अहिल्यानगर जिल्ह्यात शिर्डीपासून जवळ असलेल्या वाकडी या गावाला येथील खंडोबाच्या मंदिरामुळे ‘खंडोबाची वाकडी’ म्हणून ओळखले जाते. जेजुरीहून खंडोबा बाणाईला आणण्यासाठी चंदनपुरी येथे जात असताना त्यांनी येथे मुक्काम केला म्हणून हे स्थान ‘प्रति जेजुरी’ म्हणूनही परिचित आहे. वांगीसट म्हणजेच चंपाषष्ठी (मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी) उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या दिवशी खंडोबा देवस्थानातून काढण्यात येणारी घोड्यांची मिरवणूक हे येथील प्रमुख आकर्षण असून यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.
खंडोबा मंदिराविषयी आख्यायिका अशी की महादेवांचे अवतार असलेल्या खंडोबांनी मणी व मल्ल या राक्षसांचा वध करून वास्तव्यासाठी जेजुरी हे ठाणे निवडले. काही दिवसांनी जेजुरी येथून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून बाणाई देवीला आणण्यासाठी जात असताना त्यांनी वाकडी येथे मुक्काम केला.
त्यांच्यासोबत त्यांचे हेगडी प्रधान व घोडे होते. येथे आल्यानंतर त्यांनी हेगडी प्रधानांना घोड्यांसह जेजुरीला परत जाण्यास सांगितले व खंडोबा स्वतः चंदनपुरीसाठी निघाले; परंतु आपले स्वामी एकटेच जात आहेत हे पाहून त्या स्वामिनिष्ठ घोड्यांना वाईट वाटत होते. त्यामुळे ते घोडे सतत मान वाकडी करून मागे पाहत होते. त्यामुळे या गावाचे नाव वाकडी असे पडले. वाकडी येथील हे देवस्थान जागृत असून जेजुरी येथे केलेल्या नवसाची या मंदिरात पूर्ती करता येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
शिर्डी येथून वाकडीकडे जाणाऱ्या मार्गावर खंडोबा मंदिर स्थित आहे. मंदिराचा परिसर प्रशस्त असून या संपूर्ण परिसरात फरसबंदी करण्यात आली आहे. या परिसरात अनेक पूजासाहित्याची दुकाने आहेत. मंदिराच्या प्रांगणात दीपमाळ असून त्याच्या बाजूला एक अखंड पेटती धुनी आहे. मुख्य मंदिराच्या उजव्या बाजूला एका मोठ्या चौथऱ्यावर खंडोबांचे वाहन असलेल्या घोड्याचे वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आहे. सभामंडप व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. प्रशस्त सभामंडपात नंदी स्थानापन्न असून गाभाऱ्यात खंडोबा, म्हाळसादेवी व बाणाई देवी यांचा त्रिपिंडी स्वरूपातील तांदळा आहे. या तांदळ्याला खंडोबा व म्हाळसाई यांचे चांदीचे मुखवटे लावून त्यांना वस्त्रालंकार चढविले जातात.
तांदळ्याच्या समोर घोड्यावर स्वार खंडोबा व म्हाळसाई दैत्य मणी व मल्ल यांचा वध करीत आहेत, अशा मूर्ती आहेत. या मूर्ती नंतर बसविल्याचे सांगण्यात येते. या मंदिर परिसरात बाणाई देवी व हेगडी प्रधान यांचे मंदिर आहे. मंदिराला लागूनच आणखी नवीन सभामंडप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
भाऊबीज, मार्गशीर्ष षष्ठी (चंपाषष्ठी) आणि चैत्र पौर्णिमेला येथे यात्रा भरतात. भाऊबीजेच्या दिवशी जेजुरीहून आणलेल्या अखंड ज्योतीने येथील धुनी व दीपमाळेवरील दिवे प्रज्वलित केले जातात व त्यानंतर यात्रोत्सवाला प्रारंभ होतो. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी खंडोबांचा नवरात्रोत्सव सुरू होतो, तो मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीपर्यंत म्हणजेच चंपाषष्ठीपर्यंत सुरू असतो. मणी व मल्ल या २ दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटातून मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव साजरा करतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’चा जयघोष करत हजारो भाविक वाकडी येथे दाखल होतात. भंडाऱ्याची अखंड उधळण आणि तळी भरणे असे कार्यक्रम दिवसभर सुरू असतात. यावेळी भाविकांकडून खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखविला जातो. या यात्रोत्सवात घोड्यांची मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात. चैत्र पौर्णिमेला म्हणजेच हनुमान जयंतीला येथे भरणाऱ्या यात्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक निघते.
दररोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी या मंदिरात खंडोबा देवाची आरती होते. सकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन खंडोबाचे दर्शन घेता येते.
