
मुस्लिम संताचे स्थान एखाद्या शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणे हे तसे दुर्मिळ आहे; परंतु अहिल्यानगरमधील श्रीगोंदा तालुक्याचे ग्रामदैवत म्हणून संत शेख महमंद महाराज मंदिर प्रसिद्ध असून वारकरी संप्रदायाचे ते श्रद्धास्थान आहे. हिंदू– मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून श्रीगोंदा येथील या मंदिराची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी शेख महंमद महाराज यांना श्रीगोंद्यात आणून त्यांच्या कार्यासाठी काही जमीन इनाम स्वरूपात दिली होती, असा इतिहासात उल्लेख आहे.
वारकरी संप्रदायातील थोर संत व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे समकालीन म्हणून शेख महंमद महाराज ओळखले जातात. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार वारकरी, दत्त, नाथ व सुफी या ४ संप्रदायांचे महाराजांवर संस्कार घडले होते. कादरी संप्रदायातील भारतात आलेले पहिले कादरी सुफी
म्हणून महंमद गौस मानले जातात. त्यापुढे राज महंमद–कादरी चाँदसाहेब (चंद्रभट ऊर्फ चाँद बोधले) कादरी महंमद साहेब म्हणजेच शेख महंमद अशी गुरू परंपरा आहे. चाँद बोधले यांचे जनार्दन स्वामी व शेख महंमद हे २ शिष्य. त्यामुळे हे दोघे संत गुरुबंधू म्हणून ओळखले जातात. जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज अशी ही गुरू परंपरा प्रख्यात आहे.
तो काळ इस्लामी राजवटीचा होता. दिल्लीची मुघलशाही, विजापूरची आदिलशाही, अहिल्यानगरची निजामशाही, पोर्तुगीज याबरोबरच अनेक लहान–लहान राज्ये अस्तित्वात होती. आपापले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होणाऱ्या सततच्या लढायांमध्ये जनता भरडली जात होती. समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, धर्मभेद विकोपाला गेला होता. देशात बहुतांश ठिकाणी मुस्लिमांची सत्ता होती, तर बहुसंख्य जनता मात्र हिंदू होती. दोन्ही धर्मांमध्ये पूजा–अर्चा, राहणीमान यात फरक होता. हिंदू मूर्तिपूजक, तर मुस्लिम अल्लास मानणारे. दोन्ही धर्मांमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ वाद फोफावत चालला होता. अशावेळी एका समाजसुधारकाची, समानतेची वागणूक देणाऱ्या
महात्म्याची आवश्यकता होती, ती संत शेख महंमद महाराजांच्या रूपाने पूर्ण झाली, असे म्हटले जाते.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा या गावी राजमहंमद व फुलाई या दाम्पत्याच्या पोटी शेख महंमदांचा जन्म झाला. राजमहंमद धारूरच्या किल्ल्यावर हवालदार म्हणून बादशहाकडे चाकरीस होते. शेख महंमदांच्या घरात गुरू परंपरा व धार्मिक वातावरण असल्याने लहानपणापासूनच त्यांना चांगले शिक्षण मिळाले. शेख महंमदांनी सामाजिक, राजकीय परिस्थिती जवळून पाहिली होती. समाजातील विषमता, जाती धर्मातील द्वेष, चातुर्वण्य व्यवस्था व परिस्थितीला बळी पडलेला समाज त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला व वैचारिक क्रांती करण्याचे बिजारोपण बालवयातच झाले. यानंतर श्रीगोंदा येथे आल्यानंतर वारकरी संप्रदायाची समतावादी, सर्वांना मिळून मिसळून घेणारी, सरळमार्गी भक्ती शेख महंमदांना भावली व ते त्यात रमले. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदा भेद भ्रम अमंगळ॥’ किंवा ‘यारे यारे लहान थोर। याती भलती नारी नर। करावा विचार। नलगे चिंता कवणाशी॥’ या व
अशा त्यांच्या अभंगांच्या माध्यमातून वारकरी परंपरेतील विचार समाजापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केले.
श्रीगोंदा शहराच्या मध्यवर्ती भागात संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर आहे. मंदिर परिसाला तटबंदी असून हे मंदिर दगडी बांधणीचे, चौकोनी रचनेचे आहे. मंदिराच्या वरील बाजूने चार मिनार आहेत. निजामशाही कालखंडातील मठाच्या शैलीप्रमाणे हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशमूर्ती व समोर शिवलिंग आहे. पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिराला जशी नामदेव पायरी आहे तशाच स्वरूपात शेख महाराजांचा भक्त मोदोबा तेली यांची येथे पायरी आहे. त्यांनी या पायरीवर अखेरचा श्वास घेतला, त्यांची आठवण म्हणून ही पायरी त्यांच्या नावाने ओळखली जाते. जमिनीपासून काहीसे उंचावर असलेल्या या मंदिरात संत शेख महंमद महाराज आणि त्यांची पत्नी फातिमाबी यांच्या समाध्या आहेत.
या समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला भुयार असून त्याच्यावर मोठी दगडी फरशी आहे. असे सांगितले जाते की या भुयारात जाऊन बाबा व त्यांच्या पत्नी फातिमाबी समाधीस्त झाले. फाल्गुन शुद्ध नवमीला संत शेख महाराज महंमद यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथे मोठा यात्रोत्सव असतो. यात्रेपूर्वी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात हिंदूंसोबत मुस्लिमांचाही सहभाग असतो.
यात्रेच्या दिवशी महाराजांच्या समाधीला स्नान घालून त्यावर चंदनाचा लेप लावण्यात येतो. त्यानंतर संध्याकाळी छबिना मिरवणूक निघते. पालखीत बाबांच्या पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात येते. दुसऱ्या दिवशी कुस्त्यांच्या स्पर्धांनी यात्रोत्सवाची सांगता होते. या यात्रोत्सवासाठी हजारो भाविकांची उपस्थिती असते.
महाराजांच्या समाधीला वर्षातून पाच वेळा म्हणजे गुढीपाडवा, आषाढी एकादशी, विजया दशमी (दसरा), महाशिवरात्र व फाल्गुन शुद्ध नवमी या महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी चंदनाचा लेप लावला जातो. चंदनलेप लावताना समाधीच्या एका बाजूला हिंदू व एका बाजूला मुस्लिम समाजातील भाविक असतात. दोन्ही समाजातील भाविक मिळून हा लेप समाधीला लावतात. श्रीगोंद्यातील अनेक भाविक आपल्या दिवसाची सुरुवात महाराजांच्या दर्शनाने करतात. येथे कोणतीही मनोकामना व्यक्त केली तर महाराज ती पूर्ण करतात, अशी येथे येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे. दर गुरुवारी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. सकाळी ९ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत मंदिरात जाऊन शेख महंमद महाराजांचे दर्शन घेता येते.

किसी मुस्लिम संत को किसी शहर के ग्राम देवता के रूप में मान्यता मिलना दुर्लभ है। संत शेख मोहम्मद महाराज मंदिर अहिल्यानगर के श्रीगोंदा तहसील के ग्राम देवता के रूप में प्रसिद्ध है और वारकरी संप्रदाय का एक श्रद्धास्थल है। श्रीगोंदा स्थित यह मंदिर हिंदू-मुस्लिम एकता के प्रतीक के रूप में जाना जाता है। इतिहास में उल्लेख है कि छत्रपति शिवाजी महाराज के दादा श्रीमंत मालोजीराजे भोसले शेख मोहम्मद महाराज को श्रीगोंदा लाए थे। उनके सेवाकार्यों के लिए उन्हें कुछ भूमि दान में दी थी।
शेख मोहम्मद महाराज को वारकरी संप्रदाय के महान संत तुकाराम महाराज के समकालीन माना जाता है। इतिहासकारों के अनुसार, महाराज को वारकरी, दत्त, नाथ और सूफी नामक चार संप्रदायों के संस्कार प्राप्त थे। भारत आने वाले कादरी संप्रदाय के पहले कादरी सूफी मोहम्मद गौस को माना जाता है। इसके बाद राज मोहम्मद-कादरी चाँद साहब (चंद्रभट्ट उर्फ़ चाँद बोधले) कादरी मोहम्मद साहब अर्थात शेख मोहम्मद, यह गुरु परंपरा है। जनार्दन स्वामी और शेख मोहम्मद, चाँद बोधले के दो शिष्य थे। इसलिए ये दोनों संत गुरुबंधु के नाम से जाने जाते हैं।
जनार्दन स्वामी के शिष्य एकनाथ महाराज हैं। इस प्रकार यह प्रसिद्ध गुरुपरंपरा है।
वह समय इस्लामी शासन का था। दिल्ली में मुगल साम्राज्य, बीजापुर में आदिलशाही, अहमदनगर में निज़ामशाही, पुर्तगाली आदि कई छोटे-बड़े राज्य थे। लोग अपना प्रभुत्व सिद्ध करने के लिए निरंतर युद्धों में उलझे रहते थे। समाज में अज्ञानता, अंधविश्वास, कर्मकांड, जातिवाद और धार्मिक भेदभाव व्याप्त थे। देश के अधिकांश भागों में मुसलमानों का शासन था, जबकि बहुसंख्यक लोग हिंदू थे। दोनों धर्मों के बीच पूजा-पाठ और जीवन स्तर में अंतर था। हिंदू मूर्तिपूजा करते थे, जबकि मुसलमान अल्लाह में विश्वास करते थे। दोनों धर्मों के बीच श्रेष्ठता का वाद-विवाद चल रहा था। उस समय एक समाज सुधारक और एक ऐसे महापुरुष की आवश्यकता थी, जो सभी के साथ समान व्यवहार करे। कहा जाता है कि संत शेख मोहम्मद महाराज के रूप में यह आवश्यकता पूरी हुई।
