दुर्योधन मंदिर

दूर्गाव, ता. कर्जत, अहिल्यानगर

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण चमत्कारिक म्हणता येतील अशा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. येथील पाथर्डी तालुक्यात चक्क दैत्याचे मंदिर आहे, तर अहिल्यानगर तालुक्यातील अगडगाव येथील काळभैरवनाथांच्या मंदिरात भुतांची जत्रा भरते, अशी श्रद्धा आहे. याच पंक्तीतील आणखी एक आगळेवेगळे दुर्योधनाचे मंदिर कर्जत तालुक्यातील दूर्गाव येथे आहे. या मंदिरामुळे या गावाचे नाव दुर्गाव पडले असून संपूर्ण महाराष्ट्रात दुर्योधनाचे हे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

कौरव बंधूंमधील ज्येष्ठ महापराक्रमी राजा असलेल्या दुर्योधनाची महाभारतात खलनायक म्हणून प्रतिमा आहे. परंतु त्याच्यामध्ये अनेक चांगले गुणही होते. या गुणांमुळे भारतात अनेक ठिकाणी त्याची पुजा होते. याशिवाय देशात काही ठिकाणी त्याची मंदिरेही आहेत. (डेहराडून येथे असलेल्या कौरवांच्या मंदिरांमधील केरळमधील इडाक्कड येथील दूर्योधन मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.) राशीनपासून जवळ असणाऱ्या कुळधरण गावाशेजारी दुर्गाव हे छोटेसे गाव आहे. प्रत्येकाला आपल्या परिसरातील देवस्थानावर श्रद्धा असते, तशी दुर्गाव येथील ग्रामस्थांचे दुर्योधन मंदिर हे श्रद्धास्थान आहे. दर वर्षांनी अधिक महिन्यात येथे होणारा उत्सव प्रसिद्ध असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या उत्सवांमध्ये त्याची गणना होते.

मंदिराची अख्यायिका अशी की महाभारतात झालेल्या कौरवपांडवांच्या युद्धानंतर भीमाच्या भीतीने जखमी झालेला दुर्योधन एका सरोवरात पाण्याखाली लपून बसला होता. भीमाने त्या सरोवराजवळ जाऊन तेथील जलदेवतेला दुर्योधनाला बाहेर पाठविण्याचे आवाहन केले. त्यानुसार जलदेवतेने त्याला बाहेर जायला सांगितले. त्यावेळी भीम दुर्योधनामध्ये युद्ध झाले. दुर्योधनाने मृत्यूपूर्वी दुर्गाव येथील महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांची आराधना केली. तेव्हा महादेव प्रसन्न होऊन त्यांनी दूर्योधनाला आपल्या मंदिराच्या कळसामध्ये काही काळ लपण्यासाठी जागा दिली. तेव्हापासून दूर्योधनाचा वास येथे असल्याचे सांगितले जाते.

जलदेवतेने आपल्याला पाण्यात स्थान दिले नाही, म्हणून दुर्योधनाला पाण्याचे साठे, पाण्याने भरलेले ढग यांचा राग आहे. दुर्योधनाची दृष्टी जर ढगांवर पडली तर पाऊस पडताच ते पुढे जातात आणि या परिसरात दुष्काळी परिस्थिती ओढवते. परंतु जेव्हा अशी परिस्थिती ओढवते, त्या वेळी दुर्योधनाची मूर्ती मंदिरात कोंडली जाते, म्हणजे पाऊस पडतो, अशी येथील पंचक्रोशीतील गावकऱ्यांची श्रद्धा आहे.

हे मंदिर गावाच्या सीमेवर निसर्गरम्य परिसरात स्थित आहे. दुर्योधन मंदिर म्हणून त्याची ओळख असली तरी हे मुख्य मंदिर महादेवाचे आहे. सुमारे ते फुट उंच जगतीवर (चौथरा) संपूर्ण दगडात ते बांधलेले आहे. सभामंडप गाभारा अशी या मंदिराची रचना आहे. काही वर्षापूर्वी या मंदिरासमोर नव्याने एक प्रशस्त मंडप बांधण्यात आला आहे. पायऱ्या चढल्यावर मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात नंदी असून गर्भगृहात शिवपिंडी आहेतत्यापैकी चौकोनी तर दुसरी गोलाकार आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या गाभाऱ्यातून भूयारी मार्ग होता त्यातून गावाच्या वेशीवर असलेल्या प्राचीन चिंतामणी मंदिरापर्यंत जाता येत असे.

