
महाराष्ट्रातील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचे स्थान विशेष आहे. या जिल्ह्यासह अहिल्यानगर शहरात अनेक लहान–मोठी प्राचीन व प्रसिद्ध मंदिरे आहेत. त्यापैकी स्थापत्यकलेच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले नवीन रचनेचे सावेडी येथील भव्य दत्त मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर अलीकडच्या काळातील असले तरी त्याचे सौंदर्य भारावून टाकणारे आहे. राज्यातील दत्त मंदिरांमध्ये हे सर्वात भव्य मंदिर असल्याचे सांगितले जाते.
अहिल्यानगरमधील महत्त्वाच्या १० पर्यटन व धार्मिक स्थळांमध्ये सावेडी येथील या दत्त मंदिराचा समावेश आहे. मंदिराची विशेष बाब म्हणजे या मंदिराच्या बांधकामासाठी राजस्थानमधील भरतपूर तालुक्यातील बन्सी पहाडपूर येथील गुलाबी रंगाच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे. या दगडांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे आयुष्य हे १००० वर्षांहून जास्त मानले जाते. अतिशय महागडे व दुर्मिळ होत चाललेले हे दगड दिसायला सुंदर असतात, याशिवाय यावर पाणी अथवा पाऊस पडला की ते खुलून दिसतात.
(फार पूर्वीपासून आपल्या देशातील अनेक ऐतिहासिक इमारती बन्सी पहाडपूर येथील दगडांनी बांधल्या गेल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीतील लाल किल्ला व कुतुबमिनार यांचा समावेश आहे. अयोध्येमधील नव्याने उभारलेल्या राम मंदिराचे बांधकाम, तसेच पुणे जिल्ह्यातील देहूजवळील प्रसिद्ध भंडारा डोंगरावरील तुकाराम महाराजांच्या भव्य मंदिराच्या बांधकामातही या दगडांचा वापर झाला आहे.)
या भव्य मंदिराचे श्रेय जाते ते सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांना. देहरूपाने आज त्यांचे वास्तव्य नसले तरी शक्तीरूपाने ते येथे वास करून आहेत, अशी भक्तांची श्रद्धा आहे. रामकृष्ण महाराजांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३४ साली अहिल्यानगर जिल्ह्यातील रायतळे येथे झाला. लहानपणापासून ईश्वरभक्तीकडे त्यांचा ओढा होता. ‘गुरुवाणी’ आणि ‘अमृत कलश’ या ग्रंथांमधील उल्लेखानुसार, वयाच्या ७ व्या वर्षीच श्री दत्तात्रेयांनी रामकृष्ण महाराजांना दृष्टांत देऊन गाणगापूर येथे बोलावून घेतले. तेथे स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन त्यांना अनुग्रह दिला व श्रीदत्तांची तपश्चर्या करण्यास सांगितले. २५ वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर स्वामी नृसिंहांनी पुन्हा त्यांना दर्शन दिले व वेदविद्या व दत्तगुरूंचे महात्म्य समाजाला समजावण्याचे कार्य त्यांच्यावर सोपविले.
श्रीनृसिंह सरस्वतींनी सोपविलेले कार्य महाराजांनी सुरू केले. त्यांच्या मुखातून ज्ञानगंगा वाहत असे. त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली. महाराजांनी आपले सर्व कार्य शिष्यांकडून भिक्षेच्या माध्यमातून उभे केले. त्यांचे लाखो शिष्य बनले. महाराष्ट्रभर शेकडो सत्संग मंडळे त्यांनी तयार केली. १९७४ मध्ये त्यांनी अहिल्यानगरमध्ये ‘श्री दत्त देवस्थान ट्रस्ट’ स्थापन केला. त्या अंतर्गत त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मुलांना वेद शिकविण्यासाठी ‘वेदान्त’ ही वास्तू बांधली. या वास्तूत आजही सुमारे १०० मुले
गुरुकुल पद्धतीने वेदाभ्यास शिकत आहेत. श्रावण वद्य चतुर्दशी शके १९२१ रोजी (८ सप्टेंबर १९९९) सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज पंचतत्त्वात विलीन झाले.