शेख मोहम्मद का जन्म बीड जिले के आष्टी तहसील के वाहिरा गाँव में राज मोहम्मद और फुलाई नामक दम्पति के यहाँ हुआ था। राज मोहम्मद धारुर के किले में सिपाही थे और बादशाह की सेवा करते थे।
चूँकि शेख मोहम्मद के परिवार में गुरु परंपरा और धार्मिक वातावरण था, इसलिए उन्हें बचपन से ही अच्छी शिक्षा मिली। शेख मोहम्मद ने सामाजिक और राजनीतिक स्थिति को निकट से देखा था। उन्होंने समाज में व्याप्त असमानता, जातियों और पंथों के बीच विद्वेष को खुली आँखों से देखा। युवावस्था में ही उनके मन में एक वैचारिक क्रांति के बीज पड़ गए। इसके बाद श्रीगोंदा आकर शेख मोहम्मद वारकरी संप्रदाय की समतावादी, सर्वसमावेशी और सरल भक्ति से प्रभावित हुए और वे उसमें रम गए। भेदभाव का उन्मूलन करने वाले वारकरी परंपरा के विचारों को समाज तक पहुँचाने के लिए उन्होंने अपनी अंतिम सांस तक काम किया।
श्रीगोंदा शहर के मध्य भाग में संत शेख मोहम्मद महाराज का एक मंदिर है। मंदिर एक दीवार से घिरा हुआ है। यह मंदिर पाषाण से बना है और इसकी संरचना चौकोर है। मंदिर के शीर्ष पर चार मीनारें हैं। यह मंदिर निज़ामशाही काल के मठ की शैली में है। मंदिर के सम्मुख शिवलिंग है और प्रवेश द्वार पर गणेश की मूर्ति है। पंढरपुर के पांडुरंग मंदिर में नामदेव सीढ़ी की तरह, यहाँ शेख महाराज के भक्त मोदोबा तेली की एक सीढ़ी है। उन्होंने इसी सीढ़ी पर अंतिम सांस ली थी। उनकी स्मृति में यह सीढ़ी उनके नाम से जानी जाती है।
ज़मीन से थोड़ा ऊपर स्थित इस मंदिर में संत शेख मोहम्मद महाराज और उनकी पत्नी फ़ातिमाबी की समाधि है।
इस समाधि मंदिर के पीछे एक तहखाना है, जिस पर एक बड़ा पत्थर का फर्श बना हुआ है। कहा जाता है कि बाबा और उनकी पत्नी फ़ातिमाबी इसी तहखाने में गए थे और समाधि ली थी। फाल्गुन शुद्धि की नवमी तिथि को संत शेख मोहम्मद की पुण्यतिथि के अवसर पर यहाँ एक विशाल मेला आयोजित किया जाता है। मेले से पहले एक पूर्ण हरिनाम सप्ताह का आयोजन किया जाता है। इस दो दिवसीय मेले में हिंदुओं के साथ-साथ मुसलमान भी भाग लेते हैं। मेले के दिन महाराज की समाधि को स्नान कराया जाता है और उस पर चंदन का लेप लगाया जाता है। उसके बाद शाम को शोभायात्रा निकाली जाती है। बाबा की पादुकाओं को पालकी में स्थापित किया जाता है। अगले दिन, कुश्ती प्रतियोगिताओं के साथ मेले का समापन होता है। इस मेले में हजारों श्रद्धालु शामिल होते हैं।
महाराज की समाधि पर हर साल पाँच बार चंदन का लेप लगाया जाता है: गुड़ी पड़वा, आषाढ़ी एकादशी, विजयादशमी (दशहरा), महाशिवरात्रि और फाल्गुन शुद्ध नवमी (महाराज की पुण्यतिथि) पर। चंदन का लेप लगाते समय, हिंदू और मुस्लिम समुदाय के श्रद्धालु समाधि के एक ओर खड़े होते हैं। दोनों समुदायों के श्रद्धालु मिलकर समाधि पर यह लेप लगाते हैं। श्रीगोंदा के कई श्रद्धालु अपने दिन की शुरुआत महाराज के दर्शन से करते हैं। यहाँ आने वाले श्रद्धालुओं की मान्यता है कि यदि यहाँ कोई मनोकामना व्यक्त की जाए, तो महाराज उसे अवश्य पूरा करते हैं। हर गुरुवार को बड़ी संख्या में श्रद्धालु यहाँ दर्शन के लिए आते हैं। आप सुबह 9 बजे से रात 9 बजे तक मंदिर में आकर शेख मोहम्मद महाराज के दर्शन कर सकते हैं।