मंदिराच्या बाजुने वर कळसावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे. कळसाजवळ गेल्यावर आत जाण्यासाठी दरवाजा आहे. आतमध्ये कळसाच्या पोकळीत दूर्योधनाची पद्मासनातील मूर्ती आहे. या मंदिरात प्रत्येक श्रावणी सोमवारी महाशिवरात्रीला उत्सव असतो. यावेळी येथे येणाऱ्या हजारो भाविकांमुळे परिसराला जत्रेचे स्वरूप येते. दर वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात येथे दुर्योधनाची मोठी मिरवणूक काढण्यात येते. अधिक महिन्याचे वर्णन येथील ग्रामस्थआगाऊ महिनाअसे करतात. दुर्योधन आगाऊ होता म्हणून या महिन्यात त्याची मिरवणूक काढण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. याशिवाय अधिक महिन्यात दिवस येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते.

राज्य सरकारकडून या स्थानाला तीर्थक्षेत्राचादर्जा देण्यात आला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून लाखांहून अधिक लाखांहून कमी भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.) सकाळी पासून सायंकाळी पर्यंत भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येते. दररोज सकाळी सात वाजता येथे आरती होते.

उपयुक्त माहिती:

  • कर्जतपासून १३ किमी, तर अहिल्यानगरपासून ७२ किमी अंतरावर
  • कर्जतपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात 
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही

दुर्योधन मंदिर

दूर्गाँव, तह. कर्जत, जि. अहिल्यानगर

महाराष्ट्र का अहिल्यानगर जिला कई विशिष्ट और चमत्कारिक मंदिरों के लिए प्रसिद्ध है। यहाँ की पाथर्डी तहसील में एक राक्षस के मंदिर की मान्यता है। वहीं अहिल्यानगर तहसील के अगडगाँव में स्थित कालभैरवनाथ मंदिर में पिशाचों का मेला लगता है, ऐसी स्थानीय आस्था है। इसी प्रकार का एक और अनोखा मंदिर, दुर्योधन मंदिर, कर्जत तहसील के दूर्गाँव में स्थित है। ऐसा कहा जाता है कि इसी मंदिर के कारण इस गाँव का नाम दूर्गाँव पड़ा। यह मंदिर संपूर्ण महाराष्ट्र में दुर्योधन का एकमात्र मंदिर माना जाता है।

महाभारत में कौरवों के सबसे बड़े और अत्यंत पराक्रमी राजा दुर्योधन की छवि एक खलनायक के रूप में रही है। किंतु उनमें कई अच्छे गुण भी थे। इन गुणों के कारण भारत के कई स्थानों पर उनकी पूजा की जाती है। कुछ स्थानों पर तो उनके मंदिर भी हैं। (जैसे देहरादून में स्थित कौरव मंदिर और केरल के इडक्कड़ गाँव का दुर्योधन मंदिर प्रसिद्ध हैं।)

राशीन के पास स्थित कुलधरण गाँव के निकट दूर्गाँव एक छोटासा गाँव है। जैसे हर व्यक्ति को अपने क्षेत्र के देवस्थान पर आस्था होती है, वैसे ही दूर्गाँव के लोगों के लिए यह दुर्योधन मंदिर आस्था का केंद्र है। हर तीन वर्षों में आने वाले अधिक मास में यहाँ भव्य मेला आयोजित होता है। इसे जिले के प्रमुख मेलों में गिना जाता है।

इस मंदिर के संदर्भ में एक किंवदंती प्रचलित है कि महाभारत के युद्ध के बाद दुर्योधन भीम के भय से घायल अवस्था में था। वह एक सरोवर में पानी के भीतर छिप गया था। भीम जब वहाँ पहुँचा, तो उसने जलदेवी से प्रार्थना की कि वह दुर्योधन को बाहर निकाले। जलदेवी के कहने पर दुर्योधन बाहर आया और तब वहाँ भीम और दुर्योधन में युद्ध हुआ। युद्ध से पहले दुर्योधन ने दूर्गाँव स्थित महादेव मंदिर में जाकर उनकी आराधना की। भगवान महादेव उसकी भक्ति से प्रसन्न हुए। उन्होंने अपने मंदिर के शिखर में उसे कुछ समय के लिए छिपने का स्थान दिया। तभी से माना जाता है कि दुर्योधन का वास इस स्थान पर है।

