काळभैरवनाथ मंदिर

वाळवणे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगरपुणे मार्गावरील पारनेर तालुक्यातील वाळवणे हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील प्राचीन काळभैरवनाथ मंदिरामुळे. शेकडो वर्षांपासून हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे देवस्थान जागृत असल्याची मान्यता आहे. चैत्र वद्य प्रतिपदेला भरणारी येथील यात्रा अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते. येथील काळभैरवनाथ आपले रक्षण करतो, अशी भावना ग्रामस्थांची असल्यामुळे त्यालाक्षेत्रपाळम्हणूनही संबोधले जाते.

मंदिराची आख्यायिका अशी की वाळवणेपासून जवळ असलेल्या कामरगाव येथून काळभैरवनाथ रथावर बसून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. वाळवणेकामरगावच्या वेशीवरील निसर्गसमृद्ध परिसरात काही वेळ विसाव्यासाठी ते तेथे थांबले. त्यावेळी गावातील एक गुराखी मुलगी गुरे घेऊन या भागात आली होती. तिने लगेच काळभैरवनाथांना ओळखून मनोभावे नमस्कार केला. त्या लहानशा मुलीची भक्ती पाहून देव प्रसन्न झाले तिला वर मागण्यास सांगितले. त्यावर ती मुलगी म्हणाली, ‘देवा मला काहीही नको, फक्त तू माझ्यासोबत माझ्या गावी वाळवणे येथे चल आणि तेथेच थांब, जेणेकरून मला रोज तुझे दर्शन घेता येईल.’ त्या मुलीची इच्छा ऐकून देव तिच्यासोबत गावात येण्यासाठी तयार झालेदेवांनी तिला आपल्या रथात घेतले ते दोघेही वाळवणे गावात जाण्यासाठी निघाले.

देवांच्या रथातून या दोघांचे गावाच्या दिशेने प्रस्थान सुरू असताना काही अंतरावर गेल्यावर रथाचा आख (दोन्ही चाकांना जोडून ठेवणारा संपूर्ण रथाचा भार ज्यावर असतो त्या भागालाआखम्हणतात) वाकला. ज्या ठिकाणी हा आख वाकला तेथे आज जिवंत पाण्याचा झरा आहे. पुढे काही अंतर पुढे आल्यावर तोच आख तुटला रथाचे चाक निखळून पडले. ते ठिकाण म्हणजे आजचे बिरोबाचे माळ. या ठिकाणी निखळून पडलेले चाक आजही ग्रामस्थांनी जतन करून ठेवले आहे.

मूळ मंदिर १०व्या शतकातील असले, तरी त्यात काळानुरूप बदल होत गेले. १९७१ मध्ये ग्रामस्थांनी नूतनीकरण केल्यानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. यासाठी सुमारे कोटींचा खर्च आला. असे सांगितले जाते की येथील पूर्वीचे मंदिर हे केवळ गर्भगृह त्यात काळभैरनाथांची मूर्ती असे होते. त्यानंतर त्यापुढे अंतराळ, त्याच्यापुढे सभामंडप अशी टप्प्याटप्प्याने कामे करण्यात आलीयाशिवाय मंदिराच्या प्रांगणात धार्मिक कार्यक्रमांसाठी भव्य सभामंडप उभारण्यात आला. मंदिराच्या शेजारी विठ्ठलरुक्मिणी, श्रीदत्त तुळजाभवानी अशी मंदिरे आहेत.

चैत्र वद्य प्रतिपदेला येथील यात्रेला प्रारंभ होतो. यात्रेसाठी ग्रामस्थ प्रवरा संगमावर जाऊन कावडीने येथे पवित्र जल घेऊन येतात. या पाण्याने सकाळी भैरवनाथांना अभिषेक केल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. रात्री १२ वाजता देवाचा छबिना (पालखी) निघतो. छबिना निघण्याआधी देवाचा कौल घेतला जातो. त्यानुसार येथील मध्यम आकाराचा दगड (स्थानिक भाषेत त्यालागोटीम्हणतात) ११ भाविकांनी एकत्र येऊन प्रत्येकी केवळ एका बोटाचा वापर करून तो वर उचलायचा असतो. तसा उचलता आला तर देवाने कौल दिला, असे समजून छबिना पुढे मार्गस्थ होतो. ‘भैरवनाथांच्या नावानं चांगभलंअशा जयघोषात मिरवणूक रात्रभर सुरू असते.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा आखाडा भरतो, त्यात नामवंत मल्ल भाग घेतात. मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला काळभैरवनाथ जन्मोत्सवाचा कार्यक्रमही येथे उत्साहात साजरा होतो. त्यावेळी दिवस अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन असे कार्यक्रम होतात. या दिवसांत येथे लाखांहून अधिक भाविक काळभैरवनाथांच्या दर्शनासाठी येतात, अशी नोंद आहे.

