
तुळजापूरची तुळजाभवानी, माहुरची रेणुका माता, वणीची सप्तशृंगी माता आणि कोल्हारची भगवती (महालक्ष्मी) अशा साडेतीन शक्तिस्थळांचे एकत्रित व दुर्मिळ स्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूर येथे आहे. अहिल्यानगर–मनमाड मार्गावर अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या तीरावर हे तीर्थस्थान असून भगवती देवीच्या नावावरून या गावाचे भगवतीपूर असे नामकरण झाले आहे. नवसाला पावणाऱ्या, भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या या देवीचे हे मंदिर येथील ग्रामदैवत असून लाखो भक्तांचे ते श्रद्धास्थान आहे. दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रोत्सव साजरा होतो. संपूर्ण महिनाभर यात्रा असणारे महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान असल्याचे सांगितले जाते.
कोल्हार भगवतीपूर गावाची आख्यायिका अशी की समुद्रमंथनातून मिळालेले अमृत देवांना वाटप झाले ते ठिकाण होते येथून जवळ असलेले नेवासे.
या अमृत वाटपावरून देव व दानवांमध्ये याच भागात कोलाहल माजला. त्यावरून ‘कोल्हाळ–कोल्हार’ असे नाव प्राप्त झाले. तो कोलाहाल शमविण्यासाठी शंकरांनी प्रकट होऊन श्री भगवती देवीची स्थापना केली. सर्व राक्षसांचा वध केल्यानंतर विसावा घेण्यासाठी भगवती देवी आज जेथे मंदिर आहे तेथे थांबली. त्यावेळी थकलेल्या देवीचे क्षेमकुशल विचारण्यासाठी भवानी माता, रेणुका माता व सप्तशृंगी माता या भगिनी येथे आल्या व भगवती देवीसोबतच त्यांनी येथे वास्तव्य केले.
भगवती मातेचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिर परिसर प्रशस्त असून संपूर्ण परिसरात फरसबंदी आहे. मंदिर परिसरात अनेक पूजा साहित्याची दुकाने आहेत. मंदिरासमोर असलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर वैशिष्ट्यपूर्ण दगडी दीपमाळ आहे. या दीपमाळेवर जाण्यासाठी त्याच्या बाजूने गोलाकार जिना आहे. दीपमाळ आणि मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या मधोमध होमकुंड आहे. सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. येथील गर्भगृह हे जुने मंदिर असून त्यापुढे अंतराळ व सभामंडपाचे नव्याने बांधकाम केल्याचे
दिसते. मूळ मंदिर १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. जुन्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती स्थापत्यरचनेचे आहे. प्रशस्त सभामंडपात असलेल्या खांबांना वरच्या बाजूने सुंदर महिरपी कमानी आहेत. सभामंडपात देवीचे वाहन सिंहाची पितळी मूर्ती आहे. भाविकांना गर्भगृहात प्रवेश नसल्यामुळे अंतराळातून देवींचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहातील चौथऱ्यावर चार देवी आहेत, त्यापैकी उजवीकडून पहिली तुळजापूरची भवानी माता, दुसरी माहुरची रेणुका माता, तिसऱ्या स्थानावर भगवती माता म्हणजेच कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेचे रूप व चौथ्या स्थानावर सप्तशृंगी देवी अशा मूर्ती स्थानापन्न आहेत.