चूँकि जलदेवी ने दुर्योधन को पानी में स्थान नहीं दिया था, इसलिए उसे जल स्रोतों और बादलों से भरा आकाश अच्छा नहीं लगता। ऐसा कहा जाता है कि यदि बादलों पर दुर्योधन की दृष्टि पड़ जाए, तो वे बिना बरसे ही आगे बढ़ जाते हैं। इससे इस क्षेत्र में सूखे की स्थिति उत्पन्न हो जाती है। किंतु जब ऐसा होता है, तो मंदिर में स्थापित दुर्योधन की मूर्ति को कुछ समय के लिए बंद कर दिया जाता है। तब वर्षा होने लगती है, ऐसा यहाँ के ग्रामीणों का विश्वास है।

यह मंदिर गाँव की सीमा पर एक मनोहर प्राकृतिक वातावरण में स्थित है। यद्यपि इसे दुर्योधन मंदिर के रूप में जाना जाता है, परंतु इसका मूल मंदिर महादेव का है। यह संपूर्ण मंदिर पाषाणों से बना हुआ है। यह लगभग 4 से 5 पद ऊँचे चबूतरे पर स्थित है। इसकी रचना में सभामंडप और गर्भगृह सम्मिलित हैं। कुछ वर्ष पूर्व मंदिर के सम्मुख एक नया भव्य मंडप भी बनाया गया है। मंदिर में प्रवेश हेतु चार सीढ़ियाँ चढ़नी पड़ती हैं। सभामंडप में नंदी की मूर्ति है और गर्भगृह में दो शिवलिंग हैं। एक चतुष्कोणीय और दूसरा वृत्ताकार है। कहा जाता है कि पूर्वकाल में इस गर्भगृह से एक गुप्त गुफा निकलती थी। वह गाँव की सीमा पर स्थित प्राचीन चिंतामणि मंदिर तक जाती थी।

मंदिर के पास से ऊपर शिखर तक जाने के लिए एक सीढ़ी मार्ग है। शिखर के पास एक प्रवेशद्वार है। इससे भीतर जाने पर मंदिर के शिखर के खोखले भाग में पद्मासन में स्थित दुर्योधन की मूर्ति दिखाई देती है। मंदिर में प्रत्येक श्रावण सोमवार और महाशिवरात्रि के दिन उत्सव आयोजित होता है। इन अवसरों पर हज़ारों श्रद्धालुओं की भीड़ के कारण यहाँ मेला जैसा वातावरण बन जाता है। हर तीन वर्षों में आने वाले अधिक मास में दुर्योधन की भव्य शोभायात्रा निकाली जाती है। यहाँ के लोग अधिक मास कोआगाऊ महीनाकहते हैं। उनका मानना है कि दुर्योधन भीआगाऊ‘ (ढीठ/हठी) था, इसलिए इसी माह में उसकी शोभायात्रा निकाली जाती है। इस उत्सव में बड़ी संख्या में श्रद्धालु भाग लेते हैं।

इसके अतिरिक्त अधिक मास के दौरान यहाँ 8 दिन का अखंड हरिनाम सप्ताह आयोजित किया जाता है। राज्य सरकार द्वारा इस स्थान को तीर्थक्षेत्र कादर्जा प्राप्त है। (जिस देवस्थान पर वर्ष भर में 1 लाख से अधिक, किंतु 4 लाख से कम श्रद्धालु दर्शन हेतु आते हैं, उन्हेंदर्जा दिया जाता है।) यहाँ प्रतिदिन सुबह 6 बजे से सायंकाल 6 बजे तक दर्शन किए जा सकते हैं। प्रतिदिन सुबह 7 बजे आरती होती है।

मुख्य विशेषताएँ:

  • कर्जत से दूरी: 13 किमी, अहिल्यानगर से दूरी: 72 किमी
  • कर्जत से राज्य परिवहन बस की सुविधा उपलब्ध है।
  • निजी वाहन सीधे मंदिर तक पहुँच सकते हैं।
  • परिसर में विश्राम और जलपान की सुविधा उपलब्ध नहीं है।
Back To Home