मृत्यूपूर्वी महाराजांनी येथे भव्य दत्त मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. त्यांचा हा संकल्प त्यांच्या शिष्यांनी पूर्ण केला. असे सांगितले जाते की या भव्य मंदिरासाठी लागणारा सर्व निधी हा महाराजांच्या शिष्यांनी भिक्षा मागून जमा केला. येथील दत्तमूर्ती संगमरवरी असून ती अत्यंत सुबक भासते. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शृंगेरी मठाचे पीठाधिश्वर जगतगुरू श्री भारतीतीर्थ महास्वामींच्या हस्ते ११ जुलै २००७ मध्ये करण्यात आली.
कमानीवजा प्रवेशद्वारातून आत गेल्यावर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी हात–पाय स्वच्छ धुऊनच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करावा लागतो. कमरेचा पट्टा व चामड्याच्या वस्तू या मंदिर परिसरात निषिद्ध असल्याने त्या बाहेर ठेवून पुढे जावे लागते. येथील परिसर प्रशस्त असून मधोमध श्री दत्तांचे भव्य मंदिर आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे गुलाबी दगडांच्या वापराने या भव्य मंदिराची उभारणी झाली आहे. या बांधकामाचे वैशिष्ट्य असे की या संपूर्ण बांधकामात कुठेही लोखंडाचा वापर करण्यात आलेला नाही. दगडांनाच विशिष्ट रचनेत खाचा पाडून ते एकमेकांमध्ये गुंफून (Interlock) हे बांधकाम झाले आहे. दुमजली असलेल्या या मंदिराच्या वरच्या मजल्यावरील गाभाऱ्यात दत्तगुरूंची संगमरवरी सुबक मूर्ती प्रतिष्ठापित आहे, तर तळमजल्यावर रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे ध्यानमंदिर आहे. सभामंडपाच्या प्रत्येक खांबांवर व भिंतीवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर केलेली दिसते. मंदिराच्या पायापासून ते शिखराच्या टोकापर्यंत केलेल्या वैविध्यपूर्ण कलाकुसरीमुळे नखशिखांत ते ‘शिल्पमंदिर’ भासते.
येथील आणखी एक विशेष बाब म्हणजे या मंदिरासमोर असलेला ‘देववृक्ष’. वड, पिंपळ व औदुंबर या ३ झाडांचा मिळून येथे १ मोठा वृक्ष तयार झाला आहे. त्यांचे खोड एकच असून वरच्या बाजूला ती झाडे वेगवेगळी झालेली दिसतात. अशाप्रकारे एकाच ठिकाणी तिन्ही पवित्र वृक्ष असणे दुर्मिळ मानले जाते. वड–पिंपळ–औदुंबर ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांची प्रतीके मानली जातात. श्री दत्तात्रेयही याच देवांचे रूप. त्यामुळे या पवित्र भूमीत असणाऱ्या या झाडाची पूजा येथे आलेले भाविक आवर्जून करतात.
येथील स्थानमहात्म्य वर्णनानुसार, १९८५ साली श्री स्वामी नृसिंह सरस्वती यांच्या ‘चिंतामणी पादुका’ येथे प्रकट झाल्या. गुरुपौर्णिमा, दत्त जयंती, रामकृष्ण जयंती, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि शंकराचार्य जयंती या दिवशी त्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी येथे ठेवल्या जातात. या मंदिरापासून ३ किमी अंतरावर तपोवन येथे रामकृष्ण महाराजांचे समाधीस्थान आहे.
दत्त मंदिरात रुद्र, पवमान, पंचसूक्त आदी अभिषेक रोज केले जातात. भक्तांतर्फे दुधाचा अभिषेक, सहस्रनाम पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र केले जातात. याशिवाय देवस्थान ट्रस्टतर्फे वेळोवेळी नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश याग यांसारखी धार्मिक अनुष्ठानेही केली जातात. दत्त जयंतीला या मंदिरावर फुलांची व विद्युत दिव्यांची रोषणाई केली जाते. दररोज सकाळी ७ ते दुपारी ११.३० आणि दुपारी ३ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना मंदिरात दर्शन घेता येते.