मंदिराबाबत आख्यायिका अशी की कोल्हार गावात फार वर्षांपूर्वी एक गृहस्थ राहत होते. ते दरवर्षी वणी येथील गडावर सप्तशृंगीच्या दर्शनाला लोटांगण घालत जात असत. त्यामुळे ते लोटांगण बाबा नावाने परिचित होते. वयोमानानुसार लोटांगण घालत जाऊन सप्तशृंगीचे दर्शन घेणे अशक्य होऊ लागले, तेव्हा देवीने त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन सांगितले की मीच दरवर्षी पौष
पौर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार येथे येऊन वास्तव्य करीन. तेव्हापासून दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर येथे यात्रोत्सव साजरा केला जातो. या काळात आणि नवरात्रोत्सवात तुळजापूरची भवानी माता, माहुरची रेणुका माता, कोल्हापूरची अंबा माता आणि वणीची सप्तशृंगी माता ही साडेतीन शक्तिपीठे येथे वास्तव्य करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
पौष शुद्ध पौर्णिमेला पहाटे महाआरती झाल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. सायंकाळी श्री भगवती मातेच्या छबिना पालखीची गावातून मिरवणूक निघते. ढोल–ताशे, सनई व चौघडा यांच्या तालावर भाविक व ग्रामस्थ तल्लीन होतात. मिरवणूक देवी मंदिरात पोहोचल्यानंतर रात्री फटाक्यांची आतषबाजी केली जाते. दुसऱ्या दिवशी नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा फड भरविला जातो. यात्रेनिमित्ताने मंदिर, तसेच परिसरात सजावट व रोषणाई केली जाते. ओटी भरणे, देवीला चोळी–पातळ नेसवणे, लिंब नेसणे, लोटांगण घालणे, नवस फेडणे व इतर विधी येथे मोठ्या उत्साहात पार पाडले जातात.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी म्हणजेच घटस्थापना ते विजयादशमीपर्यंत येथे नवरात्रोत्सव साजरा होतो. दररोज दुर्गा सप्तशती पाठ पठण, जोगवा, देवीची दृष्ट काढणे, स्त्रियांचा फेर इत्यादी कार्यक्रम मंदिराच्या सभामंडपात साजरे होतात. नवरात्रकाळात नवस फेडण्यासाठी भाविक सवाद्य मिरवणुकीने देवीच्या दर्शनाला येतात. स्थानिक तसेच बाहेर गावाहून येणारे, नऊ दिवस उपवास करणारे (घटी बसणारे) स्त्री–पुरुष भाविक मंदिरातच वास्तव्यास असतात. पाचव्या व सातव्या माळेला कोल्हार–भगवतीपूर गावच्या पाटील परिवाराच्या वतीने देवीस चोळी–पातळ व तळी भरण्याचा मान असतो. यावेळी उपस्थित भाविक व गावकऱ्यांना पानसुपारी दिली जाते. अष्टमीस नवचंडी होम–हवन (यज्ञविधी) होतो. नवमीस घटविसर्जन होऊन दशमीस महापूजा होते. नवरात्रात देवीस अलंकृत केले जाते.
दररोज पहाटे ५.३० वाजता मूर्तींना अभिषेक घातला जातो. सकाळी व सायंकाळी ७.१५ वाजता देवींची आरती होते. पहाटे ५.३० ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन घेता येते. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे येथे भक्त निवासाची सुविधाही करण्यात आलेली आहे.

तुलजापुर की तुलजाभवानी, माहुर की रेणुका माता, वणी की सप्तशृंगी माता और कोल्हार की भगवती (महालक्ष्मी), इन साढ़े तीन शक्तिपीठों का दुर्लभ और एकत्रित स्थल अहिल्यानगर जिले की राहाता तहसील में स्थित कोल्हार भगवतीपुर गाँव में स्थित है। यह तीर्थस्थान अहिल्यानगर–मनमाड मार्ग पर अमृतवाहिनी प्रवरा नदी के किनारे बसा है। देवी भगवती के नाम पर ही इस गाँव का नाम भगवतीपुर रखा गया। भक्तों की मनोकामनाएं पूरी करनेवाली यह देवी भगवतीपुर की ग्रामदेवता मानी जाती हैं। यह मंदिर लाखों श्रद्धालुओं की आस्था का केंद्र है। हर वर्ष पौष शुद्ध पूर्णिमा से माघ शुद्ध पूर्णिमा तक एक महीने का मेला यहाँ बड़े धूमधाम से मनाया जाता है। ऐसा कहा जाता है कि महाराष्ट्र में यह एकमात्र देवस्थान है, जहाँ निरंतर एक माह तक मेला लगता है।
इस स्थान से जुड़ी एक मान्यता है कि समुद्र मंथन से प्राप्त अमृत का देवताओं के बीच वितरण पास के नेवासा क्षेत्र में हुआ था। इस वितरण को लेकर देवताओं और दानवों में विवाद उत्पन्न हुआ। इस क्षेत्र में भारी कोलाहल मच गया। उसी कोलाहल के कारण इस स्थान को “कोल्हार” नाम मिला।