अहिल्यानगर जिले में शिर्डी के समीप स्थित वाकडी गाँव यहाँ के खंडोबा मंदिर के कारण “खंडोबाची वाकडी” के नाम से प्रसिद्ध है। ऐसा कहा जाता है कि जेजुरी से बाणाई को लाने हेतु चंदनपुरी जाते समय खंडोबा ने यहाँ विश्राम किया था। इस कारण यह स्थान “प्रति जेजुरी” के रूप में भी जाना जाता है। यहाँ चंपाषष्ठी का उत्सव बहुत धूमधाम से मनाया जाता है। इस दिन खंडोबा देवस्थान से निकाली जाने वाली घोड़ों की शोभायात्रा मुख्य आकर्षण होती है। इसमें हजारों श्रद्धालु उपस्थित रहते हैं।
खंडोबा मंदिर से जुड़ी एक किंवदंती के अनुसार महादेव के अवतार खंडोबा ने मणि और मल्ल नामक राक्षसों का वध किया। उन्होंने जेजुरी को अपने वासस्थान के रूप में चुना। कुछ समय पश्चात जब खंडोबा नासिक जिले की मालेगाँव तहसील में स्थित चंदनपुरी से बाणाई देवी को लाने जा रहे थे, तब उन्होंने वाकडी में विश्राम लिया।
उनके साथ उनके हेगडी प्रधान और घोड़े भी थे। यहाँ पहुँचने के बाद उन्होंने हेगडी प्रधान को घोड़ों सहित जेजुरी लौटने को कहा। वे स्वयं चंदनपुरी के लिए निकल पड़े। परंतु स्वामी अकेले जा रहे हैं, यह देखकर वफादार घोड़े दुखी हुए। वे निरंतर गर्दन टेढ़ी कर पीछे देखते हुए लौटने लगे। इसी से इस गाँव का नाम “वाकडी” पड़ा।
वाकडी स्थित यह देवस्थान जागृत माना जाता है। ऐसा विश्वास है कि जेजुरी में किए गए व्रत और मन्नत की पूर्णता इस मंदिर में की जा सकती है। शिर्डी से वाकडी जाने वाले मार्ग पर खंडोबा मंदिर स्थित है। मंदिर परिसर विशाल है। पूरे क्षेत्र में पत्थर का फर्श है। परिसर में कई पूजा सामग्री की दुकानें हैं। मंदिर के प्रांगण में एक दीपमाला है। उसके पास अखंड प्रज्वलित धूनी है। मुख्य मंदिर के दाईं ओर एक बड़े चबूतरे पर खंडोबा के वाहन घोड़े की विशिष्ट मूर्ति है। मंदिर की रचना सभामंडप और गर्भगृह के रूप में की गई है। विशाल सभामंडप में नंदी की मूर्ति विराजमान है।गर्भगृह में खंडोबा, म्हाळसा देवी और बाणाई देवी की त्रिपिंडी स्वरूप की प्रतीकात्मक पाषाण शिला है। इनमें से खंडोबा और म्हाळसा देवी की
शिला को चाँदी का मुखौटा पहनाकर वस्त्रालंकार अर्पित किए जाते हैं। प्रतीकात्मक शिला के सम्मुख घोड़े पर सवार खंडोबा और म्हाळसा देवी द्वारा मणि और मल्ल राक्षसों का वध करते हुए मूर्तियाँ स्थापित हैं। बताया जाता है कि ये मूर्तियाँ बाद में स्थापित की गई थीं।
इस मंदिर परिसर में बाणाई देवी और हेगडी प्रधान के भी मंदिर हैं। मंदिर से सटे नए सभामंडप का निर्माण किया गया है। इसमें विभिन्न धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाता है। यहाँ भाईदूज, मार्गशीर्ष षष्ठी और चैत्र पूर्णिमा को विशाल मेला आयोजित होता है। भाईदूज के दिन जेजुरी से लाई गई अखंड ज्योति से यहाँ की धूनी और दीपमाला के दीपक प्रज्वलित किए जाते हैं। इसी के साथ मेले का प्रारंभ होता है। मार्गशीर्ष महीने के प्रथम दिन से खंडोबा का नवरात्रोत्सव प्रारंभ होता है। यह चंपाषष्ठी तक चलता है। मणि और मल्ल नामक दो राक्षसों को पराजित कर खंडोबा ने जनता को संकटों से मुक्त किया था। इसी घटना की स्मृति में यह उत्सव मनाया जाता है। “यळकोट यळकोट जय मल्हार” के जयघोष के साथ हजारों श्रद्धालु वाकडी पहुँचते हैं। दिनभर यहाँ हल्दी (भंडारा) छिड़कने और तली भरने जैसे अनुष्ठान चलते रहते हैं। इस अवसर पर श्रद्धालु खंडोबा को बैंगन का भरता और भाकरी का नैवेद्य अर्पित करते हैं। इस मेले में घोड़ों की शोभायात्रा निकाली जाती है। इसे देखने के लिए हजारों श्रद्धालु एकत्र होते हैं। चैत्र पूर्णिमा अर्थात हनुमान जयंती पर होने वाले मेले में देवतास्वरूप लाठियों की शोभायात्रा निकाली जाती है।
प्रत्येक दिन प्रातः, दोपहर और सायंकाल के समय खंडोबा की आरती होती है। श्रद्धालु सुबह 5 बजे से रात 8 बजे तक मंदिर में प्रवेश कर खंडोबा के दर्शन कर सकते हैं।