महाराष्ट्र के धार्मिक दृष्टि से प्रमुख जिलों में अहिल्यानगर जिला अपना विशिष्ट स्थान रखता है। इस जिले के साथ-साथ अहिल्यानगर शहर में भी कई छोटे-बड़े प्राचीन और प्रसिद्ध मंदिर हैं। इन्हीं में से अपनी स्थापत्य कला के लिए प्रसिद्ध सावेडी स्थित भव्य दत्त मंदिर लाखों श्रद्धालुओं की आस्था का केंद्र बन चुका है। इसे राज्य के दत्त मंदिरों में सबसे भव्य मंदिर कहा जाता है। सावेडी स्थित यह दत्त मंदिर अहिल्यानगर के दस प्रमुख पर्यटन और धार्मिक स्थलों में से एक है।
मंदिर की विशेषता यह है कि इसके निर्माण में राजस्थान के भरतपुर तहसील के बंसी पहाड़पुर से लाए गए गुलाबी पत्थरों का उपयोग किया गया है। इन पत्थरों की विशेषता यह है कि इनका जीवनकाल 1000 वर्षों से भी अधिक माना गया है। दुर्लभ और अत्यंत मूल्यवान होते जा रहे ये पत्थर न केवल मनोहर लगते हैं, बल्कि वर्षा अथवा जल संपर्क में आने पर और भी आकर्षक प्रतीत होते हैं। (प्राचीन काल से भारत में अनेक ऐतिहासिक इमारतें इन्हीं पत्थरों से निर्मित की गई हैं। इनमें दिल्ली का लाल किला, कुतुब मीनार, अयोध्या में नवनिर्मित श्रीराम मंदिर तथा पुणे जिले के देहू स्थित भंडारा पहाड़ी पर तुकाराम महाराज का भव्य मंदिर सम्मिलित हैं।)
इस भव्य मंदिर के निर्माण का श्रेय सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज को जाता है। यद्यपि वे आज स्थूल देह से विद्यमान नहीं हैं, फिर भी श्रद्धालुओं का विश्वास है कि वे इस स्थान पर सूक्ष्म रूप में विराजमान हैं। रामकृष्ण महाराज का जन्म 16 फरवरी 1934 को अहिल्यानगर जिले के रायतले गाँव में हुआ था। बचपन से ही उनमें ईश्वर-भक्ति की ललक दिखाई देती थी।
‘गुरुवाणी’ और ‘अमृत कलश’ ग्रंथों के अनुसार सात वर्ष की आयु में श्री दत्तात्रेय ने उन्हें स्वप्न में गाणगापुर बुलाया। वहाँ स्वामी नृसिंह सरस्वती ने प्रकट होकर उन्हें कृपा प्रदान की और उन्हें श्री दत्तात्रेय की तपस्या करने का आदेश दिया। स्वामी नृसिंह सरस्वती ने 25 वर्षों की कठिन तपस्या के पश्चात दर्शन देकर, उन्हें वेदों और दत्तगुरु की महिमा को पूरे समाज में प्रसारित करने का दायित्व सौंपा। महाराज ने इस कार्य को सहर्ष स्वीकार किया। उनके वचनों से ज्ञान की गंगा प्रवाहित होने लगी। श्रद्धालु उनके प्रवचन सुनने और दर्शन के लिए उमड़ने लगे।
महाराज ने अपने शिष्यों से प्राप्त भिक्षा से ही अपने समस्त कार्य चलाए। समय के साथ उनके लाखों शिष्य बन गए। उन्होंने संपूर्ण महाराष्ट्र में सैकड़ों सत्संग मंडलियाँ स्थापित कीं। वर्ष 1974 में उन्होंने अहिल्यानगर में ‘श्री दत्त देवस्थान ट्रस्ट’ की स्थापना की। इसके अंतर्गत उन्होंने वेदों की शास्त्रोक्त विधि से शिक्षा देने हेतु ‘वेदांत’ नामक भवन का निर्माण करवाया। आज भी इस भवन में लगभग 100 बालक गुरुकुल परंपरा से वेदों का अध्ययन कर रहे हैं। श्रावण कृष्ण चतुर्दशी, शक संवत 1921 (8 सितंबर 1999) को सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज पंचतत्व में विलीन हो गए।
