
महाराष्ट्रात एक गाव असे आहे, जेथे आपल्या मुलाचे नाव मारुती, हनुमान वा पवन असे ठेवले जात नाही. या गावात मारुतीचे मंदिर तर नाहीच, शिवाय कोणी तेथे मारुतीचे नावही घेत नाही. तो अपशकुन समजला जातो. गावाचे वेगळेपण म्हणजे येथे चक्क दैत्याचे मंदिर असून सर्वजण त्याचीच पूजा करतात. ही प्रथा रामायण काळापासून पाळली जात असल्याचे सांगितले जाते. या दैत्य मंदिराच्या नावावरून या गावाला ‘दैत्यनांदूर’ हे नाव पडले आहे. हा दैत्य नवसालाही पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
राज्यात मारुतीचे मंदिर असलेली बहुसंख्य गावे आहेत; परंतु त्याला अपवाद आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव. मुलखावेगळे हे गाव गर्भगिरीच्या डोंगररांगेत वसले असून भगवान गडापासून हाकेच्या अंतरावर आहे. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निंबादैत्य मंदिर हे दुमजली आहे. त्यामुळे असे सांगितले जाते की गावात कुणीही दुमजली घर बांधत नाहीत. याशिवाय मारुती नावाशी साधर्म्य असलेली गाडीही खरेदी केली जात नाही.
या मंदिराची आख्यायिका अशी की रावणावर विजय मिळवून श्रीराम लंकेहून सीतेला अयोध्येला घेऊन जातात. परंतु काही कारणाने त्यांना सीतेला पुन्हा जंगलात पाठवावे लागणार होते. तेव्हा ही जबाबदारी त्यांनी हनुमंतावर सोपविली.
हनुमंत व सीता येथील दंडकारण्यात असलेल्या काशी केदारेश्वर (सध्याचे पाथर्डी तालुक्यात असलेले स्थान) या ठिकाणी आले. सीतेसाठी फळे शोधत असताना हनुमंत निंबादैत्य राक्षसाचे वास्तव्य होते, त्या भागात जाऊन फळे तोडण्यास सुरुवात करतो. परवानगी न घेता आपल्या राज्यातील संपत्तीची कोणीतरी चोरी करत आहे, हे निंबादैत्याच्या लक्षात येते. त्याला राग येतो व तो हनुमंताला युद्धासाठी आव्हान देतो. हनुमंतही गदा घेऊन त्या निंबादैत्यावर चाल करतो. यावेळी या दोघांमध्ये घनघोर युद्ध होते. त्यात दोघेही जखमी होतात; परंतु कोणीही पराभूत होत नव्हते. एका क्षणी जखमी अवस्थेतील निंबादैत्य श्रीरामांचा धावा करतो. आपल्या परमेश्वराचे नाव निंबादैत्याच्या मुखातून ऐकल्यावर हनुमंत आश्चर्यचकित होतो. त्याचवेळी निंबादैत्याचा धावा ऐकून श्रीराम प्रकट होतात. श्रीरामांनी निंबादैत्याच्या शरीरावरून हात फिरविल्यानंतर त्याच्या अंगावरील जखमा पूर्णपणे बऱ्या होतात. निंबादैत्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीराम त्याला वर देतात, ‘यापुढे या गावात हनुमंताचे नावही घेतले जाणार नाही. येथे फक्त तुझीच पूजा होईल.’
गावातील नदीच्या किनाऱ्यावर असलेले निंबादैत्य मंदिर दगडी बांधकामाचे असून ते १६ व्या शतकातील असावे. सभामंडप व गर्भगृह अशी त्याची रचना आहे. गर्भगृहात निंबादैत्याची दगडी मूर्ती आहे. उत्सवाच्या वेळी याला चांदीचा मुकुट व अलंकार परिधान केले जातात.
निंबादैत्य महाराजांचे कुळ राक्षसाचे असले तरी त्यांना दररोज शाकाहारी नैवेद्य दाखविला जातो. दररोज दुपारी १२ वाजता गावातील एका घरातून येथे पुरणपोळीचा नैवेद्य आणला जातो. प्रत्येक शनिवारी होणाऱ्या येथील आरतीला शेकडो भाविक उपस्थित असतात. वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथील अनेक घरांवर वा वाहनांवर ‘दैत्याची कृपा, दैत्य प्रसन्न’ असे लिहिलेले असते. निंबादैत्य महाराज येथील अनेक कुटुंबांचे कुलदैवत असून दैत्यनांदूरचे ते ग्रामदैवत आहे.
निंबादैत्य महाराजांचा जत्रोत्सव गुढीपाडव्यापासून ३ दिवस असतो. त्यांच्या दर्शनाने येथील भाविक नववर्षाची सुरुवात करतात. ३ दिवस चालणाऱ्या या यात्रेचा मुख्य दिवस हा गुढीपाडवा असतो. या दिवशी कावडीतून आणलेल्या गंगेच्या पाण्याने निंबादैत्य महाराजांच्या मूर्तीला अभिषेक केला जातो. याशिवाय छबिना (मिरवणूक), कुस्ती स्पर्धा, महाआरती असे विविध कार्यक्रम यावेळी होतात. नोकरी–व्यवसायानिमित्त देश–परदेशात असलेले येथील नागरिकही या उत्सवासाठी हमखास येथे येतात.