येथील विशेष बाब म्हणजे येथे देवाला फूल (कौल) लावण्याची प्रथा आहे. त्यानुसार मनात इच्छा ठेऊन मूर्तीच्या उजव्या डाव्या बाजूला फूल लावले जाते. उजवीकडील फूल खाली पडले तर देवाने कौल दिला, अशी समजूत आहे. दररोज सूर्योदयाच्या सूर्यास्ताच्या वेळी मंदिरात काळभैरवनाथांची आरती होते. राज्य शासनाच्या तीर्थक्षेत्राच्यादर्जाच्या यादीत या देवस्थानाचा समावेश झालेला आहे. (ज्या देवस्थानाच्या दर्शनासाठी वर्षातून लाखांहून अधिक लाखांहून कमी भाविक येतात, अशा देवस्थानाला राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्राचादर्जा प्राप्त होतो.)

उपयुक्त माहिती:

  • पारनेरपासून १५ किमी, तर अहिल्यानगरपासून ३१ किमी अंतरावर
  • अहिल्यानगर, पुणे, पारनेर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे

कालभैरवनाथ मंदिर

वालवणे, तह. पारनेर, जि. अहिल्यानगर

अहिल्यानगर-पुणे राजमार्ग पर स्थित पारनेर तहसील का वालवणे गाँव अपनी प्राचीन कालभैरवनाथ मंदिर की महिमा के कारण विख्यात है। यह देवस्थान शताब्दियों से हजारों श्रद्धालुओं की अटूट श्रद्धा का पावन केंद्र रहा है। इसे जागृत एवं चैतन्यमय माना जाता है। चैत्र कृष्ण पक्ष की प्रतिपदा तिथि को आयोजित होने वाला यहाँ का महामेला अहिल्यानगर जिले के विशालतम आयोजनों में गिना जाता है। यहाँ के कालभैरवनाथ ग्रामवासियों की रक्षा करते हैं। इसी दृढ़ भावना के कारण उन्हें ‘क्षेत्रपाल’ के रूप में भी जाना जाता है।

इस मंदिर की पावन कथा इस प्रकार है। वालवणे के समीप स्थित कामरगाँव से कालभैरवनाथ रथ पर आरूढ़ होकर विहार हेतु प्रस्थान कर रहे थे। वे वालवणे-कामरगाँव की सीमा पर मनोहर प्राकृतिक दृश्य वाले क्षेत्र में कुछ समय विश्राम हेतु ठहरे। उसी समय गाँव की एक चरवाहा कन्या अपनी गायों को लेकर उस क्षेत्र में उपस्थित हुई। उसने तुरंत भगवान कालभैरवनाथ को पहचान लिया। उसने अनन्य भक्तिभाव से उन्हें नमन किया। उस छोटी बालिका की निश्छल भक्ति देख देव प्रसन्न हुए। उन्होंने उसे वर माँगने का निर्देश दिया। इस पर वह कन्या विनयपूर्वक बोली, ‘हे भगवान, मुझे अन्य कुछ भी नहीं चाहिए। केवल आप मेरे साथ मेरे गाँव वालवणे चलिए और वहीं विराजिए। इससे मुझे नित्य आपके चरणों के दर्शन का सौभाग्य प्राप्त हो सके।’ उस बालिका की अभिलाषा सुन भगवान उसके साथ गाँव आने हेतु तैयार हुए। भगवान ने उसे अपने रथ में स्थान दिया। वे दोनों वालवणे गाँव की ओर प्रस्थान करने लगे।

ईश्वर के रथ से उन दोनों का गाँव की दिशा में गमन हो रहा था। तभी कुछ समय के पश्चात रथ का अक्ष (वह भाग जो दोनों पहियों को जोड़ता है और जिस पर संपूर्ण रथ का भार निर्भर होता है) झुक गया। जिस स्थान पर वह अक्ष झुका, वहाँ आज एक जीवंत जल-स्रोत प्रवाहित है। इसके पश्चात कुछ दूरी और तय करने पर वही अक्ष टूट गया। रथ का पहिया अलग होकर गिर पड़ा। वह स्थल वर्तमान में ‘बिरोबा का माल’ नाम से जाना जाता है। इस स्थान पर रथ से गिरा हुआ वह पहिया आज भी ग्रामवासियों ने सुरक्षित संजोकर रखा है।