महाराज ने अपने शरीर छोड़ने से पूर्व यहाँ एक भव्य दत्त मंदिर बनवाने का संकल्प लिया था। उनके शिष्यों ने इस संकल्प को पूर्ण किया। ऐसा कहा जाता है कि इस मंदिर के लिए आवश्यक समस्त धनराशि शिष्यों ने भिक्षाटन कर एकत्रित की थी। यहाँ प्रतिष्ठापित श्री दत्त की मूर्ति संगमरमर से निर्मित है और अत्यंत मनोहरी है। इस मूर्ति की प्राण-प्रतिष्ठा श्रृंगेरी मठ के पीठाधीश्वर जगद्गुरु श्री भारतीतीर्थ महास्वामी ने 11 जुलाई 2007 को की थी।
धनुषाकार प्रवेश द्वार से प्रवेश करने के बाद श्रद्धालुगण हाथ-पैर धोकर मंदिर में प्रवेश करते हैं। यह परिसर की पवित्रता बनाए रखने हेतु आवश्यक है। मंदिर क्षेत्र में कमरबंद और चमड़े की वस्तुएँ वर्जित हैं, अतः उन्हें बाहर ही छोड़ना होता है।
परिसर अत्यंत विशाल है, जिसके मध्य में श्री दत्त का भव्य मंदिर स्थित है। जैसा कि पूर्व में बताया गया है, इस मंदिर का निर्माण गुलाबी पत्थरों से हुआ है। इस निर्माण की एक विशेष बात यह है कि इसमें कहीं भी लोहे का उपयोग नहीं किया गया है। पत्थरों को विशेष ढंग से तराशकर एक विशिष्ट रचना में जोड़ा गया है। यह दो मंजिला मंदिर है। इसकी ऊपरी मंजिल पर श्री दत्तगुरु की संगमरमर की मूर्ति स्थापित है और भूतल पर रामकृष्ण क्षीरसागर महाराज का ध्यान मंदिर स्थित है।
सभामंडप के प्रत्येक स्तंभ और दीवार पर अद्वितीय शिल्पकला देखने को मिलती है। मंदिर के आधार से लेकर शिखर तक की सूक्ष्मतम नक्काशी इसे एक मूर्तिकला का उत्कृष्ट उदाहरण बना देती है। मंदिर की एक और विशिष्टता इसके सम्मुख स्थित ‘देववृक्ष’ है। यह वृक्ष बरगद, पीपल और औदुंबर इन तीन पवित्र वृक्षों के अद्भुत संयोग से बना है। इनका तना एक है, परंतु शीर्ष भाग पर तीनों वृक्ष भिन्न-भिन्न दिखाई देते हैं। यह संयोग अत्यंत दुर्लभ माना जाता है। बरगद-पीपल-औदुंबर क्रमशः ब्रह्मा, विष्णु और महेश के प्रतीक माने जाते हैं। श्री दत्तात्रेय इन्हीं तीनों देवताओं का समन्वित रूप हैं। इसलिए यहाँ आने वाले श्रद्धालु इस पावन वृक्ष की पूजा करते हैं।
स्थान के ऐतिहासिक वर्णन के अनुसार वर्ष 1985 में यहाँ श्री स्वामी नृसिंह सरस्वती की ‘चिंतामणि पादुका’ प्रकट हुई थी। गुरु पूर्णिमा, दत्त जयंती, रामकृष्ण जयंती, गोकुलाष्टमी, राम नवमी और शंकराचार्य जयंती के अवसर पर ये पादुकाएँ श्रद्धालुओं के दर्शनार्थ रखी जाती हैं। रामकृष्ण महाराज का समाधिस्थान इस मंदिर से तीन किलोमीटर दूर तपोवन में स्थित है।
दत्त मंदिर में प्रतिदिन रुद्र, पवमान, पंचसूक्त आदि की विधिवत पूजा होती है। यहाँ दुग्धाभिषेक, सहस्रनाम पाठ, पाद्यपूजा, शाश्वत पूजा, लघुरुद्र आदि अनेक धार्मिक अनुष्ठान श्रद्धापूर्वक संपन्न किए जाते हैं। इसके अलावा देवस्थान ट्रस्ट द्वारा समय-समय पर नवचंडी, शतचंडी, महारुद्र, गणेश यज्ञ जैसे धार्मिक अनुष्ठान भी किए जाते हैं। दत्त जयंती पर इस मंदिर में पुष्प और दीपों की सजावट की जाती है। श्रद्धालु प्रतिदिन सुबह 7 बजे से रात 11:30 बजे तक और दोपहर 3 बजे से रात 9 बजे तक मंदिर में दर्शन कर सकते हैं।