महाराष्ट्र में एक ऐसा गाँव है, जहाँ लोग अपने बच्चों का नाम मारुति, हनुमान या पवन नहीं रखते हैं। इस गाँव में हनुमान जी का मंदिर तो है ही नहीं, यहाँ कोई हनुमान जी का नाम भी नहीं लेता। इसे अपशकुन माना जाता है। गाँव की विशेषता यह है कि यहाँ एक राक्षस का मंदिर है और सभी उसकी पूजा करते हैं। कहा जाता है कि यह परंपरा रामायण के समय से चली आ रही है। इस राक्षस मंदिर का नाम ‘दैत्यनांदूर’ है। श्रद्धालुओं का मानना है कि यह राक्षस उनकी प्रार्थना पूर्ण करता है।
राज्य के अधिकांश गाँवों में हनुमान जी के मंदिर हैं, लेकिन अहिल्यानगर जिले के पाथर्डी तहसील में स्थित दैत्यनांदूर गाँव अपवाद है। यह अनोखा गाँव गर्भगिरी पर्वत श्रृंखला में स्थित है और भगवान गढ़ से पैदल दूरी पर है। इस गाँव की एक और विशेषता यह है कि निंबादैत्य मंदिर दो मंजिला है। इसलिए कहा जाता है कि गाँव में कोई भी दो मंजिला मकान नहीं बनवाता। इसके अलावा मारुति नाम का कोई वाहन भी नहीं खरीदा जाता।
इस मंदिर की जनश्रुति है कि रावण को हराने के बाद श्रीराम सीता को लंका से अयोध्या ले जाते हैं। लेकिन किसी कारणवश उन्हें सीता को वापस वन में भेजना पड़ा। तब उन्होंने यह जिम्मेदारी हनुमान को सौंपी।
हनुमान और सीता दंडकारण्य के काशी केदारेश्वर (वर्तमान पाथर्डी तहसील) आए। सीता के लिए फल खोजते हुए हनुमान उस स्थान पर गए, जहाँ राक्षस निंबादैत्य रहता था और फल चुनने लगे। राक्षस निंबादैत्य ने देखा कि कोई बिना अनुमति के उनके राज्य का धन चुरा रहा है। वह क्रोधित हो गया और हनुमान को युद्ध के लिए ललकारा। हनुमान ने भी गदा लेकर राक्षस निंबादैत्य पर हमला कर दिया। इस समय दोनों में भयंकर युद्ध हुआ। इसमें दोनों घायल हुए, लेकिन कोई पराजित नहीं हुआ। एक समय घायल निंबादैत्य श्रीराम को पुकारते हैं। निंबादैत्य के मुख से अपने प्रभु का नाम सुनकर हनुमान आश्चर्यचकित हो जाते हैं। उसी समय निंबादैत्य की पुकार सुनकर श्रीराम प्रकट होते हैं। श्रीराम द्वारा निंबादैत्य के शरीर पर हाथ फेरने के बाद उसके शरीर के घाव पूरी तरह से ठीक हो जाते हैं। निंबादैत्य की भक्ति से प्रसन्न होकर श्रीराम उसे आशीर्वाद देते हैं, ‘अब से इस गाँव में हनुमान का नाम नहीं लिया जाएगा। यहाँ केवल तुम्हारी पूजा होगी।’
गाँव में नदी के किनारे स्थित निंबादैत्य मंदिर पत्थर से बना है और माना जाता है कि यह 16वीं शताब्दी का है। इसमें एक सभामंडप और एक गर्भगृह है।
गर्भगृह में निंबादैत्य की पाषाण मूर्ति है। उत्सव के दौरान उन्हें चांदी के मुकुट और आभूषणों से सजाया जाता है।
हालाँकि निंबादैत्य महाराज का कुल राक्षस है, लेकिन उन्हें प्रतिदिन शाकाहारी भोग लगाया जाता है। प्रतिदिन दोपहर 12 बजे गाँव के एक घर से यहाँ पूरणपोली का भोग लाया जाता है। यहाँ हर शनिवार को होने वाली आरती में सैकड़ों श्रद्धालु सहभागी होते हैं। विशेष बात यह है कि यहाँ कई घरों या वाहनों पर ‘दैत्य की कृपा’, ‘दैत्य प्रसन्न’ लिखा होता है। निंबादैत्य महाराज यहाँ के कई परिवारों के कुलदेवता हैं और वे दैत्यनांदूर के ग्राम देवताभी हैं।
निंबादैत्य महाराज का उत्सव गुड़ी पड़वा से 3 दिनों तक चलता है। यहाँ श्रद्धालु उनके दर्शन के साथ नए वर्ष का प्रारंभ करते हैं। इस 3 दिवसीय मेले का मुख्य दिन गुड़ी पड़वा है। इस दिन निंबादैत्य महाराज की मूर्ति का कावड़ से लाए गए गंगा जल से अभिषेक किया जाता है। इसके अलावा इस दौरान छबीना (जुलूस), कुश्ती प्रतियोगिता, महाआरती जैसे विभिन्न कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। यहाँ के नागरिक जो काम-धंधे और व्यवसाय के लिए देश-विदेश में हैं, वे भी इस उत्सव के लिए विशेष रूप से यहाँ आते हैं।