यद्यपि मूल मंदिर १०वीं शताब्दी का है, तथापि कालचक्र के साथ इसमें कुछ परिवर्तन होते रहे। वर्ष १९७१ में ग्रामवासियों द्वारा जीर्णोद्धार किए जाने के उपरांत मंदिर ने वर्तमान भव्य स्वरूप धारण किया है। इस पुनीत कार्य हेतु लगभग दो करोड़ रुपयों का व्यय हुआ। ऐसा कहा जाता है कि पूर्व में यहाँ का मंदिर केवल गर्भगृह तक सीमित था। इसमें कालभैरवनाथ की पाषाण मूर्ति प्रतिष्ठित थी। इसके बाद उसके सम्मुख अंतराल और उसके आगे सभामंडप जैसे निर्माण कार्य क्रमबद्ध रीति से संपन्न हुए। इसके अतिरिक्त मंदिर के प्रांगण में धार्मिक अनुष्ठानों हेतु एक विशाल सभामंडप निर्मित किया गया है। मंदिर के पीछे की ओर श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री दत्त एवं श्री तुलजाभवानी के मंदिर भी सुशोभित हैं।

चैत्र कृष्ण प्रतिपदा को यहाँ के वार्षिक उत्सव का मंगलारंभ होता है। मेले हेतु गाँव के लोग प्रवरा संगम पर जाकर कावड़ के माध्यम से पवित्र जल लाते हैं। इस पावन जल से प्रातःकाल भैरवनाथ का अभिषेक होता है। इसके उपरांत मेला प्रारंभ होता है। अर्धरात्रि १२ बजे देव का पालकी उत्सव निकलता है। पालकी प्रस्थान से पूर्व देव की अनुमति ली जाती है। इसके अनुसार, यहाँ के मध्यम आकार के पत्थर (जिसे स्थानीय भाषा में ‘गोटी’ कहते हैं) को ११ श्रद्धालु एकत्र होकर उठाते हैं। प्रत्येक व्यक्ति केवल अपनी एक उँगली का प्रयोग करता है। यदि वह पत्थर उठ जाए, तो देव की अनुमति प्राप्त मानकर पालकी आगे बढ़ती है। ‘भैरवनाथ के नाम की जयजयकार’ के उद्घोष के साथ शोभायात्रा रात भर चलती रहती है।

मेले के दूसरे दिन मल्लयुद्ध का अखाड़ा सजता है। इसमें ख्यातिलब्ध पहलवान सहभागिता करते हैं। मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी को कालभैरवनाथ जन्मोत्सव का कार्यक्रम भी यहाँ अत्यंत उत्साहपूर्वक मनाया जाता है। उस अवसर पर सात दिनों तक अखंड हरिनाम सप्ताह, भजन एवं कीर्तन जैसे आध्यात्मिक आयोजन होते हैं। उपलब्ध विवरणों के अनुसार, इन दो दिनों में दो लाख से भी अधिक श्रद्धालु कालभैरवनाथ के दर्शन हेतु यहाँ आते हैं।

यहाँ की एक विशिष्ट परंपरा देव से अनुमति माँगने की है। इसके अंतर्गत भक्त अपनी मनोकामना मन में संजोकर मूर्ति की दाईं और बाईं ओर पुष्प अर्पित करते हैं। यदि दाईं ओर का पुष्प नीचे गिर जाए, तो उसे देव की अनुमति माना जाता है। प्रतिदिन सूर्योदय एवं सूर्यास्त के समय मंदिर में कालभैरवनाथ की आरती संपन्न होती है। राज्य सरकार की तीर्थक्षेत्र सूची में इस देवस्थान को ‘क’ श्रेणी प्राप्त है।

प्रमुख विशेषताएँ

  • अहिल्यानगर से ३१ कि.मी. तथा पारनेर से १५ कि.मी. की दूरी पर
  • अहिल्यानगर, पुणे एवं पारनेर से राज्य परिवहन की सुलभ सेवा उपलब्ध
  • निजी वाहन सीधे मंदिर द्वार तक पहुँच सकते हैं
  • परिक्षेत्र में निवास एवं जलपान की उत्तम व्यवस्था है
Back To Home