि के दर्शन करते हैं।

प्रमुख विशेषताएँ

  • पाथर्डी से 30 कि.मी., अहिल्यानगर से 81 कि.मी.
  • मुंबई, पुणे, अहिल्यानगर से सीधी राज्य परिवहन बस सेवा
  • शेवगाँव, गेवराई, पैठण, पाथर्डी से बस और निजी वाहन की सुविधा
  • निजी वाहन मंदिर पार्किंग स्थल तक जा सकते हैं
  • परिसर में आवास और जलपान की सुविधा उपलब्ध है
Back To Home