इस कोलाहल को शांत करने हेतु भगवान शिव प्रकट हुए। उन्होंने यहाँ भगवती देवी की स्थापना की। सभी राक्षसों का वध करने के उपरांत देवी ने यहीं विश्राम किया। देवी की कुशलक्षेम जानने के लिए तुलजापुर की भवानी माता, माहुर की रेणुका माता और वणी की सप्तशृंगी माता यहाँ आईं। तभी से वे भी यहाँ वास कर रही हैं, ऐसी आस्था है।
भगवती माता का मंदिर पूर्वाभिमुख है और इसका परिसर अत्यंत विशाल है। संपूर्ण परिसर में पक्की फर्शबंदी है। मंदिर के सम्मुख एक ऊँचे चबूतरे पर पाषाण की दीपमाला है। इसमें चढ़ने के लिए वृत्ताकार सीढ़ियाँ बनी हुई हैं। दीपमाला और मंदिर के प्रवेशद्वार के मध्य में एक यज्ञकुंड है। मंदिर की संरचना में सभामंडप, अंतराल और गर्भगृह सम्मिलित हैं। गर्भगृह मूलतः प्राचीन है। अंतराल और सभामंडप का निर्माण हाल ही में किया गया है। कहा जाता है कि मूल मंदिर 13वीं शताब्दी का है और इसका निर्माण हेमाडपंती स्थापत्यशैली में हुआ है। सभामंडप के स्तंभों पर ऊपरी हिस्से में मनोहर मेहराबदार कमानें हैं। यहाँ सिंह के रूप में देवी का वाहन पीतल की मूर्ति के रूप में स्थापित है। गर्भगृह में प्रवेश वर्जित होने के कारण श्रद्धालु अंतराल से ही देवी के दर्शन करते हैं। गर्भगृह के चबूतरे पर चार मूर्तियाँ स्थापित हैं।
पहली तुलजापुर की भवानी माता, दूसरी माहुर की रेणुका माता, तीसरी कोल्हार की भगवती माता (महालक्ष्मी रूप) और चतुर्थ वणी की सप्तशृंगी माता।
मंदिर से जुड़ी एक अन्य मान्यता के अनुसार कोल्हार गाँव में एक देवी के भक्त रहते थे। वे हर वर्ष वणी जाकर सप्तशृंगी देवी के दर्शन करते थे। वृद्धावस्था में जब यह कठिन होने लगा, तब देवी ने उन्हें स्वप्न में आकर कहा कि “मैं पौष पूर्णिमा से माघ पूर्णिमा तक कोल्हार में निवास करूँगी।” तब से यहाँ एक महीने की मेला परंपरा प्रारंभ हुई। श्रद्धालुओं का यह भी मानना है कि इस समय साढ़े तीन शक्तिपीठ की देवियाँ यहाँ निवास करती हैं।
पौष पूर्णिमा की सुबह महाआरती के साथ मेले का आरंभ होता है। सायंकाल देवी भगवती की पालकी पूरे गाँव में भव्य शोभायात्रा के रूप में निकाली जाती है। इसमें ढोल–ताशे, शहनाई और नगाड़ों की गूंज के साथ श्रद्धालुगण और ग्रामवासी भाव–विभोर होकर सहभागी होते हैं। शोभायात्रा मंदिर में पहुँचने के बाद रात को आतिशबाजी होती है। अगले दिन प्रतिष्ठित पहलवानों की कुश्ती प्रतियोगिता आयोजित होती है।
मेले के दौरान मंदिर परिसर में आकर्षक सजावट और रोशनी की जाती है। चुनरी चढ़ाना, देवी का वस्त्र–शृंगार करना, दंडवत प्रणाम देना आदि विधियाँ पूरे भक्तिभाव से संपन्न होती हैं।
आश्विन शुद्ध प्रतिपदा से दशमी तक यानी घटस्थापना से विजयादशमी तक यहाँ नवरात्र उत्सव भी मनाया जाता है। इस दौरान दुर्गा सप्तशती पाठ, देवी के भक्ति गीत, देवी की नजर उतारना, स्त्रियों का परंपरागत नृत्य आदि आयोजन होते हैं। अपनी मन्नत पूरी करने के लिए श्रद्धालु वाद्यों के साथ शोभायात्रा निकालकर मंदिर पहुँचते हैं। कई श्रद्धालु महिला–पुरुष यहाँ घट अर्थात देवी के प्रतीक रूप कलश स्थापित कर नौ दिन उपवास करते हुए मंदिर में ही निवास करते हैं। पाँचवीं और सातवीं तिथि को कोल्हार भगवतीपुर गाँव के पाटील परिवार को देवी का वस्त्र–शृंगार करने का सम्मान मिलता है। इस अवसर पर पान–सुपारी वितरण किया जाता है। अष्टमी को नवचंडी यज्ञ होता है, नवमी को घट विसर्जन तथा दशमी को महापूजा की जाती है। नवरात्र में देवी का विशेष श्रृंगार और अलंकरण किया जाता है।
प्रतिदिन प्रातः 5:30 बजे देवी की मूर्तियों का अभिषेक होता है और सुबह व सायंकाल 7:15 बजे आरती की जाती है। सुबह 5:30 से रात 10 बजे तक श्रद्धालु मंदिर में दर्शन कर सकते हैं। मंदिर समिति द्वारा श्रद्धालुओं की सुविधा हेतु भक्तनिवास की भी व्यवस्था की गई है।